शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

वाऱ्याला वेग येत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 02:32 IST

केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र आणि तेलंगण या दक्षिणेकडील राज्यात भाजपाला फारसे स्थान नाही. जे स्थान त्या पक्षाला कर्नाटकात मध्यंतरी ...

केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र आणि तेलंगण या दक्षिणेकडील राज्यात भाजपाला फारसे स्थान नाही. जे स्थान त्या पक्षाला कर्नाटकात मध्यंतरी मिळाले, ते त्याने तेथील खाण घोटाळ्यात व येदीयुरप्पांच्या दुटप्पी राजकारणात घालविले. या सर्व राज्यात काँग्रेस आहे. कर्नाटकात ती सत्तेवर आहे. केरळात बरोबरीने आहे. तामिळनाडूत काँग्रेसचा स्टॅलिनशी समझोता आहे. मोदी-शहांचे गुजरात भाजपाच्या ताब्यात असले, तरी तेथे काँग्रेसने दिलेले आव्हान या नेत्यांच्या जिव्हारी लागल्याचे नंतरच्या घडामोडींतून दिसून आले. आंध्र प्रदेशात नायडू अनुकूल आहेत आणि एकटे तेलंगणचे चंद्रशेखर रावच विरोधात आहेत. मध्य भारत काँग्रेसने जिंकला आणि भाजपाने गमावला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडकडील भाजपाची सत्ता काँग्रेसने हिसकावली आहे. बिहारमध्ये काँग्रेस आणि लालूप्रसादांचा राजद हा पक्ष भाजपा व जदयुला बरोबरीचे आव्हान देत आहेत आणि ओडिशात नवीन पटनायक कुणाही सोबत नसले, तरी त्यांचा चेहरा सेक्युलर आहे. काँग्रेसवर त्यांचा राग असला, तरी पूर्वीच्या तुलनेत तो मावळला आहे. उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यांनी ८० पैकी ७८ जागा आपसात वाटून, काँग्रेसला फक्त दोन जागा देण्याचा आगाऊपणा केला, तो आता त्यांच्या अंगलट आला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाने घेतलेली झेप, त्यांना मिळालेली प्रियंकांची साथ आणि वरुण व मेनका गांधींविषयीचे संशयाचे वातावरण, यामुळे त्या आघाडीला पूर्वी वाटलेला उत्साह मावळला आहे, तर भाजपामध्ये तो आल्याचे दिसलेही नाही. उत्तरेला पंजाब काँग्रेसकडे; तर हरियाणा, उत्तरांचल व झारखंड भाजपाकडे आहेत, पण भाजपाची लोकप्रियता उतरली आहे आणि काँग्रेसला त्याने मिळविलेल्या यशामुळे आक्रमक बनविले आहे. काश्मिरात सरकार नाही, पण येणारे सरकार भाजपाला अनुकूल असणार नाही. बंगालमध्ये ममता ठाम आहेत आणि त्यांचा काँग्रेस, भाजपा व कम्युनिस्ट यांना सारखाच विरोध आहे. शिवाय त्यांचे पारडे त्या राज्यात अजून जड आहे. आसामसह पूर्वेकडील सात राज्यांत भाजपाने मध्यंतरी मोठी आघाडी घेतली, परंतु तेथील बांगलादेशी व अन्य लोकांना घालविण्याचा त्याचा घिसाडघाईचा निर्णय त्याला चांगलाच महागात पडलेला दिसत आहे. नागालँड, मणिपूर या राज्यांनी त्याला सरळ विरोध केला, तर आसामचे राज्यही त्याबाबत पूर्वीएवढे उत्साही राहिले नाही. अरुणाचल व मेघालय ही राज्ये कुणासोबतही गेली, तरी देशाच्या राजकारणावर त्याचा फारसा परिणाम व्हायचा नाही. तेच गोव्याबाबतही खरे आहे. मात्र, गोव्यात भाजपाने लोकप्रियता व प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टी घालविल्या आहेत. महाराष्टÑात भाजपा-शिवसेना युती सत्तेवर आहे. आपले उमेदवार वाढवून घेण्यासाठी शिवसेना येथे दंडबैठका मारीत असली, तरी तिचे खरे बळ साºयांना ठाऊक आहे. परिणामी, त्यांच्यात मैत्री होणार हे उघड आहे. दरम्यान, याही राज्यात काँग्रेसने बळ एकवटले आहे आणि त्याच्या प्रचाराला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. साºयात महत्त्वाची बाब आहे, ती म्हणजे पंतप्रधानांच्या लोकप्रियतेची. लोकसभेची निवडणूक ही प्रत्यक्षात पंतप्रधानांचीच निवडणूक झाली आहे. या घटकेला मोदी लोकप्रियतेत पहिल्या क्रमांकावर आहेत. मात्र, त्यांच्या व राहुल गांधींच्या लोकप्रियतेतील अंतर दिवसेंदिवस कमी होत आहे. मोदींची आभाळभर आश्वासने पूर्ण व्हायची आहेत आणि राफेल घोटाळ्यात त्यांचा पाय दिवसेंदिवस खोलात जात आहे. महत्त्वाची गोष्ट ही की, ज्या काळात राहुल गांधींना मित्र मिळत आहेत, त्या काळात मोदींचे मित्र त्यांच्यापासून एकतर दूर जात आहेत किंवा त्यांच्यावर रुसलेले दिसत आहेत. या साºया राजकीय पार्श्वभूमीवर ही निवडणूक निकाली असेल, असे सामान्यपणे आज बोलले जात नाही. ती ‘हंग’ असेल, म्हणजे तीत कुणालाही स्पष्ट बहुमत नसेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. ज्या पद्धतीने विरोधक एकत्र येत आहेत, ते पाहता राजकारणाचा पोत बराच बदलला आहे किंवा तो बदलतो आहे, हे स्पष्ट दिसते आहे. मात्र, भारताचे राजकारण हे हवेचे वा लाटेचेही आहे. येत्या काळात वारे कसे वाहतील, यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. एखाद्या नव्या मुद्द्याची लाट येऊ शकते, परंतु वेगवेगळे प्रवाह नव्या दिशा धरून वाहू लागले आहेत आणि त्याचा वेग वाढतो आहे, हा अन्वयार्थ ध्यानी घ्यायला हवा.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९