शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘‘कार्यारंभी नमन तुजला’’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:35 IST

कोणत्याही कार्याचा प्रारंभ महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे जीवनाचा, नववर्षाचा प्रारंभ महत्त्वपूर्ण असतो. कार्यारंभी गणेशाचं स्तवन, वंदन करण्याची प्राचीन प्रथा आहे, विघ्नांचा नाश करून कार्य निर्विघ्नपणानं पार पडण्यास श्रीगणेश साहाय्य करतो.

- कौमुदी गोडबोलेकोणत्याही कार्याचा प्रारंभ महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे जीवनाचा, नववर्षाचा प्रारंभ महत्त्वपूर्ण असतो. कार्यारंभी गणेशाचं स्तवन, वंदन करण्याची प्राचीन प्रथा आहे, विघ्नांचा नाश करून कार्य निर्विघ्नपणानं पार पडण्यास श्रीगणेश साहाय्य करतो. त्याला नमन करून, त्याचं पूजन करून विनंती केली की तो प्रसन्न होतो. संपूर्ण कार्यामध्ये भक्कमपणानं पाठीशी उभा राहतो, अशा गणरायाला पूजनामध्ये अग्रस्थान असणं स्वाभाविक आहे.श्रीगणेशाचं रूप मोठं मनोहारी आहे, त्याच्या वर्णाच्या छटादेखील विविध आहेत. कुठे तो सावळ्या रंगात रंगतो तर कुठे गौर वर्णानं उजळून उठतो. गणपतीची लवचिक सोंड, सूक्ष्माचा वेध घेणारे छोटे नेत्र, सकल भक्तांची पापं पोटामध्ये साठविणारं महाकाय लंबोदर ! रंग, रूप, आकार यामध्ये असणारा वेगळेपणा मनात भरणारा ! कलियुगामध्ये कली प्रबल झाल्यामुळे सद्बुद्धी प्रदान करणाºया गणेशाची उपासना आवश्यक आहे. कार्याला, कामाला, उपक्रमाला आरंभ करून नंतर ते पूर्णत्वाला न नेणाºया आरंभशूरांची संख्या भरपूर आहे. कली बुद्धीमध्ये शिरला की तो संशय, आळस अशा अडचणी उभ्या करतो. माणसाची मती संभ्रमित झाली की कार्याला खीळ बसते. गजाननाला अनन्यभावानं भजलं की तो प्रारंभापासून कार्य पूर्णत्वाला जाईपर्यंत सांभाळतो.लौकिकामध्ये यश प्राप्त करून देणारा श्रीगणेश मोठा मायाळू आहे. रक्तवर्णी जास्वंदाचं फूल अर्पण केलं की तो सकल युद्ध थांबवतो. हिरवीगार एकवीस दुर्वांची जुडी वाहिली की भक्तांना षड्रिंपूच्या दाहापासून दूर नेतो. एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखविला की भक्तांच्या जीवनामधील कटू, कडवट अशा वैरभावना शमवतो. मनामध्ये गोडवा, प्रेम निर्माण करतो. गुळाचा गोडवा आणि खोबºयामधील स्निग्धता हृदयातून थेट आचरणामधे उतरवतो. मग कुमती सुमती होऊन जाते. अज्ञानाचा अंध:कार दूर सारतो. ज्ञानाच्या अलौकिक प्रकाशानं जीवन उजळून टाकतो. व्यावहारिक जगतामध्ये यश तर देतोच. त्याचसमवेत अध्यात्माच्या आशयाचं आकलन करून देतो. मग जल्लोश गणेशाच्या नावाचा.. त्याच्या तेजस्वी आरतीचा.. टाळांचा आणि टाळ्यांच्या गजराचा होणं आवश्यक आहे. केक, मेणबत्त्या आणि अयोग्य पदार्थांच भक्षण करून कधी आनंदोत्सव पूर्णत्वाला जाणं शक्य नाही. मोदक, निरांजनाचं तेजाळणं.. सात्विकतेचा उत्सव.. अक्षय आनंद प्रदान करून जीवन परिपूर्ण आणि आशयघन करेल यात शंका नाही.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवMaharashtraमहाराष्ट्र