शहरं
Join us  
Trending Stories
1
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
2
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
3
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
4
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
5
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
6
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
7
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
8
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
9
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
10
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
11
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
12
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
13
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
14
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
15
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
16
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
17
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
18
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
19
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
20
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्माचा विसर का पडतोय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 19:06 IST

मिलिंद कुलकर्णी धर्म, अध्यात्म किंवा धार्मिक आणि अध्यात्मिक या संकल्पनांविषयी समाजजीवनात संभ्रमाचे वातावरण दिसते. धर्म म्हणजे काय, अध्यात्म कोणते ...

मिलिंद कुलकर्णीधर्म, अध्यात्म किंवा धार्मिक आणि अध्यात्मिक या संकल्पनांविषयी समाजजीवनात संभ्रमाचे वातावरण दिसते. धर्म म्हणजे काय, अध्यात्म कोणते याची व्याख्या, विवेचन अनेकांनी केलेले आहे. पण दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग करताना गल्लत होताना दिसतेय. लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या माध्यमांकडून देखील अशीच कृती होताना दिसत आहे. यासंबंधी विचारमंथन करण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या जगातील सर्वात मोठ्या अध्यात्मिक संस्थेने राजस्थानातील माऊंट अबू येथे राष्टÑीय संमेलन घेतले. त्यात सहभागी झाल्यानंतर देशभरातील विविध पत्रकारांच्या भूमिका समजून घेता आल्या.एकीकडे केवळ अध्यात्म हा एकमेव विषय घेऊन चालणाऱ्या दूरचित्रवाहिन्या आहेत, दुसरीकडे वाचकांची मागणी असल्याने वर्तमानपत्रात दैनंदिन स्वरुपात अध्यात्माविषयी मजकूर दिला जात आहे. त्यासोबत हिंसक घटना, गुन्हेगारी कृत्ये याविषयी वेगवेगळे कार्यक्रम, कथा सादर करणाºया वाहिन्या आणि मुद्रित माध्यमे आहेत. अध्यात्म व गुन्हेगारीविषयक दिवसभर चालणारे कार्यक्रम असो की, ठराविक जागेत येणारा मजकूर असो..दोघांनाही चांगला श्रोता वा वाचक वर्ग आहे. वेगवेगळे धर्म, पंथ, संप्रदाय, संस्था, प्रवचनकार, कीर्तनकार हे रसाळ भाषेतून अध्यात्म उलगडून सांगत आहेत. बोजड भाषेतील तत्त्वज्ञानापेक्षा रसाळ भाषेतील भावार्थ लोकांना आवडतो, समजतो. जीवनातील, संसारातील छोट्या छोट्या उदाहरणांवरुन ते अध्यात्मातील संकल्पना लोकांना उलगडून सांगतात, तेव्हा हे अध्यात्म पुस्तकी वाटत नाही, जवळचे वाटते.प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयासारख्या अध्यात्मिक संस्था आणखी पुढचा विचार करताना दिसत आहेत. अध्यात्माचा प्रचार, प्रसार करीत असताना प्रत्येक घटकाने त्याच्या दैनंदिन जीवनात अध्यात्माचा अंगिकार करायला हवा. उक्ती आणि कृतीमध्ये समानता दिसायला हवी, तरच लोकांना त्या घटकावर विश्वास बसतो. पत्रकारांनी वार्तांकन करताना नकारात्मक बाबींना महत्त्व न देता सकारात्मक गोष्टींवर भर द्यायला हवा. संमेलनात झालेल्या चर्चेनुसार, गुन्हेगारी किंवा हिंसक कृत्यांची संख्या सुमारे ५ ते १० टक्के असावी. परंतु, त्या घटनांची प्रसारमाध्यमांवरील व्याप्ती ही ८० ते ९० टक्कयांवर असते. दूरचित्रवाहिन्यांवरील ठळक बातम्यांमध्ये त्याचे प्रत्यंतर आपल्याला येते. अर्थात अलिकडे बदल होऊ लागला आहे. बहुसंख्य वर्तमानपत्रे आता मुखपृष्ठावर अपघात, खून अशा घटनांची छायाचित्रे प्रसिध्द करीत नाहीत. सकारात्मक बातम्या देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. या उपक्रमांचे लोक स्वागत देखील करतात.कोणताही धर्म हा हिंसा शिकवत नाही. सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय अशाच कथा, प्रसंग आपल्या बहुसंख्य धर्मग्रंथांमध्ये दिसून येतील. परस्परांचा द्वेष करु नका, असे धर्मसंस्थापक सांगताना दिसतात. मग जगभर धर्मा-धर्मांमध्ये वाद का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. धर्मातील अध्यात्मिक मूल्याकडे झालेले दुर्लक्ष याला कारणीभूत आहे, असे मला वाटते. आम्ही सोयीचे तेवढे तत्त्वज्ञान उचलतो, तेच घेऊन भूमिका बनवितो. त्यातून हे संघर्ष उभे राहतात. अशा स्थितीत लोकशाहीच्या चारही स्तंभांनी तारतम्य भाव ठेवून कर्तव्यपालन केले तर हे प्रसंग टाळता येऊ शकतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव