शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘‘कार्यारंभी नमन तुजला’’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:35 IST

कोणत्याही कार्याचा प्रारंभ महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे जीवनाचा, नववर्षाचा प्रारंभ महत्त्वपूर्ण असतो. कार्यारंभी गणेशाचं स्तवन, वंदन करण्याची प्राचीन प्रथा आहे, विघ्नांचा नाश करून कार्य निर्विघ्नपणानं पार पडण्यास श्रीगणेश साहाय्य करतो.

- कौमुदी गोडबोलेकोणत्याही कार्याचा प्रारंभ महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे जीवनाचा, नववर्षाचा प्रारंभ महत्त्वपूर्ण असतो. कार्यारंभी गणेशाचं स्तवन, वंदन करण्याची प्राचीन प्रथा आहे, विघ्नांचा नाश करून कार्य निर्विघ्नपणानं पार पडण्यास श्रीगणेश साहाय्य करतो. त्याला नमन करून, त्याचं पूजन करून विनंती केली की तो प्रसन्न होतो. संपूर्ण कार्यामध्ये भक्कमपणानं पाठीशी उभा राहतो, अशा गणरायाला पूजनामध्ये अग्रस्थान असणं स्वाभाविक आहे.श्रीगणेशाचं रूप मोठं मनोहारी आहे, त्याच्या वर्णाच्या छटादेखील विविध आहेत. कुठे तो सावळ्या रंगात रंगतो तर कुठे गौर वर्णानं उजळून उठतो. गणपतीची लवचिक सोंड, सूक्ष्माचा वेध घेणारे छोटे नेत्र, सकल भक्तांची पापं पोटामध्ये साठविणारं महाकाय लंबोदर ! रंग, रूप, आकार यामध्ये असणारा वेगळेपणा मनात भरणारा ! कलियुगामध्ये कली प्रबल झाल्यामुळे सद्बुद्धी प्रदान करणाºया गणेशाची उपासना आवश्यक आहे. कार्याला, कामाला, उपक्रमाला आरंभ करून नंतर ते पूर्णत्वाला न नेणाºया आरंभशूरांची संख्या भरपूर आहे. कली बुद्धीमध्ये शिरला की तो संशय, आळस अशा अडचणी उभ्या करतो. माणसाची मती संभ्रमित झाली की कार्याला खीळ बसते. गजाननाला अनन्यभावानं भजलं की तो प्रारंभापासून कार्य पूर्णत्वाला जाईपर्यंत सांभाळतो.लौकिकामध्ये यश प्राप्त करून देणारा श्रीगणेश मोठा मायाळू आहे. रक्तवर्णी जास्वंदाचं फूल अर्पण केलं की तो सकल युद्ध थांबवतो. हिरवीगार एकवीस दुर्वांची जुडी वाहिली की भक्तांना षड्रिंपूच्या दाहापासून दूर नेतो. एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखविला की भक्तांच्या जीवनामधील कटू, कडवट अशा वैरभावना शमवतो. मनामध्ये गोडवा, प्रेम निर्माण करतो. गुळाचा गोडवा आणि खोबºयामधील स्निग्धता हृदयातून थेट आचरणामधे उतरवतो. मग कुमती सुमती होऊन जाते. अज्ञानाचा अंध:कार दूर सारतो. ज्ञानाच्या अलौकिक प्रकाशानं जीवन उजळून टाकतो. व्यावहारिक जगतामध्ये यश तर देतोच. त्याचसमवेत अध्यात्माच्या आशयाचं आकलन करून देतो. मग जल्लोश गणेशाच्या नावाचा.. त्याच्या तेजस्वी आरतीचा.. टाळांचा आणि टाळ्यांच्या गजराचा होणं आवश्यक आहे. केक, मेणबत्त्या आणि अयोग्य पदार्थांच भक्षण करून कधी आनंदोत्सव पूर्णत्वाला जाणं शक्य नाही. मोदक, निरांजनाचं तेजाळणं.. सात्विकतेचा उत्सव.. अक्षय आनंद प्रदान करून जीवन परिपूर्ण आणि आशयघन करेल यात शंका नाही.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवMaharashtraमहाराष्ट्र