शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

तुम्ही तरी पुढे जा, नाहीतर दुसऱ्याला रस्ता द्या! ममता बॅनर्जींचा भाजपशी गुप्त समझोता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 08:34 IST

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बदलत्या भूमिकांबाबत डेरेक ओ’ब्रायन यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेला संवाद.

- डेरेक ओ’ब्रायन

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराला मत न देणे हे सत्तापक्षाचे अप्रत्यक्ष समर्थन नाही का? वैचारिक पातळीवरून तर जाऊच द्या; व्यावहारिक स्तरावरही तृणमूल काँग्रेसने भाजपशी कधीही समझोता केलेला नाही. आमचा पूर्वेतिहास हेच सांगेल. खरे तर हा प्रश्नच गैरलागू आहे. एनडीएचे उमेदवार जयदीप धनखड यांचे ते पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना तृणमूल काँग्रेसशी कसे नाते होते, ते जगजाहीर आहे. त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देणे अशक्यच आहे.

मग मार्गारेट अल्वा यांनी असे काय केले की आपण त्यांनाही पाठिंबा दिला नाही? आम्ही अल्वा यांचा आदर करतो. ममतादीदींचे त्यांच्याशी सलोख्याचे नाते आहे; परंतु काँग्रेस ज्या प्रकारचे राजकारण करीत आहे, त्याला आमचा विरोध आहे. संसदेत आम्ही विरोधी पक्षांमधला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा संसदीय पक्ष आहोत. विरोधी पक्षाचा उमेदवार ठरवताना आमचे म्हणणे समजून घेतले गेले नाही. आम्हाला त्यांच्या उमेदवारीबद्दल केवळ माहिती दिली गेली. हे कसे चालेल? 

काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, सोनिया गांधी यांनी स्वतः दोनदा ममता बॅनर्जी यांच्याशी बोलणे केले होते. शरद पवार यांनीही त्यांच्याशी सल्लामसलत केली होती. मग अडचण कोठे आहे?विरोधी पक्षाचे उमेदवार कोण आहेत, हे आम्हाला केवळ पंधरा मिनिटे आधी सांगण्यात आले होते. कुठलाही सल्ला घेतला गेला नव्हता. 

तृणमूल काँग्रेसला आपला सन्मान विरोधी पक्षांच्या एकतेपेक्षा मोठा वाटतो का? काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करायचे आहे; परंतु इतरांना  बरोबरीचा दर्जा द्यायची त्यांची इच्छा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दलासारखे पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ‘यूपीए’चा भाग आहेत. त्यांच्याशी त्यांनी हवा तसा व्यवहार करावा; परंतु तृणमूल काँग्रेस आघाडीमध्ये नाही; म्हणून विरोधी पक्षांमध्ये आमचा वेगळा दर्जा आहे. हीच गोष्ट आम्ही काँग्रेसला सांगू इच्छितो.

भाजपशी आपला काही गुप्त समझोता झाला आहे का? जगदीश धनखड यांना विरोध असतानाही ममता बॅनर्जी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सर्मा यांच्या उपस्थितीत दार्जीलिंगमध्ये त्यांच्याशी बोलणे केले. त्याचा काय अर्थ? एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चहा घेणे म्हणजे गुप्त समझोत्याचा संकेत असतो का? जगदीश धनखड पश्चिम बंगाल सोडून जात होते आणि दार्जिलिंग पश्चिम बंगालचा भाग आहे. निरोपाच्या मुलाखतीचा वेगळा अर्थ काढता कामा नये. तृणमूल काँग्रेस कधीच भाजपशी कुठल्याही प्रकारच्या समझोत्याचा विचारही करू शकत नाही.

काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत असफल होत आहे, असा याचा अर्थ घ्यायचा का? संकेतांनी विरोध होत नाही आणि केवळ पत्रकबाजीनेही होत नाही. काँग्रेस पक्ष जनतेशी जोडलेल्या मुद्द्यांवर सरकारला पिंजऱ्यात उभे करण्यात असफल ठरत आहे. मग तो महागाईचा मुद्दा असो वा बेरोजगारीचा. माध्यमांचे स्वातंत्र्य असो वा संस्थांची स्वायत्तता. ती संपवून टाकण्याचा नेतृत्वाचा एकच नियम असतो: एक तर तुम्ही पुढे जा किंवा दुसऱ्याला रस्ता मोकळा करून द्या.

विरोधी पक्षांमध्ये आपापसांत चाललेली लढाई सत्तारूढ पक्षासाठी शुभसंकेत नाही का? आपण भाजपचा रस्ता सोपा करता आहात.. अजिबात नाही. मी पुन्हा सांगतो, आपण तृणमूल काँग्रेसचा पूर्वेतिहास पहा. संसदेच्या सभागृहात आणि बाहेर रस्त्यावर भाजपचा सर्वाधिक कडवा विरोध तृणमूल काँग्रेसच करीत आहे. आम्ही त्यांना केवळ निवडणुकीत  वारंवार हरवलेले नाही, तर त्यांची  जनतेच्या विरुद्ध असलेली पोकळ धोरणेही उघड केली आहेत.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी