शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नव्या ‘थेअरी’ने तरी प्रद्युम्नला न्याय मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:45 IST

निष्पाप बालमन एवढे विकृत होतेच कसे? ही सूड भावना त्यांच्यात कुठून येते, हा गंभीर प्रश्न आहे आणि शासनासोबतच कुटुंब आणि समाजानेही यावर सखोल चिंतन करण्याची गरज आहे.

निष्पाप बालमन एवढे विकृत होतेच कसे? ही सूड भावना त्यांच्यात कुठून येते, हा गंभीर प्रश्न आहे आणि शासनासोबतच कुटुंब आणि समाजानेही यावर सखोल चिंतन करण्याची गरज आहे. मुले गुन्हेगारीकडे वळण्याची अनेक कारणे आहेत. घरातील आर्थिक, भावनिक परिस्थिती, मित्रांची साथसंगत ही सुद्धा वाढत्या बालगुन्हेगारीस कारणीभूत आहे.गुडगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न ठाकूर या सहा वर्षीय मुलाच्या निर्घृण हत्या प्रकरणाला मिळालेले नवे वळण अत्यंत धक्कादायक, डोके चक्रावून टाकणारे आणि तेवढेच अविश्वसनीय आहे. याच शाळेत अकरावीत शिकणाºया एका विद्यार्थ्याने शाळेची परीक्षा आणि पालक सभा पुढे ढकलली जावी, या अतिशय क्षुल्लक कारणावरून प्रद्युम्नची हत्या केल्याचा सीबीआयचा दावा आहे. तपास संस्थेने या विद्यार्थ्याला अटक केली असून, त्याने आपला गुन्हा कबूल केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे संशयित मुलाच्या पालकांनी मात्र आपल्या पाल्यास विनाकारण या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी गुडगाव पोलिसांनी स्कूल बसच्या कंडक्टरला अटक केली होती आणि हत्येपूर्वी मृत बालकावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला असल्याचा संशयही व्यक्त केला होता. सीबीआयच्या या नव्या थेअरीमुळे दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडाच्या चौकशीत गुडगाव पोलीस आणि सीबीआय आमनेसामने उभे ठाकले आहेत. या प्रकरणात अकरावीच्या विद्यार्थ्याचे आलेले नाव आश्चर्यचकित करणारे आणि बालमनाची बदलत चाललेली मानसिकता दर्शविणारे आहे. अमेरिकेसारख्या देशात जेथे बंदुकीसारखे शस्त्र अगदी सहजपणे उपलब्ध असते; शाळकरी विद्यार्थ्यांनी शाळेत अंदाधुंद गोळीबार केल्याच्या घटना घडत असतात. भारतात मात्र अशाप्रकारच्या विकृतीपासून मुले सुरक्षित असल्याचे आजवर मानले जात होते. परंतु प्रद्युम्न हत्याकांडातील या नव्या खुलाशाने या विश्वासाला तडा गेला आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम, इंटरनेटसारख्या सुविधा यामुळे मुलांना बालवयातच नको त्या गोष्टी कळू लागल्या आहेत. काय चांगले आणि काय वाईट हे समजण्याची परिपक्वता नसल्याने बरेचदा मग ते वाईट मार्गाकडे वळत असल्याचे अलीकडच्या काळात प्रकर्षाने जाणवत आहे. त्यांच्यातील गुन्हेगारीची मानसिकता वाढते आहे. देशातील बालगुन्हेगारीच्या वाढत्या आलेखावरून त्याची प्रचिती यावी. देशात दरवर्षी बालगुन्हेगारीची सरासरी ३५ हजार प्रकरणे उघडकीस येत असतात. एरवी बालगुन्हेगारी म्हटले की आपल्यासमोर अनाथ, बेकार, रस्त्यावर वाढणारी अथवा घरातून पळून जाणारी मुलेच नजरेसमोर येतात. परंतु बालगुन्हेगारीचे हे विश्व आता केवळ गरिबांपुरतेच सीमित राहिलेले नाही. चोरी, पाकीटमारी, हाणामारी हे किरकोळ गुन्हे झाले. आता तर खून, दरोडे, बलात्कार, विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यांमधेही त्यांचा समावेश वाढला आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. या वास्तवाने मुलांवरील संस्कार, त्यांची जडणघडण, शिक्षणातील त्रुटी तसेच व्यवस्थेतील अकार्यक्षमतेसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रद्युम्न प्रकरणात सीबीआयची थेअरी चुकीची निघावी, असे मनोमन सर्वांनाच वाटत असेल. पण हेच सत्य असल्यास ते स्वीकारून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासन आणि समाजाने एकजुटीने प्रयत्न करावे लागतील.

टॅग्स :Ryan International Schoolरेयान इंटरनॅशनल स्कूलStudentविद्यार्थी