शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
Kolhapur Mahadevi Elephant : अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
3
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
4
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
5
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
6
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
7
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
8
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
9
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
10
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
11
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
12
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
13
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
14
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
15
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
16
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
17
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
18
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
19
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
20
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी

इंजिनिअरिंगच्या ५१ हजार जागा रिक्त; तिसऱ्या फेरीअखेर १ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 10:27 IST

राज्यात कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या यंदा ४६,२९० जागा उपलब्ध असून, तिसऱ्या फेरीअखेर त्यामध्ये ३३,३५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत

मुंबई : राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या आहेत. इंजिनीअरिंगच्या कॅपच्या तिसऱ्या फेरीअखेर १,१२,९८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, अद्याप ५१,३५५ जागा रिक्त आहेत.

आता आणखी एक ‘ए कॅप’ फेरी होणार असून त्यानंतर संस्थांच्या पातळीवर उर्वरित जागा भरल्या जाणार आहेत. त्यातून आणखी काही विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  राज्यात यंदा इंजिनीअरिंग प्रवेशासाठी १,६४,३३६ जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि त्यासंबंधित शाखांना सर्वाधिक जागा असून, त्याच शाखांकडे विद्यार्थ्यांचाही अधिक कल असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या यंदा ४६,२९० जागा उपलब्ध असून, तिसऱ्या फेरीअखेर त्यामध्ये ३३,३५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नव्याने तयार झालेल्या शाखेच्या प्रवेशासाठी यंदा १८,६६८ जागा उपलब्ध असून त्यातील १३,५३१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.  

टॅग्स :Educationशिक्षण