शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

कशाला उद्याची बात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 02:34 IST

अनेक दुकानांमध्ये ‘आज रोख, उद्या उधार’ फलक पाहायला मिळतात. त्याच धर्तीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज महागाईची तयारी ठेवा, उद्या कदाचित स्वस्ताई येईल, असे सूचित केले आहे.

अनेक दुकानांमध्ये ‘आज रोख, उद्या उधार’ फलक पाहायला मिळतात. त्याच धर्तीवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज महागाईची तयारी ठेवा, उद्या कदाचित स्वस्ताई येईल, असे सूचित केले आहे. जीएसटीमुळे महसुलात वाढ झाली, तर कदाचित जीएसटीचे दर कमी करण्याचा विचार केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. म्हणजे जीएसटीमुळे झालेल्या महागाईबद्दल ते बोलायलाच तयार नाहीत. माझा गल्ला भरला की काय देता येईल का, ते पाहीन, अशी व्यापारी वृत्ती त्यांच्या बोलण्यातून दिसते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा हे सण संपून आता दिवाळी तोंडावर आली आहे. पण महागाई कमी होण्याचे नाव नाही. हल्ली शिलाई महाग असल्याने बरेच जण रेडीमेड कपडे घेतात. दिवाळीत नवे कपडे घेतले जातात. पण ते खूप महाग आहेत. कापडावरील जीएसटीमुळे व्यापारीही त्रासून गेले आहेत. फटाक्यांचे तामिळनाडूतील अनेक कारखाने २८ टक्के जीएसटीमुळे बंद पडले आहेत. फटाक्यांच्या बॉक्सवर १२ टक्के जीएसटी आहे. पण फटाका उद्योग बंद पडत असल्याने बॉक्स उत्पादक व कामगार अडचणीत आले आहेत. दिवाळी आणि मिठाई यांचे नाते आहे. पण मिठाई व चॉकलेट्सवर अरुण जेटली यांनी २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लावला आहे. काही मिठाईवर तो कमी असला तरी सुक्या मेव्यामुळे तीही महागच झाली आहे. परिणामी दिवाळी तुम्हाला त्रासात आणि महागाईतच जावो, असाच संदेश मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिला आहे. पेट्रोल व डिझेलचे भाव कमी होण्याची शक्यता नाही. त्यावर २८ टक्के जीएसटी लावला तरी ते स्वस्त होईल. पण कोणतीही वस्तू स्वस्त मिळूच नये, असा पणच जणू जेटली यांनी केला आहे. आता विमानाला लागणारे इंधन महागले. त्याचा सर्वसामान्यांवर परिणाम होणार नाही, असे अनेकांना वाटते. मात्र विमानाने मालवाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. त्यालाही इंधन दरवाढीचा फटका बसणार. डिझेल दरवाढीमुळे अन्नधान्यापासून भाजीपाल्यापर्यंत सर्वच महाग होत आहे. या महागाईची झळ अरुण जेटली वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बसत नाही. पण भाजपाच्या कार्यकर्त्यांना बसत असेलच की. पण तेही बोलायला तयार नाहीत. त्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे. मनामध्ये प्रचंड खदखद आहे, दुसºया पक्षाचे सरकार असते, तर मोर्चे, आंदोलने करता आली असती. पण तेही करणे शक्य नाही. उलट या महागाईचे समर्थन करायची वेळ त्यांच्यावर आली आहे. हे म्हणजे घरात महागाईचे चटके सहन करायचे आणि बाहेर सरकारच्या निर्णयाचे नित्यनेमाने गुणगाण गायचे, असेच आहे. दुसरीकडे मित्रपक्ष शिवसेनेने मात्र महागाईविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. मोदी व जेटली यांनी गुजरातसह पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याचा विचार करून तरी यावर तोडगा काढावा. पण महागाईला तोंड द्यावे लागत असताना, पंतप्रधान मात्र स्वच्छ भारताचे नारे देत आहेत. भारत स्वच्छ असू नये, असे कुणीच म्हणणार नाही. पण प्राधान्य महागाई कमी करायला हवे. ते कुठेही होताना दिसत नाही. रेशनवर जे धान्य घेतात, ते मिळत नाही, साखरेचा कोटा सरकारने कमी केला आहे. त्यामुळे मध्यमवर्गच नव्हे, तर गरीबही पिचत चालला आहे. जीएसटीचे दर प्रसंगी कमी करू असे सांगणारे जेटली, त्या करव्यवस्थेतील अडचणीही कमी करायला तयार नाहीत. त्यामुळे छोट्या व्यापाºयांची अवस्थाही वाईटच आहे. महिन्यातून तीन-तीनदा विवरणपत्रे भरण्याच्या अटीमुळे ते अतिशय चिडले आहेत. हा खरे तर भाजपाचे समर्थन करीत आलेला वर्ग. पण तोही भरडून निघत आहे. त्यामुळे जेटलीजी, आता कशाला उद्याची बात? ‘उद्या’चा वायदा कधीच नसतो. त्यामुळे आजचे काय ते बोला!

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटली