शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

‘वाईच गप ऱ्हावा’

By admin | Updated: June 4, 2016 02:08 IST

आशुतोष गोवारीकरांच्या ‘स्वदेश’ मधील एका प्रसंगात डोळ्यासमोर हाताचा आडवा पंजा धरुन आकाशात पाहाणारा आणि पावसाचा अंदाज व्यक्त करणारा अल्प वा अशिक्षित खेडूत दिसतो.

आशुतोष गोवारीकरांच्या ‘स्वदेश’ मधील एका प्रसंगात डोळ्यासमोर हाताचा आडवा पंजा धरुन आकाशात पाहाणारा आणि पावसाचा अंदाज व्यक्त करणारा अल्प वा अशिक्षित खेडूत दिसतो. भारत सरकारने आता त्याचा शोध घेऊन त्यालाच देशभर फिरवून गावोगावचे पावसाचे अंदाज जाणून घ्यावेत हे बरे! सामान्यत: दरवर्षी मे किंवा फार फार तर एप्रिल महिन्यात वेधशाळा आगामी पावसाळ्याचा अंदाज व्यक्त करीत असतात. यंदा थेट जानेवारी महिन्यापासूनच असे अंदाज येऊ लागले. पहिला अंदाज होता पावसाळा नेहमीपेक्षा लवकर सुरु होण्याचा आणि सरासरीच्या १२०टक्क््यांहून अधिक पाऊस पडण्याचा. कालांतराने या टक्केवारीत घट होऊ लागली पण ती शंभरच्या खाली गेली नाही. काहींच्या मते अतितीव्र दुष्काळामुळे त्रस्त आणि हताश झालेल्या देशवासियांचे ‘मोराल’ उंचावले जावे म्हणून ते केले जात होते वा केले जात आहे. यंदा अल आणि एल या दोन्ही निनोंचा काही त्रास नाही तेव्हां पाऊस रग्गड असेही अधूनमधून सांगितले जाऊ लागले. त्यानंतर अंदमानात पाऊस सुरु झाला पण ‘रोनू’ नावाच्या चक्रीवादळाने त्याची वाट रोखून धरली. हळूच कोकण किनारपट्टीवर चोवीस तासात पाऊस सुरु होईल पण तो मान्सूनपर्व म्हणजे अवकळ्या असेल अशा अंदाजाच्या बातम्या झळकून गेल्या. मध्यंतरी वसंतराव गोवारीकर यांच्या नेतृत्वाखाली पावसाचा अचूक अंदाज व्यक्त करता यावा म्हणून दोनेक डझन मानकं तयार करण्यात आली आहेत आणि अंदाज कधीच चुकणार नाहीत असे दिलासेदेखील दिले गेले. पण गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता केवळ चौथीच्या भूगोलाच्या पुस्तकातच पावसाळा सात जूनला सुरु होतो, प्रत्यक्षात मात्र जुलै उजाडून जातो. यंदाच्या वर्षी पावसाच्या अंदाजांचा जरा अतिरेकच झाला आणि अजूनही होतोच आहे हे खरे असले तरी हे दरवर्षीचेच आहे. पाऊस सुरु झाला की मग तो कशामुळे याबाबत मात्र पोपटपंची सुरु होते. त्यामुळे तो आता जेव्हां यायचा तेव्हा येईल तोवर वेधशाळांनो, ‘वाईच गप ऱ्हावा’! हेच सांगणं