शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

Poll: सीईटीचं करायचं काय?... परीक्षा घ्यावी की कायमची रद्द करावी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 13:44 IST

सध्याची परिस्थिती पाहता आणि सीईटीची एकंदरीत उपयुक्तता लक्षात घेऊन ही परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

महाराष्ट्रात अभियांत्रिकी, फार्मसी, इ. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या  प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा (सीईटी) २००५ च्या सुमारास सुरू झाली.  त्यानंतर कधी फक्त CET तर कधी CET +१२ वी, कधी JEE असे धक्के विद्यार्थ्यांना देत हा प्रवेशाचा कार्यक्रम सुरु राहिला. गेल्या काही वर्षात या परीक्षेचे स्वरूप बदलत गेले आणि आज ती एक कठीण परीक्षा म्हणून गर्वाने (अनावश्यक) घेतली जाते. या परीक्षेमुळे बारावी परीक्षेचे महत्त्व संपुष्टात आले. सर्व विद्यार्थी बारावीकडे दुर्लक्ष करून सीईटीचा अभ्यास करू लागले. त्यासाठी कोचिंग क्लासेससाठी पालकांना भरमसाठ भुर्दंड सोसणे जिकिरीचे झाले. मात्र गंमत अशी की परीक्षा जरी कठीण असली तरी एक गुण मिळाला तरीही विद्यार्थ्याला प्रवेशासाठी पात्र घोषित केले गेले. 

याच कालावधीत अभियांत्रिकी-फार्मसी इत्यादी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या जागांचे प्रमाणही वाढत गेले. त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी चढाओढ बऱ्याच प्रमाणात संपुष्टात आली. आता तर बऱ्याच संस्थांमध्ये जागा रिकाम्या राहू लागल्या. अशा परिस्थितीत, जरी विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षा मंडळांच्या परीक्षा देत असले तरीही सीईटी परीक्षा खरेतर अनावश्यक गोष्ट वाटू लागली. 

लहान मोठ्या शहरातील, साध्या घरातील विद्यार्थ्याला सीईटी परीक्षा म्हणजे नक्कीच आर्थिक व मानसिक भुर्दंड आहे. आपल्याच गावातील संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्याला सीईटीचा मोठा व अवाजवी वळसा घ्यावा लागत आहे. यामुळे काही विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी-फार्मसी प्रवेशाचा मनसुबा बदलून अन्य अभ्यासक्रमांसाठी पसंती दर्शवली असे दिसून आले आहे. 

यावर्षी कोरोनामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. COVID-19 पालक विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत.  यामुळे सद्यपरिस्थितीत ही परीक्षा घेणे एक कठीण बाब झाली आहे. देशातील सगळ्याच राज्यात COVID-19 मुळे परीक्षेबद्दल संपूर्ण अनिश्चितता आहे. परीक्षेला फार उशीर झाल्याने व परीक्षेच्या अनिश्चितीमुळे मुलांची अभ्यासाची इच्छाशक्तीही संपुष्टात आली आहे. घरात, आजूबाजूला जाणिवणारी COVID भीती वातावरणात भिनली आहे.  परीक्षेसाठी आवश्यक शांत व उत्साहवर्धक वातावरण आज नाही. त्यामुळे पंजाब विद्यापीठाने सीईटी परीक्षा रद्द करून बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

सीईटी परीक्षेमुळे अभियांत्रिकी-फार्मसी इत्यादी अभ्यासात काही उपयोग होतो का याचा आढावा कोणी घेतल्याचे अजून तरी दिसून आलेले नाही. त्यामुळे या परीक्षेचा एवढा मोठा अट्टाहास करण्याची गरज काय हे समजण्यापलीकडचे आहे. 

ही परीक्षा खरेतर फक्त विद्यार्थ्यांचा गुणानुक्रम ठरवण्यासाठी घेतली जाते. बाकी या परीक्षेचा काहीही उपयोग नाही. गुणानुक्रम ठरवण्यासाठी बारावी परीक्षेचे गुण नक्कीच पुरेसे आहेत. सीईटी परीक्षा सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांचे प्रवेश हे बारावी परीक्षेच्या गुणांवरच (PCM/PCB) केले जात असत. थोडं मन मोठं करून आपण विचार केला तर आपल्याला असे लक्षात येईल की तेव्हा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सुद्धा उत्तमरित्या कार्यरत आहेत.  त्यामुळे सीईटी परीक्षा ही एक निव्वळ प्रशासनिक बाब आहे आणि या परीक्षेचा अभ्यासाच्या दृष्टीने कोणताही फायदा विद्यार्थ्यांना नाही असे वाटते. खरे अभ्यासतज्ञ या मताशी नक्कीच सहमत असतील.

२०१५ साली अस्तित्त्वात आलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या  प्रवेशासंबंधीच्या कायद्यात प्रवेश परीक्षा रद्द करण्याची मुभा सरकारला आहे असे वाटते.