शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

ऑल द बेस्ट, उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांची कसाेटी लागणार; हॉलतिकीट, पेन, पट्टी तयार ठेवा...

By निशांत वानखेडे | Updated: February 20, 2024 18:58 IST

नागपूर विभागात १.६३ लाख, जिल्ह्यात ६६ हजार विद्यार्थी : ३६ भरारी पथक, ८४ पर्यवेक्षकांचे राहिल लक्ष

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची ईयत्ता १२ वीची परीक्षा बुधवार २१ फेब्रुवारीपासून सुरू हाेत आहे. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाचा सामना करावा लागणार आहे. नागपूर विभागात १ लाख ६३ हजार १७ विद्यार्थी व नागपूर जिल्ह्यातून ६६ हजार ४४५ विद्यार्थी यंदा परीक्षा देणार आहेत. विभागाने काॅपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी यावेळी ३६ भरारी पथके तयार ठेवली आहेत.

इंग्रजी विषयाने परीक्षा सुरू हाेत असून नागपूर विभागाच्या ६ जिल्ह्यात ४९८ केंद्रावर केंद्र संचालकांच्या निरीक्षणात बारावीची परीक्षा हाेत आहे. या केंद्रांवर ८४ पर्यवेक्षकांची नजर राहणार आहे. नागपूर शहरात ८ पथकांसह विभागासाठी ३६ भरारी पथके सज्ज करण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांचेही पथक आकस्मिक निरीक्षणासाठी तयार राहणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय संचालक चिंतामण वंजारी यांनी दिली. याबाबत मंगळवारी राज्यातील अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

विभागातील १.६३ लाख विद्यार्थ्यांपैकी ८३,७६४ मुले आणि ७९,२५२ मुलींचा समावेश आहे. यंदा वर्धा जिल्ह्यातून एकमेव तृतीयपंथी विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. पेपर तपासण्यासाठी १०,५२५ सुपरव्हाईजर कार्य करणार आहेत.

प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी

जिल्हा     एकूण        मुले       मुली       केंद्रनागपूर   ६६४५४     ३३९७०   ३२४७५     १६८भंडारा   १८०२४      ९३६२     ८६६२       ६४गाेंदिया  १९९२४     १०३३४    ९६४४        ७६चंद्रपूर   २८७३३     १४६४२   १४१७७      ८६वर्धा     १६८८६     ८८७४      ८०११       ५४गडचिराेली १२८६५   ६५८२     ६२८३        ५०

शाखानिहाय विद्यार्थीविज्ञान   ८६,७११कला     ५२,४९३वाणिज्य १८,०७३एमसीव्हीसी ५१३४आयटीआय ६०६

शेवटी १० मिनिटे अधिकचीपूर्वी पेपर सुरू हाेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात येत हाेते. मात्र काॅपी किंवा माेबाईलद्वारे गैरप्रकार हाेण्याची शक्यता लक्षात घेत विद्यार्थ्यांना पेपर संपल्यानंतर १० मिनिटे अधिकची दिली जातील. पहिल्या सत्रात ११ वाजता सुरू झालेला पेपर २ वाजता संपेल व त्यानंतर २.१० वाजता पेपर घेतला जाईल. दुसऱ्या सत्रात ३ वाजता सुरू हाेणारा पेपर सुटल्यानंतर १० मिनिटे अतिरिक्त दिली जातील. विद्यार्थ्यांना मात्र अर्धा तास आधी केंद्रावर हजर राहावे लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेत तासभर अगाेदर घरून निघावे, असे आवाहन केले जात आहे.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षा