शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

कशाला उद्याची बात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 02:34 IST

अनेक दुकानांमध्ये ‘आज रोख, उद्या उधार’ फलक पाहायला मिळतात. त्याच धर्तीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज महागाईची तयारी ठेवा, उद्या कदाचित स्वस्ताई येईल, असे सूचित केले आहे.

अनेक दुकानांमध्ये ‘आज रोख, उद्या उधार’ फलक पाहायला मिळतात. त्याच धर्तीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज महागाईची तयारी ठेवा, उद्या कदाचित स्वस्ताई येईल, असे सूचित केले आहे. जीएसटीमुळे महसुलात वाढ झाली, तर कदाचित जीएसटीचे दर कमी करण्याचा विचार केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. म्हणजे जीएसटीमुळे झालेल्या महागाईबद्दल ते बोलायलाच तयार नाहीत. माझा गल्ला भरला की काय देता येईल का, ते पाहीन, अशी व्यापारी वृत्ती त्यांच्या बोलण्यातून दिसते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा हे सण संपून आता दिवाळी तोंडावर आली आहे. पण महागाई कमी होण्याचे नाव नाही. हल्ली शिलाई महाग असल्याने बरेच जण रेडीमेड कपडे घेतात. दिवाळीत नवे कपडे घेतले जातात. पण ते खूप महाग आहेत. कापडावरील जीएसटीमुळे व्यापारीही त्रासून गेले आहेत. फटाक्यांचे तामिळनाडूतील अनेक कारखाने २८ टक्के जीएसटीमुळे बंद पडले आहेत. फटाक्यांच्या बॉक्सवर १२ टक्के जीएसटी आहे. पण फटाका उद्योग बंद पडत असल्याने बॉक्स उत्पादक व कामगार अडचणीत आले आहेत. दिवाळी आणि मिठाई यांचे नाते आहे. पण मिठाई व चॉकलेट्सवर अरुण जेटली यांनी २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लावला आहे. काही मिठाईवर तो कमी असला तरी सुक्या मेव्यामुळे तीही महागच झाली आहे. परिणामी दिवाळी तुम्हाला त्रासात आणि महागाईतच जावो, असाच संदेश मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिला आहे. पेट्रोल व डिझेलचे भाव कमी होण्याची शक्यता नाही. त्यावर २८ टक्के जीएसटी लावला तरी ते स्वस्त होईल. पण कोणतीही वस्तू स्वस्त मिळूच नये, असा पणच जणू जेटली यांनी केला आहे. आता विमानाला लागणारे इंधन महागले. त्याचा सर्वसामान्यांवर परिणाम होणार नाही, असे अनेकांना वाटते. मात्र विमानाने मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. त्यालाही इंधन दरवाढीचा फटका बसणार. डिझेल दरवाढीमुळे अन्नधान्यापासून भाजीपाल्यापर्यंत सर्वच महाग होत आहे. या महागाईची झळ अरुण जेटली वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बसत नाही. पण भाजपाच्या कार्यकर्त्यांना बसत असेलच की. पण तेही बोलायला तयार नाहीत. त्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे. मनामध्ये प्रचंड खदखद आहे, दुसºया पक्षाचे सरकार असते, तर मोर्चे, आंदोलने करता आली असती. पण तेही करणे शक्य नाही. उलट या महागाईचे समर्थन करायची वेळ त्यांच्यावर आली आहे. हे म्हणजे घरात महागाईचे चटके सहन करायचे आणि बाहेर सरकारच्या निर्णयाचे नित्यनेमाने गुणगाण गायचे, असेच आहे. दुसरीकडे मित्रपक्ष शिवसेनेने मात्र महागाईविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. मोदी व जेटली यांनी गुजरातसह पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याचा विचार करून तरी यावर तोडगा काढावा. पण महागाईला तोंड द्यावे लागत असताना, पंतप्रधान मात्र स्वच्छ भारताचे नारे देत आहेत. भारत स्वच्छ असू नये, असे कुणीच म्हणणार नाही. पण प्राधान्य महागाई कमी करायला हवे. ते कुठेही होताना दिसत नाही. रेशनवर जे धान्य घेतात, ते मिळत नाही, साखरेचा कोटा सरकारने कमी केला आहे. त्यामुळे मध्यमवर्गच नव्हे, तर गरीबही पिचत चालला आहे. जीएसटीचे दर प्रसंगी कमी करू असे सांगणारे जेटली, त्या करव्यवस्थेतील अडचणीही कमी करायला तयार नाहीत. त्यामुळे छोट्या व्यापाºयांची अवस्थाही वाईटच आहे. महिन्यातून तीन-तीनदा विवरणपत्रे भरण्याच्या अटीमुळे ते अतिशय चिडले आहेत. हा खरे तर भाजपाचे समर्थन करीत आलेला वर्ग. पण तोही भरडून निघत आहे. त्यामुळे जेटलीजी, आता कशाला उद्याची बात? ‘उद्या’चा वायदा कधीच नसतो. त्यामुळे आजचे काय ते बोला!

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटली