शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

नव्या ‘थेअरी’ने तरी प्रद्युम्नला न्याय मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:45 IST

निष्पाप बालमन एवढे विकृत होतेच कसे? ही सूड भावना त्यांच्यात कुठून येते, हा गंभीर प्रश्न आहे आणि शासनासोबतच कुटुंब आणि समाजानेही यावर सखोल चिंतन करण्याची गरज आहे.

निष्पाप बालमन एवढे विकृत होतेच कसे? ही सूड भावना त्यांच्यात कुठून येते, हा गंभीर प्रश्न आहे आणि शासनासोबतच कुटुंब आणि समाजानेही यावर सखोल चिंतन करण्याची गरज आहे. मुले गुन्हेगारीकडे वळण्याची अनेक कारणे आहेत. घरातील आर्थिक, भावनिक परिस्थिती, मित्रांची साथसंगत ही सुद्धा वाढत्या बालगुन्हेगारीस कारणीभूत आहे.गुडगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न ठाकूर या सहा वर्षीय मुलाच्या निर्घृण हत्या प्रकरणाला मिळालेले नवे वळण अत्यंत धक्कादायक, डोके चक्रावून टाकणारे आणि तेवढेच अविश्वसनीय आहे. याच शाळेत अकरावीत शिकणाºया एका विद्यार्थ्याने शाळेची परीक्षा आणि पालक सभा पुढे ढकलली जावी, या अतिशय क्षुल्लक कारणावरून प्रद्युम्नची हत्या केल्याचा सीबीआयचा दावा आहे. तपास संस्थेने या विद्यार्थ्याला अटक केली असून, त्याने आपला गुन्हा कबूल केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे संशयित मुलाच्या पालकांनी मात्र आपल्या पाल्यास विनाकारण या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी गुडगाव पोलिसांनी स्कूल बसच्या कंडक्टरला अटक केली होती आणि हत्येपूर्वी मृत बालकावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला असल्याचा संशयही व्यक्त केला होता. सीबीआयच्या या नव्या थेअरीमुळे दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडाच्या चौकशीत गुडगाव पोलीस आणि सीबीआय आमनेसामने उभे ठाकले आहेत. या प्रकरणात अकरावीच्या विद्यार्थ्याचे आलेले नाव आश्चर्यचकित करणारे आणि बालमनाची बदलत चाललेली मानसिकता दर्शविणारे आहे. अमेरिकेसारख्या देशात जेथे बंदुकीसारखे शस्त्र अगदी सहजपणे उपलब्ध असते; शाळकरी विद्यार्थ्यांनी शाळेत अंदाधुंद गोळीबार केल्याच्या घटना घडत असतात. भारतात मात्र अशाप्रकारच्या विकृतीपासून मुले सुरक्षित असल्याचे आजवर मानले जात होते. परंतु प्रद्युम्न हत्याकांडातील या नव्या खुलाशाने या विश्वासाला तडा गेला आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम, इंटरनेटसारख्या सुविधा यामुळे मुलांना बालवयातच नको त्या गोष्टी कळू लागल्या आहेत. काय चांगले आणि काय वाईट हे समजण्याची परिपक्वता नसल्याने बरेचदा मग ते वाईट मार्गाकडे वळत असल्याचे अलीकडच्या काळात प्रकर्षाने जाणवत आहे. त्यांच्यातील गुन्हेगारीची मानसिकता वाढते आहे. देशातील बालगुन्हेगारीच्या वाढत्या आलेखावरून त्याची प्रचिती यावी. देशात दरवर्षी बालगुन्हेगारीची सरासरी ३५ हजार प्रकरणे उघडकीस येत असतात. एरवी बालगुन्हेगारी म्हटले की आपल्यासमोर अनाथ, बेकार, रस्त्यावर वाढणारी अथवा घरातून पळून जाणारी मुलेच नजरेसमोर येतात. परंतु बालगुन्हेगारीचे हे विश्व आता केवळ गरिबांपुरतेच सीमित राहिलेले नाही. चोरी, पाकीटमारी, हाणामारी हे किरकोळ गुन्हे झाले. आता तर खून, दरोडे, बलात्कार, विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यांमधेही त्यांचा समावेश वाढला आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. या वास्तवाने मुलांवरील संस्कार, त्यांची जडणघडण, शिक्षणातील त्रुटी तसेच व्यवस्थेतील अकार्यक्षमतेसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रद्युम्न प्रकरणात सीबीआयची थेअरी चुकीची निघावी, असे मनोमन सर्वांनाच वाटत असेल. पण हेच सत्य असल्यास ते स्वीकारून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासन आणि समाजाने एकजुटीने प्रयत्न करावे लागतील.

टॅग्स :Ryan International Schoolरेयान इंटरनॅशनल स्कूलStudentविद्यार्थी