शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

कशाला उद्याची बात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 02:34 IST

अनेक दुकानांमध्ये ‘आज रोख, उद्या उधार’ फलक पाहायला मिळतात. त्याच धर्तीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज महागाईची तयारी ठेवा, उद्या कदाचित स्वस्ताई येईल, असे सूचित केले आहे.

अनेक दुकानांमध्ये ‘आज रोख, उद्या उधार’ फलक पाहायला मिळतात. त्याच धर्तीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज महागाईची तयारी ठेवा, उद्या कदाचित स्वस्ताई येईल, असे सूचित केले आहे. जीएसटीमुळे महसुलात वाढ झाली, तर कदाचित जीएसटीचे दर कमी करण्याचा विचार केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. म्हणजे जीएसटीमुळे झालेल्या महागाईबद्दल ते बोलायलाच तयार नाहीत. माझा गल्ला भरला की काय देता येईल का, ते पाहीन, अशी व्यापारी वृत्ती त्यांच्या बोलण्यातून दिसते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा हे सण संपून आता दिवाळी तोंडावर आली आहे. पण महागाई कमी होण्याचे नाव नाही. हल्ली शिलाई महाग असल्याने बरेच जण रेडीमेड कपडे घेतात. दिवाळीत नवे कपडे घेतले जातात. पण ते खूप महाग आहेत. कापडावरील जीएसटीमुळे व्यापारीही त्रासून गेले आहेत. फटाक्यांचे तामिळनाडूतील अनेक कारखाने २८ टक्के जीएसटीमुळे बंद पडले आहेत. फटाक्यांच्या बॉक्सवर १२ टक्के जीएसटी आहे. पण फटाका उद्योग बंद पडत असल्याने बॉक्स उत्पादक व कामगार अडचणीत आले आहेत. दिवाळी आणि मिठाई यांचे नाते आहे. पण मिठाई व चॉकलेट्सवर अरुण जेटली यांनी २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लावला आहे. काही मिठाईवर तो कमी असला तरी सुक्या मेव्यामुळे तीही महागच झाली आहे. परिणामी दिवाळी तुम्हाला त्रासात आणि महागाईतच जावो, असाच संदेश मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिला आहे. पेट्रोल व डिझेलचे भाव कमी होण्याची शक्यता नाही. त्यावर २८ टक्के जीएसटी लावला तरी ते स्वस्त होईल. पण कोणतीही वस्तू स्वस्त मिळूच नये, असा पणच जणू जेटली यांनी केला आहे. आता विमानाला लागणारे इंधन महागले. त्याचा सर्वसामान्यांवर परिणाम होणार नाही, असे अनेकांना वाटते. मात्र विमानाने मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. त्यालाही इंधन दरवाढीचा फटका बसणार. डिझेल दरवाढीमुळे अन्नधान्यापासून भाजीपाल्यापर्यंत सर्वच महाग होत आहे. या महागाईची झळ अरुण जेटली वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बसत नाही. पण भाजपाच्या कार्यकर्त्यांना बसत असेलच की. पण तेही बोलायला तयार नाहीत. त्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे. मनामध्ये प्रचंड खदखद आहे, दुसºया पक्षाचे सरकार असते, तर मोर्चे, आंदोलने करता आली असती. पण तेही करणे शक्य नाही. उलट या महागाईचे समर्थन करायची वेळ त्यांच्यावर आली आहे. हे म्हणजे घरात महागाईचे चटके सहन करायचे आणि बाहेर सरकारच्या निर्णयाचे नित्यनेमाने गुणगाण गायचे, असेच आहे. दुसरीकडे मित्रपक्ष शिवसेनेने मात्र महागाईविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. मोदी व जेटली यांनी गुजरातसह पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याचा विचार करून तरी यावर तोडगा काढावा. पण महागाईला तोंड द्यावे लागत असताना, पंतप्रधान मात्र स्वच्छ भारताचे नारे देत आहेत. भारत स्वच्छ असू नये, असे कुणीच म्हणणार नाही. पण प्राधान्य महागाई कमी करायला हवे. ते कुठेही होताना दिसत नाही. रेशनवर जे धान्य घेतात, ते मिळत नाही, साखरेचा कोटा सरकारने कमी केला आहे. त्यामुळे मध्यमवर्गच नव्हे, तर गरीबही पिचत चालला आहे. जीएसटीचे दर प्रसंगी कमी करू असे सांगणारे जेटली, त्या करव्यवस्थेतील अडचणीही कमी करायला तयार नाहीत. त्यामुळे छोट्या व्यापाºयांची अवस्थाही वाईटच आहे. महिन्यातून तीन-तीनदा विवरणपत्रे भरण्याच्या अटीमुळे ते अतिशय चिडले आहेत. हा खरे तर भाजपाचे समर्थन करीत आलेला वर्ग. पण तोही भरडून निघत आहे. त्यामुळे जेटलीजी, आता कशाला उद्याची बात? ‘उद्या’चा वायदा कधीच नसतो. त्यामुळे आजचे काय ते बोला!

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटली