शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 07:17 IST

शिवरायांच्या महाराष्ट्रातील ११ व तमिळनाडूमधील एक अशा १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाला आहे. यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे !

- संदीप तापकीर , इतिहास अभ्यासक

काही महिन्यांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा मराठी माणसांनी ऐन नवरात्रीत देवीच्या उत्सवाबरोबरच माय मराठीचा उत्सव अत्यंत धूमधडाक्यात साजरा केला. आता पुन्हा एकदा असाच आनंदसोहळा साजरा करण्याची संधी आली आहे. महाराष्ट्रातील ११ व तमिळनाडूमधील एक, अशा १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झाला आहे. ही सर्वच भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पॅरिसमध्ये युनेस्कोच्या समितीसमोर भारतीय शिष्टमंडळाने केलेल्या सादरीकरणात  शिवनेरी, राजगड, रायगड, लोहगड, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी आणि जिंजी या १२ किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा पटवून दिला.

मराठा साम्राज्यातील मोक्याच्या जागी वसलेले हे किल्ले शत्रू सैन्यावर वचक ठेवण्याचे काम करत होते. यातील काही किल्ल्यांवरून प्रशासकीय कारभारदेखील चालत असे. या आणि इतरही अनेक किल्ल्यांचा अत्यंत चतुराईने वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची बांधणी आणि रक्षणदेखील केले होते. औरंगजेबालादेखील शिवछत्रपतींचे किल्ले जिंकता आले नाहीत. यापुढील काळात ब्रिटिशांनी या किल्ल्यांची जबरदस्त धास्ती घेतली होती. त्यांनी अनेक किल्ल्यांवर जाण्याचे मार्ग उखडून टाकले, काही किल्ल्यांवरच्या वास्तूंची पडझड केली, अनेक किल्ल्यांवर जायला कित्येक वर्षे बंदीदेखील घातली.

भारत सरकारने भारताचे ‘मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले’ या शीर्षकाखाली युनेस्कोच्या समितीकडे या किल्ल्यांची शिफारस केली होती. यासाठी अनेक शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे काम केले. दुर्गप्रेमींनी शासकीय यंत्रणांना मदत केली. वर्षभरापासून हे काम सुरू होते. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने या बारा किल्ल्यांचे टू द स्केल मॉडेल्स विक्रमी वेळेत पूर्ण केले. ते युनेस्कोच्या प्रतिनिधींनी भेट दिलेल्या दिल्लीच्या प्रदर्शनात ठेवलेले होते. यासाठी अनेक गिर्यारोहकांनी स्वयंसेवक म्हणून अहोरात्र काम केले होते. जागतिक वारसा समितीची ४७ वी परिषद फ्रान्समध्ये पॅरिस येथे संपन्न झाली. यामध्ये भारत सरकारने पाठवलेला प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. आता या निर्णयामुळे आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेल्या स्थळांना जागतिक ओळख प्राप्त होते.  त्यांच्या जतनासाठी जागतिक वारसा निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळते. प्रत्यक्ष युनेस्कोकडून मात्र मोठ्या प्रमाणात निधी मिळत नाही.   

अनेक परदेशी पर्यटक महाराजांच्या किल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठी या किल्ल्यांना भेटी देत असतात. आता त्यांची संख्या निश्चितच अधिक पटीने वाढेल. आता आपलीही जबाबदारी उचलण्याची वेळ आली आहे. स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतिहासभान निर्माण करणे गरजेचे आहे. इथून पुढे खऱ्या अर्थाने शासनाचे काम सुरू होणार आहे. गेली ४०० वर्षे हे किल्ले अनेकांना प्रेरणा देत आले आहेत. म्हणूनच, या किल्ल्यांचा वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, तर निश्चितच आहे; पण त्यामुळे या किल्ल्यांना जागतिक महत्त्व मिळून शिवविचार, शिवछत्रपतींचा इतिहास, शिवरायांचा दुर्गस्थापत्यविषयक दृष्टिकोन जगापुढे नव्याने, अधिक सकारात्मकरीत्या येईल, याचा विशेष आनंद वाटतो.

आपल्याला फार पूर्वीपासून दस्तऐवजीकरण नसण्याचा तोटा सहन करावा लागला. आता तरी आपण याकडे अधिक जागरूकतेने पाहायला लागू अशी अपेक्षा आहे. राज्यातील विस्तृत भूप्रदेशात असलेल्या या किल्ल्यांपैकी आठ गिरीदुर्ग, तर चार जलदुर्ग आहेत. या दोन मुख्य प्रकारांव्यतिरिक्त स्थलदुर्ग, वनदुर्ग या प्रकारांतही अनेक किल्ले आहेत. या यशामुळे त्यांच्याकडेही लोकांचा कल वाढेल.

 हरिहरगड, हरिश्चंद्रगड आणि इतर अनेक किल्ल्यांवर आता प्रमाणापेक्षा जास्त लोक जाऊ लागलेले दिसतात. त्यामुळे अनेक गोष्टींचा ऱ्हास होऊ लागला आहे. या उत्साही लोकांवर योग्य ते निर्बंध घालून  पर्यटनाची शिस्त लावण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणेही गरजेचे आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजFortगड