शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

सरकार पालावर पोहोचणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 01:32 IST

देवेंद्र फडणवीस सरकारने भटक्या जाती, जमाती व ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्यानंतर भटक्या जातींचा पहिलाच मुक्तिदिन आज साजरा होत आहे.

- सुधीर लंकेदेवेंद्र फडणवीस सरकारने भटक्या जाती, जमाती व ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्यानंतर भटक्या जातींचा पहिलाच मुक्तिदिन आज साजरा होत आहे. हा मुुक्तिदिन या जातींसाठी कोणत्या स्वातंत्र्याची पहाट आणणार याची प्रतीक्षा आहे.वकिल्या भोसले हाजीर हो...ही कोर्टातील आरोळी अद्यापही थांबलेली नाही. वकिल्या हा काळ्या कोटात नाही, तर वर्षानुवर्षे आरोपीच्या पिंजºयात उभा आहे, हेच राज्यातील बहुतांश न्यायालयातील आजचे चित्र आहे. एका गुन्ह्यातून सुटला की तो दुसºया गुन्ह्यात आरोपी असतो. ३१ आॅगस्ट हा भटक्या विमुक्तांचा मुक्तिदिन म्हणून दरवर्षी साजरा होतो. पण, यावर्षी या जातींसाठी स्वतंत्र मंत्रालयच स्थापन झालेले असल्याने आता ‘वकिल्या’ला विशेष अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस सरकार न्यायालयांतील ही आरोळी थांबवून आपणाला माणूस म्हणून जगवेल व आपल्या पालावर पोहोचेल याची ‘वकिल्या’ला प्रतीक्षा आहे.१८७१ साली इंग्रजांनी गुन्हेगारी जमातीचा कायदा अमलात आणला होता. या देशातील लढवय्या आदिवासी भटक्या विमुक्त जमाती या कायद्यामुळे जन्मत:च गुन्हेगार ठरविल्या गेल्या. स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेने ३१ आॅगस्ट १९५२ रोजी हा जुलमी कायदा रद्द केला. कायदा रद्द झाला पण, या जातींच्या कपाळावरील गुन्हेगारीचा शिक्का पुसलेला नाही. कागदोपत्री मुक्ती मिळाली, मात्र व्यवस्थेने आपल्या मनातून हा कायदा हद्दपार केलेला दिसत नाही.भटक्या विमुक्त जातींची लोकसंख्या नक्की किती हे राज्याला आजही ठाऊक नाही. भटक्या विमुक्तांत एकूण ४२ जाती आहेत. यातील प्रत्येक जातीचे वेगवेगळे प्रश्न आहेत. नगर जिल्ह्यात पारधी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. या समाजाच्या प्रगतीसाठी उमाकांत दांगट हे जिल्हाधिकारी असताना काही योजना राबविण्याचा प्रयत्न झाला. पारधी समाजाला जातीचे दाखले देण्याचे मोठे काम झाले. मात्र, पुढे हे काम बंद पडले. त्यानंतर ‘कारो फॉर लिटरसी’ या संस्थेच्या माध्यमातून नगरच्या ‘सीएसआरडी’ या केंद्राने पारधी विकास आराखडा बनविला. हा आराखडा जिल्हा प्रशासनाने स्वीकारला. मात्र, त्याची अंमलबजावणीच झाली नाही. या जातींना ओळखपत्र द्या व जागेवरच योजनांचा लाभ द्या ही त्यातील प्रमुख सूचना होती. मात्र, तसे घडले नाही. पारधी विकासासाठी आलेला निधी देखील खर्च झाला नाही, अशी अवस्था आहे. भटक्यांसाठी राज्यात वेगवेगळे आयोग आले. त्यांच्या अहवालांचेही असेच झाले.भटक्या विमुक्तांसाठी सध्या वसतिगृहांची सुविधा नाही. या जातींसाठी वसंतराव नाईक महामंडळ आहे, पण त्यातही खडखडाट आहे.यावर्षी फडणवीस सरकारने विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्रालय निर्माण केले. या मंत्रालयासाठी २ हजार ३८४ कोटींचे बजेटच दिले गेले. प्रथमच असे बजेट मिळाले. या विभागाला प्रा. राम शिंदे हे मंत्री व स्वतंत्र सचिवही मिळाला. अनुसूचित जाती-जमातीच्या धर्तीवर भटक्या वर्गासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्याचा मनोदय शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती थेट खात्यात वर्ग करण्याचा प्रस्ताव आहे. खरेतर आमचा वेगळा प्रवर्ग न करता आम्हाला अनुसूचित जमातीत घ्या ही या जातींची जुनी मागणी आहे. या जातींना राजकीय आरक्षणही नाही. केंद्राच्या सूचीप्रमाणे त्यांचा ‘ओबीसी’त समावेश होतो. ओबीसींना केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांत आरक्षण आहे. त्यामुळे भटक्या जातींना विधानसभा, लोकसभेची पायरी चढण्याची संधीच मिळत नाही.अनुसूचित जाती-जमातींसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र आहे. या जातींसाठी तेही नाही. त्यामुळे शिंदे यांचे नवीन मंत्रालय या जातींसाठी कोणता नवा अजेंडा आणणार, याची प्रतीक्षा आहे. दलित ऐक्य जसे विस्कटले तशा भटक्या विमुक्तांच्या लढायाही संघटितपणे पुढे येताना दिसत नाही. या मुक्तिदिनानिमित्त अ‍ॅड. अरुण जाधव यांनी नगर जिल्ह्यात जामखेड येथे तसा प्रयत्न केला आहे. राज्यव्यापी परिषदेच्या निमित्ताने विविध प्रवाह ते एकत्र करीत आहेत. प्रकाश आंबेडकरांचाही त्यात सहभाग आहे.

टॅग्स :Ram Shindeप्रा. राम शिंदे