शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

CBSE 12th Exam: २४ जुलैपासून १२ वीच्या परीक्षा होण्याची शक्यता; शिक्षण मंत्रालयानं बनवले ३ प्लॅन, PMO निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 13:31 IST

केंद्रीय शिक्षणमंत्री १ जून रोजी परीक्षांच्या तारखांची घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु शिक्षण मंत्रालयाने परीक्षेचे नियोजन केले आहे

ठळक मुद्देसर्व राज्यांकडून आलेल्या सूचनेनंतर १२ वी बोर्डाच्या परीक्षेसाठी ३ प्लॅन तयार केले आहेत.बोर्डाने परीक्षेसाठी सध्या तात्पुरतं वेळापत्रक बनवलं आहे. त्यानुसार परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जातील मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ कोविड १९ च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आयोजित करण्यात येईल

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेचा धोका समोर आहे. त्यातच बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर न झाल्यानं विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलं आहे. सुप्रीम कोर्टात परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणीवेळी एक महत्त्वाची बातमी समोर आली. शिक्षण मंत्रालयाने ३ प्रस्ताव तयार करून सरकारकडे पाठवले आहेत आता त्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून शिक्कामोर्तब होणं गरजेचे आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री १ जून रोजी परीक्षांच्या तारखांची घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु शिक्षण मंत्रालयाने परीक्षेचे नियोजन केले आहे. एका राष्ट्रीय दैनिकाने मंत्रालयाच्या सूत्रांनुसार बातमी दिलीय की, जर केंद्र सरकारने परवानगी दिली तर २४ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान बारावीच्या परीक्षा होऊ शकतात. मागील आठवडाभरात सर्व राज्यांकडून आलेल्या सूचनेनंतर १२ वी बोर्डाच्या परीक्षेसाठी ३ प्लॅन तयार केले आहेत. परंतु यात पीएमओ कार्यालयाकडून काही बदल करण्यात येऊ शकतात.

शिक्षण मंत्रालयाने बनवले ३ प्लॅन

सीबीएसई(CBSE) बोर्डाच्या मदतीनं सरकारने ३ प्रस्ताव बनवले आहेत. त्यात प्लॅन A नुसार सरकार बारावीच्या केवळ मुख्य विषयांसाठीच परीक्षा घेतली जाईल. त्यात सायन्स, कॉमर्स आणि आर्टसच्या ३ मुख्य विषयांचे पेपर घेतले जातील. त्यानंतर निकाल तयार करण्यासाठी उर्वरित विषयांचे सरासरी गुण आणि मुख्य परीक्षेचे नंबर याचा आधार घेतला जाईल.

प्लॅन B नुसार, सीबीएसई या मुख्य विषयांच्या परीक्षा ३० मिनिटांच्या घेऊन त्याचे मुल्यमापन करेल. या परीक्षा अशाप्रकारे तयार करण्यात येतील ज्यात प्रश्नपत्रिकेत केवळ ऑब्जेक्टिव प्रश्न विचारण्यात येतील. परीक्षेत विषयांची संख्याही निश्चित होईल. परंतु राज्यांनी या प्रस्तावावर सहमती दर्शवली नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.

प्लॅन C नुसार, शिक्षण मंत्रालयाने हे सांगितलं आहे की, देशातील अनेक राज्यात कोरोना संक्रमण नियंत्रणात नाही. अशावेळी बोर्डाच्या सगळ्यांनी ९, १० आणि ११ वी तिन्हीचे इंटरनल असेसमेंट करावं आणि याच आधारे विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करावं. त्यानंतर बारावी बोर्डाचा निकाल जाहीर होईल. परंतु सरकार यावर जास्त विचार करू शकत नाही कारण अनेक तज्ज्ञांच्या मते १२ वीच्या परीक्षा घेणं गरजेचे आहे असं म्हंटल आहे.

तर बोर्डाने परीक्षेसाठी सध्या तात्पुरतं वेळापत्रक बनवलं आहे. त्यानुसार परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जातील १५ जुलै ते १ ऑगस्ट, तर दुसऱ्या टप्प्यात ६ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट आयोजित केल्या जातील. यात रविवारीही परीक्षा घेण्यात येतील. त्याचसोबतच जर कोणता विद्यार्थी सुरुवातीच्या टप्प्यात कोविड १९ संबंधित मुद्द्यामुळे परीक्षा देण्यासाठी गैरहजर राहिला तर अशा विद्यार्थ्यांना १५ दिवसानंतर होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाला योग्य ते पुरावे द्यावेत.

मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ कोविड १९ च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आयोजित करण्यात येईल. परीक्षेत सोशल डिस्टेंसिंग आणि अन्य नियमांचे पालन होईल. तर विद्यार्थी, शिक्षकांचा मोठा वर्ग सोशल मीडियावर सीबीएसई बोर्डाची परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहे. परंतु विद्यार्थी, शिक्षक यांची सुरक्षा आणि भविष्य हे दोन्ही आमच्यासाठी महत्त्वाचं आहे असं शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल म्हणाले आहेत.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याprime ministerपंतप्रधान