शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

साध्वी प्रज्ञासिंह, शाप देऊन मतं मागणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 06:53 IST

भाजपमधील काही समंजसांना जाग आली आणि त्यांनी ‘प्रज्ञासिंहना तिकीट देऊ नका, ते पक्षाला बदनाम करणारे ठरेल’ असे म्हटले. भाजपच्या वरिष्ठांनी त्याविषयीचा त्यांचा अंतिम निर्णय अजून जाहीर केला नसला, तरी यातून भाजपचा चेहरा मात्र उघड झाला आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर असे नाव असलेल्या आणि स्वत:ला साध्वी म्हणविणाऱ्या उमेदवाराचे भोपाळमधील तिकीट भारतीय जनता पक्षाने कापण्याचा व तेथे डमी म्हणून उभ्या केलेल्या उमेदवारालाच रिंगणात ठेवण्याचा विचार सुरू केला असल्याचे वृत्त दिलासा देणारे आहे. उद्या ते चुकीचे ठरले आणि भाजपने आपला निर्ढावलेपणा तसाच कायम ठेवून त्यांना दिलेली उमेदवारी कायम केली, तरी त्या पक्षात किमान काही माणसे तरी चांगले विचार करणारी व शहिदांचा सन्मान करणारी आहेत, हेही यानिमित्ताने समोर येईल.भोपाळची उमेदवारी पक्षाने जाहीर न करता दीर्घकाळ गुलदस्त्यात ठेवली, तेव्हाच त्यात काही डाव असावे असा संशय साऱ्यांना आला होता. काँग्रेसने त्या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपने अचानक प्रज्ञासिंह यांचे नाव तेथे आणले आणि देशात एक चर्चेचा गदारोळ उभा राहिला. प्रज्ञा ठाकूर या दहशतखोरीच्या आरोपावरून कित्येक वर्षे तुरुंगात राहिलेल्या व पुढे निव्वळ संशयाचा फायदा मिळून बाहेर आलेल्या महिला आहेत. मालेगावात बॉम्बस्फोट घडवून दोन डझन निरपराध व्यक्तींचा बळी घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आजारी असल्याने सध्या त्या जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणाची चौकशी हेमंत करकरे या साऱ्या देशाला अभिमान वाटावा, अशा चोख व इमानदार अधिकाऱ्याने केली आहे. ती करताना त्यांनी धर्म किंवा जात यांचा विचार न करता केवळ गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित केले.

प्रज्ञासिंग यांनी तुरूंगात झालेल्या छळाचे वर्णन करून त्याबद्दलही करकरेंना दोष दिला. मात्र राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने तर त्याचे खंडन केले. शिवाय तुरूंगात असतानाच्या काळात त्यांनी केलेल्या अशा तक्रारींची शहानिशा केल्याचे आणि त्यात तथ्य न आढळल्याचे तपशील जाहीर करून अन्य यंत्रणांनीही त्यांना तोंडघशी पाडले. त्या तुरुंगात असतानाच मुंबईवर झालेल्या पाकिस्तानच्या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडून करकरे शहीदही झाले. असा तेजस्वी इतिहास असलेली ही व्यक्ती ‘मी दिलेल्या शापामुळे मरण पावली आणि त्यांचा मृत्यू झाल्याने माझे सुतक संपले,’ असे उद्गार या प्रज्ञासिंह यांनी काढले. त्यावर पोलीस दलातील अधिकारी, करकरे यांना ओळखणारे व त्यांच्या पथकातील सारे संतापले. त्यांच्या उद्गारांचा निषेध महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशासह सर्वत्र झाला. सर्वत्र निदर्शने झाली. पण भाजपचा निर्ढावलेपणा असा, की त्या निषेधालाच प्रसिद्धी समजून त्या पक्षाने या वक्तव्याची राळ उडालेली असतानाही प्रज्ञासिंह यांना भोपाळचे तिकीट दिल्याचे जाहीर केले. त्याहून दुुर्दैव हे की ‘हे हिंदू दहशतवादाच्या आरोपाला दिलेले उत्तर आहे,’ अशा शब्दांत त्यांच्या या बेताल वक्तव्याचे समर्थन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

मोदी आणि शहा कशाचे समर्थन करतील आणि कशाला पाठिंबा देतील, याचाही नेम राहिलेला नाही. ते पाकिस्तानशी क्रिकेट खेळायला नकार देतात आणि नवाझ शरिफांकडे मेजवानी झोडायला जातात. राजकारणी माणसाचे मन मतलबी व स्वार्थी असते, त्याचा अशा प्रसंगी फारसा विचारही करायचा नसतो. या परिस्थितीत भाजपतील काही शहाण्या व समंजसांना मात्र जाग आली आणि त्यांनी ‘प्रज्ञासिंह यांना तिकीट देऊ नका, ते पक्षाला बदनाम करणारे ठरेल,’ असे म्हटले. अर्थात भाजपच्या वरिष्ठांनी त्याविषयीचा त्यांचा निर्णय अजून जाहीर केलेला नाही. जे लोक अडवाणी, जोशींना रस्त्याच्या बाहेर टाकू शकतात ते प्रज्ञासिंहबाबत या समंजसांचे ऐकतीलच असे नाही. काही झाले तरी यातून भाजपचा खुनशी चेहरा मात्र उघड झाला आहे. 

प्रज्ञासिंह यांच्या शापाने देशभक्त मरतात; तर त्या देशद्रोह्यांना आणि देशाच्या शत्रूंना शाप का देत नाही? याच न्यायाने ‘तुम्ही मला मत देत नसाल, तर मी करकरेंना दिला तसा शाप तुम्हाला देईन,’ असे त्या भोपाळच्या मतदारांना म्हणू शकतील की नाही? भाजपचे नेते त्यांच्या या शापवाणीच्या धाकात अडकल्यानेच तर त्यांना त्यांचा निर्णय तत्काळ बदलता येत नाही ना? देशात पुन्हा शापवाणी उच्चारणाºयांचे दिवस येत आहेत का? स्वत:ला साध्वी म्हटल्याने कुणी धार्मिक वा धर्मज्ञ होत नाही. तुमचे वक्तव्य व वर्तणूकच तुम्हाला ते पद देत असते. प्रज्ञासिंह यांनी ते गमविले आहे. आता त्यांचा निकाल देण्याची पाळी भाजपवर आहे.

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीMalegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटbhopal-pcभोपाळDigvijaya Singhदिग्विजय सिंह