शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘कार्यकर्ता’ संमेलनाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 04:10 IST

लक्ष्मीकांत देशमुख हे नाव काल-परवापर्यंत महाराष्ट्राला फार परिचित नव्हते. पण, आज या नावाची चर्चा केवळ महाराष्ट्रच नव्हे तर बृहन्महाराष्ट्रातील मराठीजनांमध्येही होतेय. याला कारणही तसेच आहे.

लक्ष्मीकांत देशमुख हे नाव काल-परवापर्यंत महाराष्ट्राला फार परिचित नव्हते. पण, आज या नावाची चर्चा केवळ महाराष्ट्रच नव्हे तर बृहन्महाराष्ट्रातील मराठीजनांमध्येही होतेय. याला कारणही तसेच आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचा अनुपम सोहळा अशी ज्याची ओळख आहे त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते नवनिर्वाचित अध्यक्ष ठरले आहेत. सनदी अधिकारी राहिलेले देशमुख संवेदनशील मनाचे लेखक आहेत. त्यांनी लिहिलेली बालमजुरीसंदर्भातील ‘हरवलेले बालपण' ही कादंबरी असेल किंवा स्त्रीभ्रूणहत्येवरील 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह असेल त्यांच्या लेखणीचा हा पिंड त्यांच्यातील संवेदनशील लेखकाचे दर्शन घडविणारा आहे. केवळ कथाच नाही तर कादंबरीसारखे प्रघल्भ आणि प्रदीर्घ लेखनही देशमुखांच्या हातून घडले आहे. 'इन्किलाब आणि जिहाद' ही कादंबरी त्याचे उत्तम उदाहरण आहे. समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग त्यांनी यात उलगडले आहेत. याशिवाय सहा कादंबºया, सात कथासंग्रह, दोन नाटके आणि इतर सहा-सात पुस्तके अशी साहित्यसंपदा देशमुखांच्या नावावर आहे. नाटक आणि चित्रपटाच्या क्षेत्रातही त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. या क्रमात त्यांनी कोल्हापुरात चित्रपट आणि ग्रंथ महोत्सवाच्या केलेल्या आयोजनाचे उदाहरण देता येईल. गोरेगाव फिल्मसिटीचे संचालक असताना त्यांनी अनेक कल्पक योजनांना कृतिरूप दिले आहे. थोडक्यात काय तर आयुष्यभर शासकीय शिस्त जोपासूनही त्यांनी समाजापासून स्वत:ची नाळ तुटू दिली नाही. म्हणूनच जेव्हा निवडणूक लढविण्याचा निर्धार पक्का झाला तेव्हा जाहीरनाम्यात त्यांनी मला कार्यकर्ता संमेलनाध्यक्ष व्हायचे आहे, असे आवर्जून नमूद केले आणि या निवडणुकीत विजयश्री मिळाल्यानंतरही अध्यक्षीय भाषणासाठी मी पत्र पाठवून मराठीजनांच्या सूचना, अपेक्षा मागविणार असल्याचे जाहीर केले. सर्वसामान्य साहित्यिकांचा संमेलनाध्यक्ष म्हणून देशमुखांचे वेगळेपण दर्र्शविण्यासाठी या दोन गोष्टी पुरेशा आहेत. त्यामुळे हे संमेलनाध्यक्षपद केवळ मिरवण्याची गोष्ट नाही, याची जाणीव देशमुखांना असेलच असा विश्वास आहे. त्यांच्या या विजयाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. मराठी भाषेच्या अभिजाततेचे झाडून सगळे पुरावे दिल्यानंतरही तो दर्जा अद्याप मराठीला मिळालेला नाही. शाळांमधील मराठीची स्थिती अतिशय बिकट आहे. ज्ञानभाषा तर सोडाच व्यवहाराची भाषा म्हणूनही मराठी मागे पडायला लागली आहे. नवोदित साहित्यिकांना मंच मिळत नाही, प्रकाशनाचा खर्च पेलत नाही. परिणामी समाजाला वैचारिक नेतृत्व देण्यात साहित्यिक कमी पडत आहेत. अर्थात देशमुख संमेलनाध्यक्ष झाल्याने हे काही एका रात्रीत बदलणार नाही. पण, देशमुखांच्या कार्यकाळात त्या दिशेने एक आश्वासक पाऊल टाकले जावे, अशी तमाम मराठीजनांची अपेक्षा आहे.

टॅग्स :marathiमराठी