शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दिगंबर कामत काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देऊ शकतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 20:53 IST

कामत काँग्रेस पक्षाला नवे वळण कसे देतात याकडे निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. 

-राजू नायक माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची गोव्याचे विरोधी पक्षनेते म्हणून झालेली निवड काँग्रेस पक्षासाठी निश्चितच लाभदायक ठरणार आहे. पुढच्या दोन वर्षात गोव्यात निवडणुका व्हायच्या आहेत. राजकीय निरीक्षक, सध्याची गोव्याची राजकीय परिस्थिती पाहता, त्या वर्षभरात होतील, असे सांगू लागले आहेत. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या जहाजातून १० आमदारांनी सत्ताधारी बाजूने उड्या टाकल्यानंतर या पक्षाच्या अस्तित्वाबद्दल तीव्र शंका व्यक्त केल्या जात आहेत. या परिस्थितीत कामत पक्षाला नवे वळण कसे देतात याकडे निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या काँग्रेस पक्षात तसे मूळ काँग्रेसमन कोणी सापडणार नाहीत. स्वत: कामत भाजपातून तर प्रतापसिंग राणे, रवी नाईक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून आले. परंतु भाजपातून फुटताच तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कामत यांना कधी माफ केले नाही. त्यांच्या विरोधात चौकशांचा ससेमिरा लावला. कामत यांना अटक करण्यासाठी जंग जंग पछाडले. वस्तुत: पर्रीकर यांनी केसेस दाखल केलेले, चौकशा चालवलेले, गुन्हे दाखल केलेले व अटकही झालेले अनेक काँग्रेसजन सध्या भाजपात आहेत आणि महत्त्वाची मंत्रीपदेही भूषवताहेत. परंतु हे घडतेय पर्रीकरांच्या पश्चात. राज्यात भाजपाने पर्रीकरांचा संपूर्ण वारसा टाकून देण्याचा प्रयत्न चालविल्याची टीका होते. परंतु तसे असले तरी नूतन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारला आश्वासक चेहरा दिला आहे. चालू विधानसभा अधिवेशनातही ते अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून वाखाणले गेले. या परिस्थितीत सरकारला विधायक विरोध करतानाच काँग्रेस पक्षाची गेलेली पत पुन्हा निर्माण करणे  व कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावणे ही कामे कामत यांना अनुक्रमे करावी लागणार आहेत. कामत यांचे वैशिष्ट्य असे की ते कार्यकर्त्यांना, नेत्यांना बरोबर घेऊन जाऊ शकतात. ते नेमस्त आणि मनमिळावू आहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण पाच वर्षे आश्वासक चेहरा दिला व या काळात काँग्रेस कार्यकर्ते खुश होते. गोव्यातील काँग्रेस पक्षाचे दुर्दैव असे की जे नेते निर्माण झाले त्यांनी आपल्यापुरते पाहिले व या पक्षाला संघटनात्मक बळ कधी लाभू दिले नाही. भाजपाचे तसे नाही. सरकार त्या पक्षाचे असतानाही, त्यांनी संघटनात्मक कामाकडे कधी दुर्लक्ष केले नाही. सध्या भाजपाच्या संघटनात्मक कामाची धुरा पक्षाचे संघटनमंत्री सतीश धोंड चालवतात. पर्रीकरांच्या काळात एका बाजूला सरकार चालविताना त्यांचा स्वत:चा संघटनेवरही वरचष्मा असे. पर्रीकरांच्या शेवटच्या काळात, भाजपाचे संघटनेकडे दुर्लक्ष झाले असे या पक्षाची कोअर समितीही मान्य करते. त्या दृष्टीने सतीश धोंड यांनी सध्या पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे काम जोरदारपणे हाती घेतले असून पक्षाच्या अडगळीत टाकलेल्या अनेक नेत्यांना पुन्हा संघटनात्मक कामास जुंपून घेतले जात आहे. हीच कार्यपद्धत कामत यांना सुरू करावी लागेल. ते भाजपातून आल्याने त्यांना संघटनात्मक कामाचाही अनुभव आहे. त्यांनी विधानसभेत इतर विरोधी पक्षांशी समन्वयाने कार्य करणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु विविध मतदारसंघांतील संघटनात्मक बळ व कमजोरी हेरून नवे नेते तयार करणे व विधिमंडळ तसेच संघटना यातील समन्वय वाढविणे व हा पक्ष आक्रमक बनवणे, रस्त्यावर उतरून व विविध आंदोलनांमधील ताकद वाढवणे ही कामे त्यांना करावी लागणार आहेत. पक्ष सोडून गेलेल्या काही तडफदार व प्रामाणिक नेत्यांनाही त्यांना परत आणावे लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस पक्ष विधानसभेत केवळ पाच सदस्यांचा असून तो विलक्षण कमकुवत बनला आहे. बहुसंख्य ख्रिस्ती आमदार सत्तास्थाने मिळवण्यासाठी भाजपात गेले आहेत. त्यांच्या विरोधातील लोकांच्या असंतोषाला आकार देणेही भाग आहे. केवळ काँग्रेस पक्षाला ताकदवान बनविण्यासाठी हे द्वंद्व महत्त्वाचे नसून लोकशाहीच्या बळकटीसाठीही आवश्यक आहे. लोकांचा राग पाहता ते अशा लढवय्या काँग्रेसला निश्चितच पाठिंबा देतील. परंतु त्यांचे प्रश्न मांडणे आणि सरकारला नामोहरम करण्याची एकही संधी न दवडणे ही कामे कामत यांना करावी लागतील. लोकांचा राग पाहता येत्या वर्षभरात निवडणुका झाल्यास त्यांना सामोरे जाणे भाजपाला निश्चितपणे कठीण असणार आहे. (लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत) 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा