शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

आरटीई प्रवेशाच्या ४० टक्के जागा रिक्त; प्रवेशाचा आज शेवटचा दिवस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 09:12 IST

आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांना चांगल्या शाळांमध्ये मोफत शिक्षण घेता यावे यासाठी राखीव जागांवर आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू झाली.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशांना दिलेल्या दुसऱ्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे. अद्यापही राज्यात प्रवेशासाठी निवड झालेल्या ३० हजार विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती बाकी आहे. रिक्त जागांपैकी मुंबईतीलही ४० टक्के जागावर प्रवेशनिश्चिती होणे बाकी आहे.

 एकीकडे मोठ्या शाळांमधील आरटीई प्रवेश सहज होत असताना दुसरीकडे इतर शाळांमध्ये प्रवेशनिश्चिती करण्यासाठी पालक फारसे उत्सुक नसल्याचे दिसत आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश संथगतीने होत असल्याचे मत आरटीई अधिकारी व्यक्त करीत आहेत. या प्रवेशांना मुदतवाढ दिल्याने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थीही प्रवेशासाठी ताटकळत असल्याचे चित्र पहायला  मिळत आहे. 

आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांना चांगल्या शाळांमध्ये मोफत शिक्षण घेता यावे यासाठी राखीव जागांवर आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. यंदा प्रवेशासाठी अर्ज ही मोठ्या प्रमाणावर आले,  तर प्रवेशनिश्चितीकडे पालक पाठ फिरवीत आहेत. दुसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही राज्यात ३० हजार जागावर प्रवेश झाले नाहीत. पालकांना हव्या त्या शाळांत प्रवेश मिळत नसल्याने व बनावट अर्ज, प्रमाणपत्रे सादर केल्याची प्रकरणे समोर आल्याने जागा रिक्त राहत असल्याची माहिती समन्वयक देत आहेत. 

आता मुदतवाढ नको  प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना संधी द्या पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देऊन प्रवेशाची संधी देण्यात आली.  प्रवेशप्रक्रिया वेळेवर संपवायची असेल तर आता तिसऱ्यांदा मुदतवाढ न देता प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना संधी द्या अशी मागणी काही पालकांकडून होत आहे.

खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये२५% राखीव जागांसाठी काढलेल्या सोडत जाहीर झाली असून, राज्यभरातील ९ हजार ८६ शाळांत असलेल्या १ लाख १ हजार  ९०९ जागांपैकी पहिल्या सोडतीत ९० हजार ६८८  विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यातील ६० हजार ९८५ जागांवर अद्याप प्रवेशनिश्चिती झाली आहे.  

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा