शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

शिक्षक पूर्वी होते तसे का नाहीत, हे कुणी समजून घेईल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 11:01 IST

नवे शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी तब्बल ३४ वर्षे गेली; ते सारे बदल शिक्षकांनी मात्र लगेच वर्षभरात आत्मसात करावेत, ही अवास्तव अपेक्षा होय!

प्रियांका पाटील,  शिक्षक आणि लेखिका

शेकडो वर्षांपासून गुरुपरंपरेअंतर्गत ज्ञानग्रहण करण्याच्या अनेक पद्धती समाजाने अनुभवल्या. बदलत्या काळाबरोबर नव्या शिक्षण पद्धती, शिक्षण व्यवस्था व त्या अनुषंगाने आखलेली शैक्षणिक धोरणे आली.  राजकारण, अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, नवे तंत्रज्ञान या साऱ्यांचा परिणाम शैक्षणिक  व्यवस्थेवर  होऊ लागला. या बदलांच्या झंझावाताचा सर्वाधिक परिणाम झाला, ती व्यक्ती म्हणजे शिक्षक ! आणि बाकी धामधुमीत तोच बऱ्याच अंशी दुर्लक्षित केला गेला. 

दरवर्षी येणाऱ्या नव्या बदलांना ज्याला सामोरे जावे लागते, त्या शिक्षकांना खऱ्या अर्थाने अपडेट / प्रशिक्षित होण्यासाठी आवश्यक तितका वेळ दिला जातो का ? सरकारी नोकरी करत असणारा शिक्षक एका वेगळ्या विवंचनेतून जाताना दिसतो, मग ते शाळेबाहेरचे काम असो किंवा ती नोकरी टिकून राहावी वा त्यात बढती मिळावी, यासाठी वेगवेगळ्या  परीक्षांना सामोरे जाणे असो.  खासगी शाळेत काम करणारा शिक्षक असेल तर त्याच्यामागे एकूणच कामाचे वाढीव तास, शाळेत असणारे इतर काम, संस्थेकडून होणारी पिळवणूक आणि कमी वेतन या साऱ्या विवंचना असतात. पण या साऱ्या गोष्टींकडे लक्ष न देता (सरकारी) शिक्षकांना मिळणारे पगार आणि कमी वेतनात राबणाऱ्या खासगी शाळेतल्या शिक्षकांची दुखणी हेच चर्चेचे विषय होतात.

आज तब्बल ३४ वर्षांनी बदललेल्या शैक्षणिक धोरणाची चर्चा सुरू आहे.  स्वतंत्र  भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांनी कोठारी आयोग प्रस्तावित केला. त्यानंतर १ सप्टेंबर १९६१ रोजी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली. पुढे इंदिरा गांधी यांनी १९६४ ते १९८४ पर्यंत या धोरणांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले. पुढे १९८६  ते १९९२ या धोरणात  बदल होत राहिले. आचार्य रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली याच धोरणात २००२ ते २००९ मध्ये  आणखी काही बदल झाले. आणि आता नवे शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत पूर्वीची ५ -५- २ ही पद्धत रद्द करून ५- ३- ३- ४ अशी नवी रचना अस्तित्वात येऊ घातली आहे. या नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासाबरोबरच संगीत, कला, क्रीडा, योग, समाजसेवा यांनादेखील सारखेच महत्त्व देण्यात आले आहे. परीक्षा पद्धती, विषयांमध्ये केला जाणारा बदल,  प्रादेशिक भाषेला असलेले महत्त्व, व्यावसायिक शिक्षण आणि गुणपत्रकांऐवजी मूल्यांकनांचा वापर असे महत्त्वाचे बदल या अनुषंगाने केले गेलेले दिसतात.

या सगळ्यात पुन्हा अडचण तीच आहे :  शिक्षकांना मिळणारे प्रशिक्षण ! शैक्षणिक धोरणात केलेले बदल ज्यासाठी तब्बल ३४ वर्षांचा कालावधी गेला ; ते सारे बदल शिक्षकांनी मात्र  लगेच एका वर्षात आत्मसात करावेत, अशी  अपेक्षा ठेवली गेली आहे. हे रास्त आहे का?कोरोना काळानंतर शिक्षण पद्धतीत झालेला बदल  शिक्षकांनी आत्मसात केलाच. ते अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर वेगाने शिकले. पण, सारी रचनाच बदलली जात असताना शिक्षकांच्या जडणघडणीसाठी कितीसा वेळ दिला जातो आहे? शिक्षकांची कामाचा वेळ ही तुलनात्मकदृष्ट्या कमी असला, तरी उर्वरित वेळ हा  शिक्षण पद्धतीत झालेले वेगवेगळे बदल आत्मसात करण्यासाठी दिलेला असतो. पण, तसे काही होत नाही हे उघड गुपित आहे! एकतर शिक्षक हा शिक्षणाशी संबंधित नसलेल्या गोष्टीतच भरडला गेलेला दिसतो. पूर्वीच्या शिक्षकांमध्ये असलेली शिकवण्याची तगमग आत्ताच्या शिक्षकांवर दिल्या गेलेला अतिरिक्त कामाच्या बोजामुळे कमी झालेली दिसते. याच कारणास्तव व्यवस्थेने कोणतेही बदल लादण्यापूर्वी शिक्षकांमधील होत गेलेल्या बदलांवरदेखील अभ्यास करणे गरजेचे आहे.  या सर्व बदलांचा मुख्य कणा हा शिक्षक आहे हे विसरता कामा नये... आणि त्यामुळेच काळानुसार शिक्षकाचे बदलत जाणे हे गरजेचेदेखील आहे.