शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेत खाणारे कुंपण, तर सरकार आणि लोकप्रतिनिधी एवढे शांत बसले असते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 07:56 IST

दुष्काळ, अतिवृष्टी, शेतमालाचे घसरलेले भाव आणि आता निकृष्ट बियाणे. या फेऱ्यात विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी अडकला आहे. यंदा निर्माण झालेला प्रश्न सोयाबीन-ऐवजी उसाचा राहिला असता, तर सरकार आणि लोकप्रतिनिधी एवढे शांत बसले असते का?

बीड जिल्ह्यातील नांदूरघाटच्या लालासाहेब दादाराव तांदळे या अल्पभूधारक शेतकºयाने बायकोच्या कानातील दागिना विकून सोयाबीनची पेरणी केली आणि बियाणे बनावट निघाले. ते उगवलेच नाही. अगोदरच परिस्थितीने गांजलेल्या लालासाहेब यांनी दुकानदाराकडे तक्रार केली; पण त्यानेही हात वर केल्यामुळे दुकानासमोरच त्याने जाळून घेण्याचा प्रयत्न केला. राज्यातील सोयाबीन पेरणाºया शेतकऱ्यांसमोरील संकटाचे हे प्रातिनिधीक उदाहरण म्हणता येईल. देशाच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा चाळीस टक्के आणि त्यापेक्षा जास्त मध्यप्रदेशचा. महाराष्टÑात विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रदेशांतच या पिकाची लागवड होते; तरीही हा प्रश्न ऐरणीवर आला तो ‘लोकमत’ने वाचा फोडली तेव्हाच. अनेक जिल्ह्यांत तर दुबार पेरणी करूनही बियाणे उगवले नाही. एकट्या मराठवाड्यात या तक्रारी आहेत ४६ हजार ९५८ आणि केवळ १८ गुन्हे दाखल झाले. अल्पभूधारक, कोरडवाहू प्रश्न ऐरणीवर आणल्यानंतर उच्च न्यायालयाने याची दखल घेत कृषी खात्याचे कान पिळले; परंतु शेतकºयांच्या प्रश्नांकडे पाहण्याबाबत प्रशासन किती उदासीन आहे हे यातून स्पष्ट झाले. अल्पभूधारक आणि त्यातही कोरडवाहू शेतकºयाचा एक हंगाम बुडाला तर त्याच्यादृष्टीने तो जीवन मरणाचा प्रश्न असतो. तरीही इतक्या तक्रारी येऊनसुद्धा कृषी खाते सुस्त बसले होते. हा सगळा दोष शेतकºयांच्या माथी मारून बियाणे कंपन्यांना सहीसलामत मोकळे करण्याचा प्रयत्न कृषी खात्याने केला आणि तशी माहिती उच्च न्यायालयात सादर केली. यावरून न्यायालयाने या खात्याच्या अधिकाºयांवर ताशेरे ओढले. यापूर्वी बनावट बियाणे पुरविणाºया कंपन्यांवर दखलपात्र गुन्हे दाखल करा या न्यायालयाच्या  आदेशालाही ‘वाटाण्याच्या अक्षता’ लावण्याचे धारिष्ट्य या अधिकाºयांनी दाखविले. यावरूनच कृषी खाते आणि बियाणे कंपन्यांतील साटेलोटे उघड होते. हे करत असताना आपण निरपराध लोकांच्या जिवाशी खेळत आहोत याचे साधे भान कंपन्यांना नाही. त्यांना तर व्यापार करायचा आहे; पण त्यांच्यावर  नियंत्रण ठेवण्याची कायदेशीर जबाबदारी असणारे कृषी खातेच या कंपन्यांच्या कच्छपी लागलेले दिसते.

यावर्षी सरकारन घोषणा केली; पण उभ्या महाराष्ट्रात एकाही शेतकºयाला बांधावर खत मिळाले नाही. उलट खतांची साठेबाजी व काळाबाजार हा खुद्द कृषीमंत्र्यांनी ‘स्टिंग आॅपरेशन’ करून उघडा पाडला. निकृष्ट बियाणे, खतांची टंचाई या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी कृषी खात्याची यंत्रणाच आहे आणि या खात्यावर वचक नाही. आश्चर्य असे की यावर्षी ओरड होऊनसुद्धा एकाही लोकप्रतिनिधीला याची दखल घ्यावी, असे वाटले नाही. बनावट बियाणे बाजारात येण्याचे कारण यावर्षी सोयाबीनच्या बियाणांचा तुटवडा निर्माण होणार, याची कल्पना होती. परतीचा पाऊस लांबला आणि अवकाळी पावसाच्या हजेरीने रब्बीचे सोयाबीन पीक आले नाही. त्यामुळे बियाणे कंपन्यांनी प्रमाणित नसलेल्या सोयाबीनचा बियाणे म्हणून पुरवठा केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट बियाणे बाजारात येतात आणि ती निर्धाेकपणे विकली जातात, याचाच अर्थ कृषी खात्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे होऊच शकत नाही; पण ओरड व्हायला सुरुवात झाली त्यावेळी या अधिकाºयांनी तुरळक तक्रारी दाखल केल्या. बियाणे विक्री करणाºया दुकानदारांवर गुन्हे दाखल करू नये म्हणून त्यांच्या संघटनेने तीन दिवस बंदची हाक दिली आहे. बियाणांचे उत्पादन ते करत नाही. कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर ती विकतात, हा त्यांचा मुद्दा अर्धा बरोबर आहे; पण शेतकºयांना गुणवत्ता असलेल्या बियाणांची विक्री करणे हे त्यांचे नैतिक कर्तव्य आहे. शेवटी आमच्या शेतकºयांचा कंपन्यांपेक्षा दुकानदारांवरच विश्वास असतो. हाच विश्वास सार्थ ठरविणे हे त्यांचे कर्तव्य ठरते. दर्जेदार बियाणे बाजारात उपलब्ध करून देण्याची कायदेशीर जबाबदारी कृषी खात्याची आहे. त्यांचे नियंत्रण असेल तर बनावट बियाणांचा शिरकावदेखील अशक्य आहे; पण कुंपणच शेत खात असेल तर...

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीGovernmentसरकार