शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

शाळेचा पहिला दिवस घरातूनच, ऑनलाइन शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 05:49 IST

लॉकडाऊनमुळे मागील वर्षीही विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाचा प्रत्यक्ष आनंद घेता आला नव्हता आणि यंदाही शिक्षक आणि वर्गशिक्षकांची तोंडओळख ऑनलाइनच करून घ्यावी लागेल.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी विद्यार्थी सुरक्षिताता लक्षात घेऊन तूर्तास नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाइन करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून (मंगळवार, १५ जून) राज्यातील बरेच विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुटीनंतर पुन्हा एकदा अभ्यासाला लागतील, मात्र ऑनलाइन पद्धतीनेच.

लॉकडाऊनमुळे मागील वर्षीही विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाचा प्रत्यक्ष आनंद घेता आला नव्हता आणि यंदाही शिक्षक आणि वर्गशिक्षकांची तोंडओळख ऑनलाइनच करून घ्यावी लागेल. दरम्यान, याही परिस्थितीत नवीन वर्ग मित्र, नवीन शिक्षक यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह कायम आहे. दरम्यान, विदर्भातील शाळांचे शैक्षणिक वर्ष २८ जूनपासून सुरू हाेईल.

शाळा सुरू झाल्यावर शिक्षकांना मात्र शाळांतील उपस्थिती बंधनकारक आहे. इयत्ता १० वी व १२ वीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम सुरू असून, मर्यादित वेळेत यंदा निकाल जाहीर करायचे असल्याने राज्यातील विदर्भासह इयत्ता दहावी, बारावीला शिकवणाऱ्या शिक्षकांची शाळांमध्ये १०० टक्के उपस्थिती गरजेची असल्याच्या सूचना शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिल्या आहेत. तसेच इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती शाळांमध्ये बंधनकारक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. साेबतच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबत प्राथमिक, माध्यमिक मुख्याध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांचीही उपस्थिती अनिवार्य आहे.

शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार नवीन वर्षाची सुरुवात यंदा नवीन अभ्यासक्रमाने न होता उजळणीने होईल. मात्र, ती उजळणी कशी व कोणत्या घटकांची असावी, कोणत्या विद्यार्थ्यांची असावी, याबाबत शिक्षण विभागाकडून शाळा, मुख्याध्यापक, शिक्षकांना काहीच सूचना अद्याप आलेल्या नाहीत. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वर्षासंदर्भात काहीच आराखडा विद्यार्थ्यांसमोर सादर करता येणार नाही, अशी खंत मुख्याध्यापक व्यक्त करत आहेत.

प्रवाहाबाहेरील विद्यार्थीज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षण घेण्याची सोय नाही, ते विद्यार्थी गेल्या वर्षापासूनच ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, याबद्दल शिक्षण विभागाने काहीच कार्यवाही केली नसल्याची नाराजी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

टॅग्स :Schoolशाळा