शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय चिखलात रयत क्रांती, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसून शेतक-यांच्या घामाला दाम देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:50 IST

शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी ‘भीक नको, हवे घामाचे दाम’, अशी घोषणा देत राजकीय पक्षांवर घणाघात केला. प्रसंगी त्यांना गिधाडांची उपमा दिली. राजकारण्यांच्या राजकीय डावपेचात शेतक-यांना वापरून घेतले जाते.

वसंत भोसले।शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी ‘भीक नको, हवे घामाचे दाम’, अशी घोषणा देत राजकीय पक्षांवर घणाघात केला. प्रसंगी त्यांना गिधाडांची उपमा दिली. राजकारण्यांच्या राजकीय डावपेचात शेतक-यांना वापरून घेतले जाते. त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. तो द्यायचाच नाही, अशा प्रकारचे आर्थिक धोरणच शेती-शेतक-यांच्या उन्नतीला मारक आहे, अशी भूमिका ते मांडत राहिले. देशातील शेतकरी चळवळीला एक नवा आयाम त्यांनी मिळवून दिला. मात्र, कालांतराने त्यांनी या भूमिकेत बदल केला. शेतावर राबणारा शेतकरी हा नेहमीच राजकारणाच्या सावलीत राहणे पसंत करतो, त्याला गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणाची सवय झाली आहे. शिवाय राजकीय व्यवस्थेला धक्का दिल्याशिवाय शेतक-यांचे प्रश्न ऐरणीवर येणार नाहीत, त्यामुळे देशाच्या राजकारणाला गवसणी घालणाºया आणि पर्यायाने देशाची वर्षानुवर्षांची आर्थिक रचना ठरविणाºया कॉँग्रेसला पराभूत केले पाहिजे, या विचाराने ते असंख्य विरोधी पक्षांची मदत घेत भाजपच्या वळचणीला जाऊन बसले.मते मागायला आलो तर जोड्याने मारा, अशी आश्वासक भाषा बोलून राजकारणाचा तिटकारा व्यक्त करताना त्यांनी घेतलेले राजकीय वळण सर्वांना आश्चर्यचकित करून गेले होते. तेव्हा राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी कडाडून विरोध करीत राजकारणातील गिधाडांची पिलावळ राजहंस कधी झाली, असा सवाल उपस्थित केला होता. शेतकºयांचा स्वाभिमान जागृत करून राजकारण्यांपासून दूर राहून शेतकरी चळवळ चालविण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यांना पाठिंबा आणि यशही मिळत गेले. शेतकरी चळवळ विरोधकांना धडा शिकविण्याचा भाग म्हणून निवडणुकाही लढवायला त्यांनी सुरुवात केली. राजू शेट्टी आमदार आणि खासदारही झाले. सदाभाऊ खोत यांनाही त्याचा मोह झाला. त्यांना आता राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. या राजकीय पदांनी त्यांना राजकारण्यांच्या सवयी लागल्या. त्यातून संघटना फुटली. आता सदाभाऊ खोत यांनी शेतकºयांच्या नावाने रयत क्रांती संघटना स्थापन करण्याची घोषणा घटस्थापनेच्या मुहूर्तावर केली. शरद जोशी, वामनराव चटप, अनिल गोटे, सरोज काशीकर यांच्यापासून ते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रघुनाथदादा पाटील, पाशा पटेल आदी सर्वांना आपले राजकीय घट बसविण्याची घाई झालेली दिसते. शरद जोशी यांची राजकीय लढाई ही शेतकरी चळवळीचा भाग म्हणून हत्यारासारखी वापरण्याची युक्ती आता मागे पडली आणि सदाभाऊंच्या भाषेत दुकानदारी झाली आहे. त्याला ते आता क्रांती म्हणू लागले आहेत. राजकीय लाभासाठी हपापलेली ही मंडळी राजकारणाच्या चिखलात उतरून रयतेसाठी क्रांती कसली करणार? काँग्रेसच्या शेती-शेतकरी धोरणाला विरोध करताना भाजपची शेतीविषयीची धोरणे कशी क्रांतिकारी आहेत आणि त्यातून शेतकºयांच्या घामाला दाम कसे मिळणार, हे तरी त्यांनी एकदा स्पष्ट करावे. अन्यथा क्रांतीची भाषा करीत राजकारण्यांसारखी शेतकºयांच्या फसवाफसवीची वजाबाकीच होणार आहे. त्यामुळे आणखीन एका दुकानदारीची सुरुवात झाली म्हणायचे का? एवढाच या शेतकरी चळवळीचा प्रवास म्हणून नोंदवावा का?