शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

झिंग... झिंग... झिंगाटामुळे होणारे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 04:24 IST

दारू हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. पण आपल्या शत्रूवरही प्रेम करा, अशी बायबलची शिकवण आहे.

- डॉ. एस. एस. मंठादारू हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. पण आपल्या शत्रूवरही प्रेम करा, अशी बायबलची शिकवण आहे. पुराणकाळापासून झिंग आणणाऱ्या दारूच्या मोहात माणूस पडत आला आहे. पण दारूमुळे माणसं मरत असतील तर त्याचा जाब कुणाला तरी द्यावाच लागेल. आसामच्या गोलाघाट येथील चहाच्या मळ्यात काम करणारे १५० मजूर हातभट्टीच्या दारूचे सेवन करून मरण पावल्याची घटना नुकतीच घडली. या शोकांतिकेचे स्वरूप फार भयानक आहे. त्या दारूमुळे बाधा झालेल्या ३५० हून अधिक लोकांना इस्पितळात भरती करावे लागले. त्याअगोदर दोन आठवड्यांपूर्वी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथेही बेकायदेशीरपणे तयार करण्यात आलेल्या गावठी दारूच्या सेवनाने १०० लोकांचा मृत्यू ओढवला होता! उच्च नैतिकता जपण्याच्या उद्देशाने दारूबंदीचे धोरण अमलात आणण्यात येते. पण त्यामुळे गरीब लोकच बाधित होतात. कारण दारूबंदीमुळे ते हातभट्टीची दारू चोरून पितात आणि प्राण गमावून बसतात.हूच म्हणून ओळखली जाणारी देशी दारू कशी तयार करतात? मोठ्या पातेल्यात १० लीटर पाणी ओततात. त्यात पाच पौंड साखर घालतात. त्यात टमाटे घालून उकळतात. त्यानंतर ते टमाटे त्या पाण्यातच सडू देतात. तीन-चार दिवसांनी ते आंबतात. त्यामुळे पाण्यातील साखरेचे रूपांतर अल्कोहोलमध्ये होते. त्या दारूचा प्रभाव वाढावा म्हणून त्यात मेथानॉल टाकण्यात येते. पण हेच मेथानॉल माणसाला घातक ठरते. त्याचे प्रमाण जर जास्त झाले तर अंधत्व येऊ शकते किंवा माणसाला मृत्यू येऊ शकतो. चार मिलीलीटर मेथानॉल अंधत्व येण्यास कारणीभूत ठरते, तर ३० एमएल मेथानॉल मृत्यूला कारण ठरते. दारू तयार करण्याच्या प्रक्रियेत निर्माण होणारे अ‍ॅसीटोन आणि अल्डीहाइड्स हे अपंगत्व आणू शकते.भारतातील ठिकठिकाणी चालणाऱ्या हातभट्ट्या या खरंच खूप धोकादायक आहेत. अधिक पैसे कमावण्याच्या लोभातून या हातभट्ट्यांतून भेसळयुक्त वस्तूंचा वापर केला जातो. कधी कधी मोटारीतील रेडिएटर्सचा वापरही करण्यात येतो. त्यातून तयार होणारे ग्लायकॉल हे अत्यंत धोकादायक रसायन असते. कारण रेडिएटरमधील जस्तामुळे हे द्रव्य विषारी होते. ते माणसाची मूत्रपिंडे निकामी करतात. तसेच त्यामुळे दृष्टिहीनता येऊ शकते.बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाºया हातभट्ट्यांच्या दुष्परिणामाविषयी येथे सांगितले. आता त्यावरील उपायांचीही चर्चा करू. मधुमेहाचा उपचार घेणाºया न्यूझीलंड येथील एका नागरिकाला व्होडका प्यायल्याने अंधत्व आले. त्यावर उपाय म्हणून डॉक्टरांनी त्यांना जॉनी वॉकर ब्लॅक लेबल व्हिस्की पिण्यास सांगितले. त्यामुळे त्या माणसाची गेलेली दृष्टी परत आली! मेथानॉलमुळे रक्तातील अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते, जे आॅप्टिक नर्व्हसाठी धोकादायक असते. पण व्हिस्कीतील इथानॉलने मेथानॉलचे घातक परिणाम रोखण्यास मदत होते, म्हणून हे गुपित लोकांपर्यंत पोहोचवीत आहे!अल्कोहोल व्यवसायापासून मिळणाºया उत्पन्नाला तिलांजली देणे कोणत्याही राज्याला शक्य होणार नाही. तसे केले तर अनेक कल्याणकारी योजनांवरही पाणी सोडावे लागेल. तेव्हा एका कल्याणाचा विचार करताना अनेकांचे अकल्याणही करणे कितपत योग्य ठरेल? भारतातील अल्कोहोल उद्योग हा जगातील तिसºया क्रमांकाचा मोठा उद्योग आहे. जगातले सर्वाधिक व्हिस्कीचे उत्पादन भारतात होते. एकट्या उत्तर प्रदेश राज्याला अल्कोहोलपासून ३५० बिलियन रुपयांचे उत्पन्न होते! महाराष्टÑात ते १००० बिलियन रुपये इतके आहे. अल्कोहोलच्या एकूण उत्पन्नातील ६० टक्के हिस्सा हा दक्षिण भारताचा आहे. मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात झालेल्या वाढीमुळे मद्य सेवनाचे प्रमाण वाढले आहे. २०२२ सालापर्यंत अल्कोहोलचा वापर १६.८० बिलियन लीटरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. वाइन आणि व्होडका पिणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. जगात व्हिस्कीचा जेवढा खप होतो त्यापैकी ६० टक्के खप एकट्या भारतात होतो. तेव्हा एवढ्या मोठ्या बाजारपेठेवर बंदी आणणे कसे शक्य आहे?आता लोकसभेच्या निवडणुका होण्याच्या मार्गावर आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशाप्रमाणे दारूचा वापरही मोठ्या प्रमाणात होत असतो. दारू पिण्यासाठी कोणतेही कारण चालते. शेतकºयांना मिळणारी कर्जमाफी किंवा बेरोजगारांना मिळणारा बेकारी भत्ता यासारख्या गोष्टी फुकटात मिळणाºया असल्याने त्यांचा विनियोग कशाप्रकारे होईल हे सांगणे सहज शक्य आहे. राजकीय पक्ष राजकीय लाभासाठी दारूबंदीसारखे उपाय योजतात, पण त्यामुळेच परवानगीशिवाय दारू गाळण्याच्या व्यवसायाला ऊत येतो. अशा वेळी स्वस्तातल्या वस्तूंचा वापर करून अधिक नफा कमावण्याच्या मागे उत्पादक असतात.बेकायदा दारूच्या उद्योगाने करचुकवेगिरीही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे हातभट्टीची दारू स्वस्तात पुरविणे शक्य होते, पण त्याचे परिणामही घातक होत असतात. त्यातूनच दारू पिऊन मृत्यूला सामोरे जाणाºयांच्या प्रमाणात वाढ होत आहे. मूर्खपणा करण्यासाठीलागणारी सहनशीलता अल्कोहोलच्या सेवनाने मिळत असते, पण थोडासा मूर्खपणा फारसा घातकनसतो. मोठ्या प्रमाणातील मूर्खपणा मात्र अक्षम्य असाच आहे!(माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस, बंगळुरू)