शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नगरच्या उसाचा गोडवा का हरपला?

By सुधीर लंके | Published: December 07, 2017 5:14 AM

खासगी साखर कारखानदार शेतकºयांची अडवणूक करतात म्हणून नगर जिल्ह्यातील पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी सहकारी साखर कारखानदारीचे स्वप्न पाहिले व ते अमलात आणले.

खासगी साखर कारखानदार शेतकºयांची अडवणूक करतात म्हणून नगर जिल्ह्यातील पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी सहकारी साखर कारखानदारीचे स्वप्न पाहिले व ते अमलात आणले. ‘मला शेतकºयांना कारखान्याचे मालक करायचे आहे’ हे पद्मश्रींचे स्वप्न होते. पद्मश्रींच्याच पुतळ्यापासून म्हणजे लोणीतून नगर जिल्ह्यातील शेतकºयांनी ऊस आंदोलनाची हाक दिली आहे व शेतकºयांचा आरोप आहे की सहकारी कारखानदारही सध्या शेतकºयांची लूट करीत आहेत. म्हणजे मालकाचाच मालकावर विश्वास राहिलेला नाही.आणखी एक विसंगती सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथून याच वर्षी शेतकºयांच्या आंदोलनाने पेट घेतला होता. शेतकºयांच्या मालाला रास्त भाव मिळावा, ही त्या आंदोलनाची मागणी होती. या आंदोलनात दोन्ही काँग्रेसचे अनेक नेते शेतकºयांच्या बाजूने रस्त्यावर उतरले. मोदी सरकारवर त्यांनी गरळ ओकली. अनेक नेत्यांनी सहकारी दूध संघ, बाजार समित्या बंद ठेवून शेतकºयांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आज जेव्हा उसाच्या भावाचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा मात्र हे सगळे नेते एकसाथ चिडीचूप झाले. अगदी भाजपचे सुद्धा. उसाला भाव देऊ असेही ते जाहीर करायला तयार नाहीत, अन् शेतकºयांच्या मागणीप्रमाणे भाव देणे परवडणारे नाही, हेही सांगत नाहीत. शेवगावमध्ये शेतकºयांवर गोळीबार होऊनदेखील दोन्ही काँग्रेसचे नेते मौन बाळगून आहेत. शेतकºयांकडे पाहण्याची सत्ताधारी व विरोधक या दोघांचीही दृष्टी कशी सोयीची आहे हे यातून समोर आले.कोल्हापूर, सांगलीत उसाचा साखर उतारा अधिक येतो व ३३०० रुपयांपर्यंत भाव मिळतो, तर नगरचे कारखाने दरात मागे का? हा कळीचा मुद्दा नगरच्या आंदोलनात उपस्थित झाला आहे. खासदार राजू शेट्टी यांनी नगरचे कारखानदार साखर चोरतात म्हणून उतारा कमी दिसतो, असा गंभीर आरोप केला आहे. कॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शेतकरी समन्वय समितीनेही कारखानदारांवर अविश्वास व्यक्त केला आहे.अभ्यासकांच्या मते साखर उताºयास जमिनीचा पोत, पायाभूत सुविधा, कारखान्यांचे व्यवस्थापन असे विविध घटक जबाबदार असतात. सरकारची साखरेच्या विक्रीबाबतची धोरणेही कारखान्यांच्या आड येतात. मात्र, तरीदेखील नगरचा उतारा एवढा कमी का? हा मुद्दा संपत नाही. नगर जिल्ह्यातील काही कारखाने मद्याची निर्मिती करतात. नगरच्या दारूने विदर्भ पोखरून टाकल्याचा आरोप अनेकदा होतो. कोपरगावचा एक कारखाना तर वर्षाला निव्वळ मद्यनिर्मितीपोटी शासनाला ८३२ कोटीचा महसूल देतो. मात्र, दारूचा एवढा महापूर आणूनही शेतकºयांना हे कारखाने इतरांप्रमाणेच भाव देतात. त्यामुळे शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे.नगर जिल्ह्यातील सगळे सहकारी कारखाने वर्षानुवर्षे ठराविक कुटुंबांच्या छत्राखाली आहेत. कारखाना सहकारी असला तरी इतरांना नेतृत्वाला तेथे फारसा वाव नसतो. अध्यक्षही नामधारी असतात. म्हटले तर सगळा एकछत्री अंमल आहे. त्यामुळे कारखान्याच्या अंतर्गत व्यवस्थापनातून साखर उतारा घसरत असेल, तर याची जबाबदारी कुणावर निश्चित करायची? ऊस गोड लागतो, पण त्याची ही कडू बाजू कोण स्वीकारणार?sudhir.lanke@lokmat.com