शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बारावीचा निकाल तयार करण्यासाठी मुदतवाढ: सीबीएसई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 05:31 IST

निकाल तयार करण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने या  प्रक्रियेत सहभागी असलेले  शिक्षक तणावाखाली असून धास्तावले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :   केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शाळांसाठी बारावीचा निकाल तयार करण्याची मुदत २५ जुलैपर्यंत वाढविली आहे, असे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी बुधवारी सांगितले. आधी ही मुदत २२ जुलै होती.

निकाल तयार करण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने या  प्रक्रियेत सहभागी असलेले  शिक्षक तणावाखाली असून धास्तावले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून चुका होत आहेत. या चुका दुरुस्त करण्यासाठी शिक्षक सीबीएसईला विनंती करीत आहेत.

 समस्यांची सीबीएसईला जाणीव आहे. त्या पार्श्वभूमीवर सीबीएसईने  अंतिम तारीख वाढवून २५ जुलै करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ जुलै  रोजी निकाल घोषित केला जाणार आहे. तथापि, निकाल तयार करण्यासाठी शाळांना मुदतवाढ देण्यात आल्याने निकाल घोषित करण्यात उशीर होईल का? याबाबत सीबीएसईने स्पष्ट केले नाही.

१६ ऑगस्टपासून खासगी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा

- बाहेरून दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यासाठी १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत परीक्षा आयोजित केल्या जातील, असेही सीबीएसईने सांगितले. 

- नियमित विद्यार्थ्यांसाठीच्या पर्यायी मूल्यांकन धोरणाच्या आधारे खासगी विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करण्याची शक्यता नाकारताना सीबीएसईने स्पष्ट केले की, शाळा आणि सीबीएसईकडे या विद्यार्थ्यांच्या मागच्या  मूल्यांकनाची कोणतीही नोंद नाही.  

- उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून खासगी विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकालही लवकरच घोषित केला जाईल, असेही परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले. 

टॅग्स :Educationशिक्षण