शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

राम शेवाळकर नसताना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:35 IST

आपल्या आयुष्यात काही माणसांची उणीव सतत जाणवत असते. त्या माणसांच्या स्मृतींचा आधारच मग पाठीराख्यासारखा आपल्यासोबत असतो. राम शेवाळकर अशाच सहृदयी आधारांपैकी एक़ उद्या दि. २ मार्चला त्यांची जयंती आहे.

आपल्या आयुष्यात काही माणसांची उणीव सतत जाणवत असते. त्या माणसांच्या स्मृतींचा आधारच मग पाठीराख्यासारखा आपल्यासोबत असतो. राम शेवाळकर अशाच सहृदयी आधारांपैकी एक़ उद्या दि. २ मार्चला त्यांची जयंती आहे. नानासाहेब वक्ते म्हणून ख्यातकीर्त आणि लेखक म्हणून मान्यताप्राप्त होते. वाङ्मय चळवळीचे नेतृत्व करणारे म्हणून अनेकांना ते आधारस्तंभासारखे वाटले. शेकडो तरुणांचे ते पालक होते व आर्थिक स्थिती अनुकूल नसतानादेखील दानशूर म्हणून ते ज्ञात होते. आपत्तीप्रसंगी आणि आनंदाच्या क्षणी, दु:खात व सुखात, अडचणीत वा वैभवात अशा साºया स्थितीतही आपल्या मनाचा तोल त्यांनी कधी ढळू दिला नाही. त्यांच्या तोंडून कुणाबद्दल अपशब्द निघाले नाहीत. नावडत्या गोष्टींशीही त्यांनी जुळवून घेतले. कॉ. सुदामकाका त्यांच्या परिवारातले आणि संघाचे सुदर्शनही त्यांना जवळचे. काही माणसांचे मोठेपण अनेकांच्या द्वेषावर उभे असते. तो द्वेष मग जातीतून, धर्मातून, स्वत:बद्दलच्या अवास्तव प्रतिष्ठेतून येत असतो. नानासाहेबांनी या रोगाचा संसर्ग स्वत:ला होऊ दिला नाही. शेवाळकर जाऊन आज नऊ वर्षे होताहेत. पण त्यांचे नसणे अनेकांना पोरकेपणाची जाणीव सतत करून देत असते.नानासाहेब हयात असेपर्यंत आताच्या थोर साहित्यिकांचे वैगुण्य लपून होते. आता ते बटबटीतपणे दिसून येते. नानासाहेबांना सामान्य माणसांचा कंटाळा आला नाही. सार्वजनिक कार्यक्रमांत त्यांनी कुणाचा पाणउतारा केला नाही. माणसांना भेटावे, त्यांच्याविषयी चांगलेच बोलावे, हा त्यांचा स्वभाव होता. ओळख-पाळख नसताना कुठल्याही नवोदिताच्या पुस्तकाला नानासाहेब प्रस्तावना द्यायचे. ती तशी देत असताना ती साहित्यकृती दर्जेदार आहे की नाही याचा विचारही ते करीत नसत. ‘आपल्या कौतुकाच्या चार शब्दांनी या नवोदित साहित्यिकाला प्रोत्साहन मिळत असेल तर त्यात काय चुकले,’ असा प्रश्न ते अगदी विनयाने विचारीत. त्यांच्या शब्दांमध्ये माणूस जागवण्याचे सामर्थ्य होते. नानासाहेबांनी अनेक सामाजिक संस्था उभ्या केल्या. विदर्भ साहित्य संघाला खेड्यापाड्यांत पोहोचविण्याचे श्रेय त्यांनाच जाते. आज चौथ्या माळ्यापुरते बंदिस्त झालेल्या विदर्भ साहित्य संघाची दयनीय अवस्था पाहून नानासाहेब अस्वस्थ होत असतील. नवोदितांना प्रोत्साहन देणारे, सामाजिक कार्यांना मदत करणारे साहित्यिक आता कुठे दिसत नाहीत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त चार-दोन माणसे जिवंत आहेत, पण तीही तुसडी आणि अहंकाराच्या कोषात राहणारी. त्यांना भेटायला कुणी धजावत नाही. चुकून गेलेच तर उच्चकोटीच्या अहंकाराच्या ज्वाळांचे चटके बसल्याशिवाय राहत नाही. नानासाहेब क्षणोक्षणी आठवतात ते यासाठी. नानासाहेबांच्या वक्तृत्वाला कीर्तनी वळण होेते. त्यामुळे त्यांचे निरुपण सुक्षिशित-अशिक्षित साºयांनाच आवडायचे. भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. त्या प्रभुत्वाचे रितेपणही ठळकपणे जाणवते...नानासाहेब विद्यापीठ होते. ते आज नसताना नव्या पिढीला दिशा दाखवणारा कुणी मार्गदर्शक नाही. त्या पात्रतेचेही कुणी सभोवताल दिसत नाही. नानासाहेब गेल्यानंतर समाज मोठ्या आशेने पाहायचा त्या साºयाच थोरामोठ्यांना आत्मग्लानी आली आहे. माणसांना केवळ प्रतिभावंत म्हणून मोठे होता येते. पण, याशिवायही ज्यांना मोठेपण लाभते त्यांचे मुळात माणूसपणच मोठे असते. निंदा-नालस्ती, निषेध वाट्याला येऊनही साºयांबद्दल ममत्व बाळगणारा हा आधारवड आज नाही, ही गोष्ट आपण सार्वजनिक जीवनात खूप काही गमावले असल्याचे सांगणारी आहे...- गजानन जानभोर (gajanan.janbhor@lokmat.com)