शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

तुम्ही तरी पुढे जा, नाहीतर दुसऱ्याला रस्ता द्या! ममता बॅनर्जींचा भाजपशी गुप्त समझोता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 08:34 IST

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बदलत्या भूमिकांबाबत डेरेक ओ’ब्रायन यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेला संवाद.

- डेरेक ओ’ब्रायन

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराला मत न देणे हे सत्तापक्षाचे अप्रत्यक्ष समर्थन नाही का? वैचारिक पातळीवरून तर जाऊच द्या; व्यावहारिक स्तरावरही तृणमूल काँग्रेसने भाजपशी कधीही समझोता केलेला नाही. आमचा पूर्वेतिहास हेच सांगेल. खरे तर हा प्रश्नच गैरलागू आहे. एनडीएचे उमेदवार जयदीप धनखड यांचे ते पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना तृणमूल काँग्रेसशी कसे नाते होते, ते जगजाहीर आहे. त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देणे अशक्यच आहे.

मग मार्गारेट अल्वा यांनी असे काय केले की आपण त्यांनाही पाठिंबा दिला नाही? आम्ही अल्वा यांचा आदर करतो. ममतादीदींचे त्यांच्याशी सलोख्याचे नाते आहे; परंतु काँग्रेस ज्या प्रकारचे राजकारण करीत आहे, त्याला आमचा विरोध आहे. संसदेत आम्ही विरोधी पक्षांमधला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा संसदीय पक्ष आहोत. विरोधी पक्षाचा उमेदवार ठरवताना आमचे म्हणणे समजून घेतले गेले नाही. आम्हाला त्यांच्या उमेदवारीबद्दल केवळ माहिती दिली गेली. हे कसे चालेल? 

काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, सोनिया गांधी यांनी स्वतः दोनदा ममता बॅनर्जी यांच्याशी बोलणे केले होते. शरद पवार यांनीही त्यांच्याशी सल्लामसलत केली होती. मग अडचण कोठे आहे?विरोधी पक्षाचे उमेदवार कोण आहेत, हे आम्हाला केवळ पंधरा मिनिटे आधी सांगण्यात आले होते. कुठलाही सल्ला घेतला गेला नव्हता. 

तृणमूल काँग्रेसला आपला सन्मान विरोधी पक्षांच्या एकतेपेक्षा मोठा वाटतो का? काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करायचे आहे; परंतु इतरांना  बरोबरीचा दर्जा द्यायची त्यांची इच्छा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दलासारखे पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ‘यूपीए’चा भाग आहेत. त्यांच्याशी त्यांनी हवा तसा व्यवहार करावा; परंतु तृणमूल काँग्रेस आघाडीमध्ये नाही; म्हणून विरोधी पक्षांमध्ये आमचा वेगळा दर्जा आहे. हीच गोष्ट आम्ही काँग्रेसला सांगू इच्छितो.

भाजपशी आपला काही गुप्त समझोता झाला आहे का? जगदीश धनखड यांना विरोध असतानाही ममता बॅनर्जी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सर्मा यांच्या उपस्थितीत दार्जीलिंगमध्ये त्यांच्याशी बोलणे केले. त्याचा काय अर्थ? एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चहा घेणे म्हणजे गुप्त समझोत्याचा संकेत असतो का? जगदीश धनखड पश्चिम बंगाल सोडून जात होते आणि दार्जिलिंग पश्चिम बंगालचा भाग आहे. निरोपाच्या मुलाखतीचा वेगळा अर्थ काढता कामा नये. तृणमूल काँग्रेस कधीच भाजपशी कुठल्याही प्रकारच्या समझोत्याचा विचारही करू शकत नाही.

काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत असफल होत आहे, असा याचा अर्थ घ्यायचा का? संकेतांनी विरोध होत नाही आणि केवळ पत्रकबाजीनेही होत नाही. काँग्रेस पक्ष जनतेशी जोडलेल्या मुद्द्यांवर सरकारला पिंजऱ्यात उभे करण्यात असफल ठरत आहे. मग तो महागाईचा मुद्दा असो वा बेरोजगारीचा. माध्यमांचे स्वातंत्र्य असो वा संस्थांची स्वायत्तता. ती संपवून टाकण्याचा नेतृत्वाचा एकच नियम असतो: एक तर तुम्ही पुढे जा किंवा दुसऱ्याला रस्ता मोकळा करून द्या.

विरोधी पक्षांमध्ये आपापसांत चाललेली लढाई सत्तारूढ पक्षासाठी शुभसंकेत नाही का? आपण भाजपचा रस्ता सोपा करता आहात.. अजिबात नाही. मी पुन्हा सांगतो, आपण तृणमूल काँग्रेसचा पूर्वेतिहास पहा. संसदेच्या सभागृहात आणि बाहेर रस्त्यावर भाजपचा सर्वाधिक कडवा विरोध तृणमूल काँग्रेसच करीत आहे. आम्ही त्यांना केवळ निवडणुकीत  वारंवार हरवलेले नाही, तर त्यांची  जनतेच्या विरुद्ध असलेली पोकळ धोरणेही उघड केली आहेत.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी