शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

हवामान बदलाच्या नांदीला मिळतोय युवा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 01:56 IST

आपल्या देशात सध्या निवडणुकांचे पडघम वाजताहेत आणि एकूणच शैक्षणिक क्षेत्रात परीक्षा सुरू आहेत. किमानपक्षी तसं वातावरण तरी आहे. मात्र याचवेळी जगामधील बऱ्याच शालेय विद्यार्थ्यांचं मात्र एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन सुरू आहे.

-  शैलेश माळोदे (विज्ञान लेखक)आपल्या देशात सध्या निवडणुकांचे पडघम वाजताहेत आणि एकूणच शैक्षणिक क्षेत्रात परीक्षा सुरू आहेत. किमानपक्षी तसं वातावरण तरी आहे. मात्र याचवेळी जगामधील बऱ्याच शालेय विद्यार्थ्यांचं मात्र एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन सुरू आहे. १५ मार्च २०१९ च्या शुक्रवारपासून बहुतांश विकसित आणि बऱ्याच विकसनशील देशांतल्या विद्यार्थ्यांनी जगातल्या नेत्यांनी ‘हवामान बदलाच्या’ संकटावर ठोस कृती करावी म्हणून शाळेतून बाहेर पडून आपापल्या देशांतील संसदेपुढे धरणं धरून आंदोलन सुरू केलंय. सरकारांनी केवळ चर्चेची गुºहाळं चालवून आणि कुरघोडीचं राजकारण न करता ठोस निर्णय घेऊन या सर्व लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यवाही करावी म्हणून दर शुक्रवारी हे आंदोलन स्वयंस्फूर्तीने विद्यार्थ्यांनी सुरू केलंय.जानेवारी २०१९ पासून व्हनेसा नकाते नावाच्या एका २२ वर्षीय तरुणीनं बºयाचदा एकटीने, काही वेळा मित्र आणि भावंडांच्या मदतीनं युगांडाची राजधानी कंपालामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दर शुक्रवारी आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्याकरिता ती कारच्या बॅटरीज विकण्याच्या कामावरदेखील शुक्रवारी उशिरा जात असे. कधी ती एखाद्या मॉलसमोर उभी राहून तर कधी संसदेजवळ ती धरणं धरत असे. तिचं उद्दिष्ट एकच ते म्हणजे ‘हवामान बदलाकडे’ लक्ष वेधून तिच्या सरकारला कृती करण्याचं आवाहन करणं.१५ मार्चपासून मात्र नकाते एकटी नसून जगभरातील १७०० शहरांतील (१०० देशांमधील) हजारो तरुण-तरुणी प्रौढांना हवामान बदलास तोंड देण्यासाठी ठोस काही करण्याची मागणी करताहेत. नेपाळपासून ते राबुटूसारख्या छोट्या देशांपर्यंतचे विद्यार्थी नीती निर्धारक आणि बड्या बहुराष्टÑीय कंपन्यांच्या सीईओंना जागृत करण्यासाठी जोरदारपणे प्रयत्न करताहेत. भारतात सध्या निवडणुका आहेतच तेव्हा याबाबत जागरूकता निर्माण करण्याची एक संधी असून राजकीय पक्षांपुढे आपल्या विचारांना ठेवता येणं शक्य आहे. मात्र त्याचवेळी शाळांमध्ये परीक्षा आणि नंतरच्या सुट्ट्या असल्यामुळे हवामान बदलाचा मोठा धोका असलेल्या भारतासारख्या देशात याविषयी काहीशी सुस्त परिस्थिती आहे.तरुण आळशी असतात अशी धारणा जगातील या आंदोलनामुळे चुकीची असल्याचं दिसून येतंय. त्याचबरोबर सरकारांनी पुढील पिढ्यांवरील वाईट प्रभावांना दूर करण्यासाठी प्राधान्यक्रम देणं आता गरजेचं ठरतंय. सामाजिक माध्यमांमुळे अधिकाधिक तरुण याबाबत जागृत होत आहेत. त्यांनी आपल्या शाळा-कॉलेजामधून बाहेर पडून असं आंदोलन करण्यास काही राजकारण्यांचा (ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासहित) विरोध असला तरी जगभरातील शास्त्रज्ञांनी मात्र आंदोलनास पाठिंबा दिलाय. हवामान आंदोलनाची कल्पना खूपच भारी आणि नावीन्यपूर्ण आहे, यात वाद नाही. अवघ्या काही महिन्यांमध्ये या ‘ग्रासरुट्स’वरील आंदोलनाने एका सार्वत्रिक आंदोलनाचं रूप धारण करण्यास सुरुवात केलीय. नकातेसारख्या अनेक आंदोलकांना ग्रेटा थुनबर्ग या स्विडीश किशोरी (टीनएजर) पासून प्रेरणा लाभलीय. तिने आॅगस्ट २०१८ पासून नियमितपणे वर्गातून बाहेर पडून स्विडीश संसदेसमोर स्टॉकहोमला स्कूल स्ट्राइक फॉर क्लायमेट या अर्थाचा नामफलक घेऊन बसण्यास सुरुवात केली होती.थुनबर्गचं उदाहरण लक्षात घेऊन बेल्जियम ते आॅस्ट्रेलियामध्ये हजारांनी गेल्या काही महिन्यांत अशी आंदोलनं केली आहेत. मात्र १५ मार्चच्या घटनेनंतर तरुण आंदोलकांनी त्यांच्या देशात हॅशटॅग tridays for future आणि yuth strike 4 climate  याद्वारे सामाजिक माध्यमांवर धूम उडवून दिलीय. थुनबर्ग या तरुणांच्या आंदोलनाची फिगरहेड बनलीय. मोठ्यांच्या हवामान बदलाविषयीच्या बेफिकिरीमुळे त्याच्या विरोधात प्रतीक म्हणून तिला जगभर प्रसिद्धी लाभलीय. कॅटोवाइस (पीलंड) मधील संयुक्त राष्टÑांच्या हवामान परिषदेत केलेल्या भाषणात ती म्हणते, ‘‘तुम्ही म्हणता की तुम्ही तुमच्या मुलांवर इतर कशापेक्षाही अधिक प्रेम करता आणि तरीही त्यांच्या डोळ्यादेखत तुम्ही त्यांचं भविष्य चोरून घेत आहात.’’सोपा पर्याय शोधणं हे राजकारण्यांचं नेहमीचं धोरण असतं. त्यामुळे भारतात सध्या निवडणुका होऊ घातल्यामुळे भविष्याचे वारे कुणीकडे वाहताहेत हे लक्षात घेऊन उपभोगात मश्गूल नागरिकांना या तरुणांच्या देशाच्या भविष्याकडे डोळे उघडून बघणं भागच आहे. अन्यथा सामाजिक असंतोष आणि युवाशक्ती हे एक विध्वसंक समीकरण ठरू शकतं.

टॅग्स :weatherहवामान