शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

CBSE 12th Exam: २४ जुलैपासून १२ वीच्या परीक्षा होण्याची शक्यता; शिक्षण मंत्रालयानं बनवले ३ प्लॅन, PMO निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 13:31 IST

केंद्रीय शिक्षणमंत्री १ जून रोजी परीक्षांच्या तारखांची घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु शिक्षण मंत्रालयाने परीक्षेचे नियोजन केले आहे

ठळक मुद्देसर्व राज्यांकडून आलेल्या सूचनेनंतर १२ वी बोर्डाच्या परीक्षेसाठी ३ प्लॅन तयार केले आहेत.बोर्डाने परीक्षेसाठी सध्या तात्पुरतं वेळापत्रक बनवलं आहे. त्यानुसार परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जातील मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ कोविड १९ च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आयोजित करण्यात येईल

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेचा धोका समोर आहे. त्यातच बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर न झाल्यानं विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलं आहे. सुप्रीम कोर्टात परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणीवेळी एक महत्त्वाची बातमी समोर आली. शिक्षण मंत्रालयाने ३ प्रस्ताव तयार करून सरकारकडे पाठवले आहेत आता त्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून शिक्कामोर्तब होणं गरजेचे आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री १ जून रोजी परीक्षांच्या तारखांची घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु शिक्षण मंत्रालयाने परीक्षेचे नियोजन केले आहे. एका राष्ट्रीय दैनिकाने मंत्रालयाच्या सूत्रांनुसार बातमी दिलीय की, जर केंद्र सरकारने परवानगी दिली तर २४ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान बारावीच्या परीक्षा होऊ शकतात. मागील आठवडाभरात सर्व राज्यांकडून आलेल्या सूचनेनंतर १२ वी बोर्डाच्या परीक्षेसाठी ३ प्लॅन तयार केले आहेत. परंतु यात पीएमओ कार्यालयाकडून काही बदल करण्यात येऊ शकतात.

शिक्षण मंत्रालयाने बनवले ३ प्लॅन

सीबीएसई(CBSE) बोर्डाच्या मदतीनं सरकारने ३ प्रस्ताव बनवले आहेत. त्यात प्लॅन A नुसार सरकार बारावीच्या केवळ मुख्य विषयांसाठीच परीक्षा घेतली जाईल. त्यात सायन्स, कॉमर्स आणि आर्टसच्या ३ मुख्य विषयांचे पेपर घेतले जातील. त्यानंतर निकाल तयार करण्यासाठी उर्वरित विषयांचे सरासरी गुण आणि मुख्य परीक्षेचे नंबर याचा आधार घेतला जाईल.

प्लॅन B नुसार, सीबीएसई या मुख्य विषयांच्या परीक्षा ३० मिनिटांच्या घेऊन त्याचे मुल्यमापन करेल. या परीक्षा अशाप्रकारे तयार करण्यात येतील ज्यात प्रश्नपत्रिकेत केवळ ऑब्जेक्टिव प्रश्न विचारण्यात येतील. परीक्षेत विषयांची संख्याही निश्चित होईल. परंतु राज्यांनी या प्रस्तावावर सहमती दर्शवली नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.

प्लॅन C नुसार, शिक्षण मंत्रालयाने हे सांगितलं आहे की, देशातील अनेक राज्यात कोरोना संक्रमण नियंत्रणात नाही. अशावेळी बोर्डाच्या सगळ्यांनी ९, १० आणि ११ वी तिन्हीचे इंटरनल असेसमेंट करावं आणि याच आधारे विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करावं. त्यानंतर बारावी बोर्डाचा निकाल जाहीर होईल. परंतु सरकार यावर जास्त विचार करू शकत नाही कारण अनेक तज्ज्ञांच्या मते १२ वीच्या परीक्षा घेणं गरजेचे आहे असं म्हंटल आहे.

तर बोर्डाने परीक्षेसाठी सध्या तात्पुरतं वेळापत्रक बनवलं आहे. त्यानुसार परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जातील १५ जुलै ते १ ऑगस्ट, तर दुसऱ्या टप्प्यात ६ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट आयोजित केल्या जातील. यात रविवारीही परीक्षा घेण्यात येतील. त्याचसोबतच जर कोणता विद्यार्थी सुरुवातीच्या टप्प्यात कोविड १९ संबंधित मुद्द्यामुळे परीक्षा देण्यासाठी गैरहजर राहिला तर अशा विद्यार्थ्यांना १५ दिवसानंतर होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाला योग्य ते पुरावे द्यावेत.

मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ कोविड १९ च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आयोजित करण्यात येईल. परीक्षेत सोशल डिस्टेंसिंग आणि अन्य नियमांचे पालन होईल. तर विद्यार्थी, शिक्षकांचा मोठा वर्ग सोशल मीडियावर सीबीएसई बोर्डाची परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहे. परंतु विद्यार्थी, शिक्षक यांची सुरक्षा आणि भविष्य हे दोन्ही आमच्यासाठी महत्त्वाचं आहे असं शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल म्हणाले आहेत.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याprime ministerपंतप्रधान