शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

‘‘कार्यारंभी नमन तुजला’’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:35 IST

कोणत्याही कार्याचा प्रारंभ महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे जीवनाचा, नववर्षाचा प्रारंभ महत्त्वपूर्ण असतो. कार्यारंभी गणेशाचं स्तवन, वंदन करण्याची प्राचीन प्रथा आहे, विघ्नांचा नाश करून कार्य निर्विघ्नपणानं पार पडण्यास श्रीगणेश साहाय्य करतो.

- कौमुदी गोडबोलेकोणत्याही कार्याचा प्रारंभ महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे जीवनाचा, नववर्षाचा प्रारंभ महत्त्वपूर्ण असतो. कार्यारंभी गणेशाचं स्तवन, वंदन करण्याची प्राचीन प्रथा आहे, विघ्नांचा नाश करून कार्य निर्विघ्नपणानं पार पडण्यास श्रीगणेश साहाय्य करतो. त्याला नमन करून, त्याचं पूजन करून विनंती केली की तो प्रसन्न होतो. संपूर्ण कार्यामध्ये भक्कमपणानं पाठीशी उभा राहतो, अशा गणरायाला पूजनामध्ये अग्रस्थान असणं स्वाभाविक आहे.श्रीगणेशाचं रूप मोठं मनोहारी आहे, त्याच्या वर्णाच्या छटादेखील विविध आहेत. कुठे तो सावळ्या रंगात रंगतो तर कुठे गौर वर्णानं उजळून उठतो. गणपतीची लवचिक सोंड, सूक्ष्माचा वेध घेणारे छोटे नेत्र, सकल भक्तांची पापं पोटामध्ये साठविणारं महाकाय लंबोदर ! रंग, रूप, आकार यामध्ये असणारा वेगळेपणा मनात भरणारा ! कलियुगामध्ये कली प्रबल झाल्यामुळे सद्बुद्धी प्रदान करणाºया गणेशाची उपासना आवश्यक आहे. कार्याला, कामाला, उपक्रमाला आरंभ करून नंतर ते पूर्णत्वाला न नेणाºया आरंभशूरांची संख्या भरपूर आहे. कली बुद्धीमध्ये शिरला की तो संशय, आळस अशा अडचणी उभ्या करतो. माणसाची मती संभ्रमित झाली की कार्याला खीळ बसते. गजाननाला अनन्यभावानं भजलं की तो प्रारंभापासून कार्य पूर्णत्वाला जाईपर्यंत सांभाळतो.लौकिकामध्ये यश प्राप्त करून देणारा श्रीगणेश मोठा मायाळू आहे. रक्तवर्णी जास्वंदाचं फूल अर्पण केलं की तो सकल युद्ध थांबवतो. हिरवीगार एकवीस दुर्वांची जुडी वाहिली की भक्तांना षड्रिंपूच्या दाहापासून दूर नेतो. एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखविला की भक्तांच्या जीवनामधील कटू, कडवट अशा वैरभावना शमवतो. मनामध्ये गोडवा, प्रेम निर्माण करतो. गुळाचा गोडवा आणि खोबºयामधील स्निग्धता हृदयातून थेट आचरणामधे उतरवतो. मग कुमती सुमती होऊन जाते. अज्ञानाचा अंध:कार दूर सारतो. ज्ञानाच्या अलौकिक प्रकाशानं जीवन उजळून टाकतो. व्यावहारिक जगतामध्ये यश तर देतोच. त्याचसमवेत अध्यात्माच्या आशयाचं आकलन करून देतो. मग जल्लोश गणेशाच्या नावाचा.. त्याच्या तेजस्वी आरतीचा.. टाळांचा आणि टाळ्यांच्या गजराचा होणं आवश्यक आहे. केक, मेणबत्त्या आणि अयोग्य पदार्थांच भक्षण करून कधी आनंदोत्सव पूर्णत्वाला जाणं शक्य नाही. मोदक, निरांजनाचं तेजाळणं.. सात्विकतेचा उत्सव.. अक्षय आनंद प्रदान करून जीवन परिपूर्ण आणि आशयघन करेल यात शंका नाही.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवMaharashtraमहाराष्ट्र