शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

‘कार्यकर्ता’ संमेलनाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 04:10 IST

लक्ष्मीकांत देशमुख हे नाव काल-परवापर्यंत महाराष्ट्राला फार परिचित नव्हते. पण, आज या नावाची चर्चा केवळ महाराष्ट्रच नव्हे तर बृहन्महाराष्ट्रातील मराठीजनांमध्येही होतेय. याला कारणही तसेच आहे.

लक्ष्मीकांत देशमुख हे नाव काल-परवापर्यंत महाराष्ट्राला फार परिचित नव्हते. पण, आज या नावाची चर्चा केवळ महाराष्ट्रच नव्हे तर बृहन्महाराष्ट्रातील मराठीजनांमध्येही होतेय. याला कारणही तसेच आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचा अनुपम सोहळा अशी ज्याची ओळख आहे त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते नवनिर्वाचित अध्यक्ष ठरले आहेत. सनदी अधिकारी राहिलेले देशमुख संवेदनशील मनाचे लेखक आहेत. त्यांनी लिहिलेली बालमजुरीसंदर्भातील ‘हरवलेले बालपण' ही कादंबरी असेल किंवा स्त्रीभ्रूणहत्येवरील 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह असेल त्यांच्या लेखणीचा हा पिंड त्यांच्यातील संवेदनशील लेखकाचे दर्शन घडविणारा आहे. केवळ कथाच नाही तर कादंबरीसारखे प्रघल्भ आणि प्रदीर्घ लेखनही देशमुखांच्या हातून घडले आहे. 'इन्किलाब आणि जिहाद' ही कादंबरी त्याचे उत्तम उदाहरण आहे. समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग त्यांनी यात उलगडले आहेत. याशिवाय सहा कादंबºया, सात कथासंग्रह, दोन नाटके आणि इतर सहा-सात पुस्तके अशी साहित्यसंपदा देशमुखांच्या नावावर आहे. नाटक आणि चित्रपटाच्या क्षेत्रातही त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. या क्रमात त्यांनी कोल्हापुरात चित्रपट आणि ग्रंथ महोत्सवाच्या केलेल्या आयोजनाचे उदाहरण देता येईल. गोरेगाव फिल्मसिटीचे संचालक असताना त्यांनी अनेक कल्पक योजनांना कृतिरूप दिले आहे. थोडक्यात काय तर आयुष्यभर शासकीय शिस्त जोपासूनही त्यांनी समाजापासून स्वत:ची नाळ तुटू दिली नाही. म्हणूनच जेव्हा निवडणूक लढविण्याचा निर्धार पक्का झाला तेव्हा जाहीरनाम्यात त्यांनी मला कार्यकर्ता संमेलनाध्यक्ष व्हायचे आहे, असे आवर्जून नमूद केले आणि या निवडणुकीत विजयश्री मिळाल्यानंतरही अध्यक्षीय भाषणासाठी मी पत्र पाठवून मराठीजनांच्या सूचना, अपेक्षा मागविणार असल्याचे जाहीर केले. सर्वसामान्य साहित्यिकांचा संमेलनाध्यक्ष म्हणून देशमुखांचे वेगळेपण दर्र्शविण्यासाठी या दोन गोष्टी पुरेशा आहेत. त्यामुळे हे संमेलनाध्यक्षपद केवळ मिरवण्याची गोष्ट नाही, याची जाणीव देशमुखांना असेलच असा विश्वास आहे. त्यांच्या या विजयाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. मराठी भाषेच्या अभिजाततेचे झाडून सगळे पुरावे दिल्यानंतरही तो दर्जा अद्याप मराठीला मिळालेला नाही. शाळांमधील मराठीची स्थिती अतिशय बिकट आहे. ज्ञानभाषा तर सोडाच व्यवहाराची भाषा म्हणूनही मराठी मागे पडायला लागली आहे. नवोदित साहित्यिकांना मंच मिळत नाही, प्रकाशनाचा खर्च पेलत नाही. परिणामी समाजाला वैचारिक नेतृत्व देण्यात साहित्यिक कमी पडत आहेत. अर्थात देशमुख संमेलनाध्यक्ष झाल्याने हे काही एका रात्रीत बदलणार नाही. पण, देशमुखांच्या कार्यकाळात त्या दिशेने एक आश्वासक पाऊल टाकले जावे, अशी तमाम मराठीजनांची अपेक्षा आहे.

टॅग्स :marathiमराठी