शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

कशाला उद्याची बात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 02:34 IST

अनेक दुकानांमध्ये ‘आज रोख, उद्या उधार’ फलक पाहायला मिळतात. त्याच धर्तीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज महागाईची तयारी ठेवा, उद्या कदाचित स्वस्ताई येईल, असे सूचित केले आहे.

अनेक दुकानांमध्ये ‘आज रोख, उद्या उधार’ फलक पाहायला मिळतात. त्याच धर्तीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज महागाईची तयारी ठेवा, उद्या कदाचित स्वस्ताई येईल, असे सूचित केले आहे. जीएसटीमुळे महसुलात वाढ झाली, तर कदाचित जीएसटीचे दर कमी करण्याचा विचार केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. म्हणजे जीएसटीमुळे झालेल्या महागाईबद्दल ते बोलायलाच तयार नाहीत. माझा गल्ला भरला की काय देता येईल का, ते पाहीन, अशी व्यापारी वृत्ती त्यांच्या बोलण्यातून दिसते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा हे सण संपून आता दिवाळी तोंडावर आली आहे. पण महागाई कमी होण्याचे नाव नाही. हल्ली शिलाई महाग असल्याने बरेच जण रेडीमेड कपडे घेतात. दिवाळीत नवे कपडे घेतले जातात. पण ते खूप महाग आहेत. कापडावरील जीएसटीमुळे व्यापारीही त्रासून गेले आहेत. फटाक्यांचे तामिळनाडूतील अनेक कारखाने २८ टक्के जीएसटीमुळे बंद पडले आहेत. फटाक्यांच्या बॉक्सवर १२ टक्के जीएसटी आहे. पण फटाका उद्योग बंद पडत असल्याने बॉक्स उत्पादक व कामगार अडचणीत आले आहेत. दिवाळी आणि मिठाई यांचे नाते आहे. पण मिठाई व चॉकलेट्सवर अरुण जेटली यांनी २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लावला आहे. काही मिठाईवर तो कमी असला तरी सुक्या मेव्यामुळे तीही महागच झाली आहे. परिणामी दिवाळी तुम्हाला त्रासात आणि महागाईतच जावो, असाच संदेश मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिला आहे. पेट्रोल व डिझेलचे भाव कमी होण्याची शक्यता नाही. त्यावर २८ टक्के जीएसटी लावला तरी ते स्वस्त होईल. पण कोणतीही वस्तू स्वस्त मिळूच नये, असा पणच जणू जेटली यांनी केला आहे. आता विमानाला लागणारे इंधन महागले. त्याचा सर्वसामान्यांवर परिणाम होणार नाही, असे अनेकांना वाटते. मात्र विमानाने मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. त्यालाही इंधन दरवाढीचा फटका बसणार. डिझेल दरवाढीमुळे अन्नधान्यापासून भाजीपाल्यापर्यंत सर्वच महाग होत आहे. या महागाईची झळ अरुण जेटली वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बसत नाही. पण भाजपाच्या कार्यकर्त्यांना बसत असेलच की. पण तेही बोलायला तयार नाहीत. त्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे. मनामध्ये प्रचंड खदखद आहे, दुसºया पक्षाचे सरकार असते, तर मोर्चे, आंदोलने करता आली असती. पण तेही करणे शक्य नाही. उलट या महागाईचे समर्थन करायची वेळ त्यांच्यावर आली आहे. हे म्हणजे घरात महागाईचे चटके सहन करायचे आणि बाहेर सरकारच्या निर्णयाचे नित्यनेमाने गुणगाण गायचे, असेच आहे. दुसरीकडे मित्रपक्ष शिवसेनेने मात्र महागाईविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. मोदी व जेटली यांनी गुजरातसह पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याचा विचार करून तरी यावर तोडगा काढावा. पण महागाईला तोंड द्यावे लागत असताना, पंतप्रधान मात्र स्वच्छ भारताचे नारे देत आहेत. भारत स्वच्छ असू नये, असे कुणीच म्हणणार नाही. पण प्राधान्य महागाई कमी करायला हवे. ते कुठेही होताना दिसत नाही. रेशनवर जे धान्य घेतात, ते मिळत नाही, साखरेचा कोटा सरकारने कमी केला आहे. त्यामुळे मध्यमवर्गच नव्हे, तर गरीबही पिचत चालला आहे. जीएसटीचे दर प्रसंगी कमी करू असे सांगणारे जेटली, त्या करव्यवस्थेतील अडचणीही कमी करायला तयार नाहीत. त्यामुळे छोट्या व्यापाºयांची अवस्थाही वाईटच आहे. महिन्यातून तीन-तीनदा विवरणपत्रे भरण्याच्या अटीमुळे ते अतिशय चिडले आहेत. हा खरे तर भाजपाचे समर्थन करीत आलेला वर्ग. पण तोही भरडून निघत आहे. त्यामुळे जेटलीजी, आता कशाला उद्याची बात? ‘उद्या’चा वायदा कधीच नसतो. त्यामुळे आजचे काय ते बोला!

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटली