शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मुंबई विभागात अकरावीच्या एक लाख जागा रिक्त; वाणिज्य शाखेसाठी झाले सर्वाधिक प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 01:33 IST

एकूण जागांमध्ये वाढ केल्याने रिक्त जागांची संख्या वाढल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत

मुंबई : मुंबई विभागात अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत एक लाख ०८ हजार ०७१ जागा रिक्त राहिल्या आहेत. यात सर्वांत जास्त विज्ञान शाखेच्या ४६,९२०, त्यानंतर वाणिज्यच्या ४२,५२३ तर कला शाखेच्या १६,२२४ जागा रिक्त राहिल्या आहेत. एचएसव्हीसी अभ्यासक्रमाच्या २,४०४ रिक्त जागांचाही यात समावेश आहे. सर्वांत जास्त १,३४,७३३ प्रवेश हे वाणिज्य शाखेत झाले. एसईबीसी संवर्गासाठी यंदा एकूण १० टक्के जागा वाढविण्यात आल्या, त्याचा फटका बसून रिक्त जागांच्या संख्येत वाढ झाल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

मुंबई विभागात यंदा प्रवेशासाठी ३,२६,७९६ जागा होत्या. यापैकी १,८८, ८२४ जागा या आॅनलाइन प्रवेशासाठी तर १,३७,९७२ जागा या कोटा प्रवेशासाठी होत्या. त्यातील एकूण २,१८,७२५ जागांवर प्रवेश निश्चिती झाली. अकरावीच्या एकूण प्रवेशांत राज्य मंडळाच्या १,९७,४८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर सीबीएसईच्या ७,१८३, आयसीएसई १०,१२४, आयजीसीएसई १२०६, आयबी १०, एनआयओएसच्या ७१३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. यात इतर मंडळाचे २,००२ विद्यार्थी आहेत. खुल्या वर्गातून प्रवेश घेणाऱ्याची संख्या १,५७,०९६ तर एसईबीसी संवर्गातून प्रवेश घेणाऱ्यांची संख्या फक्त ५,६६२ आहे. आर्थिक दुर्बल घटकांतून केवळ १,४२९ तर इतर मागास प्रवर्गातूून २४,४२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.मुंबईत सर्वाधिक एक लाख ०८ हजार जागा रिक्तयंदाही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे ते चर्चेत राहिले. राज्य मंडळाचा दहावीचा निकाल कमी लागल्याने सीबीएसई, आयसीएसई मंडळांच्या तुलनेत कमी गुण असलेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशांपासून वंचित राहावे लागले. यावर पर्याय म्हणून राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालये मिळावीत यासाठी काही महाविद्यालयांना १० टक्के जागा वाढवून देण्याचा निर्णय घेतला. परिणामी, उपलब्ध जागांची संख्या वाढली. विद्यार्थ्यांच्या तुलनेत उपलब्ध जागा मुळातच जास्त असताना, त्यात १० टक्के वाढीव जागांची भर पडली. मुंबईत सर्वाधिक एक लाख ०८ हजार ०७१ जागा रिक्त राहिल्या आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थी