शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यावर गुजरातची तहान आपण का भागवावी ?

By नंदकिशोर पाटील | Updated: June 17, 2024 17:54 IST

गुजरातेतील कच्छ, सौराष्ट्र सुजलाम करण्यासाठी गोदावरी, तापी खोऱ्यातील प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पाणी तिकडे नेण्याचा घाट घातला जातोय.

मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, टीम ऑफ असोसिएशन, सूक्ष्म आणि लघु उद्योजकांची संघटना ‘मसिआ’च्या वतीने रविवारी मराठवाड्यातील पाणीप्रश्नासंदर्भात एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या प्रदेशातील पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर कोणीतरी पुढाकार घेत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. गोदावरी, कृष्णा खोऱ्यातील हक्काचे पाणी मिळविणे, राष्ट्रीय जल आयोगाच्या निकषानुसार समोर आलेली तूटकरून काढण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नदीजोडसारख्या प्रकल्पातून वळविणे, अपुरे सिंचन प्रकल्प मार्गी लावणे, कालवे-पाटचाऱ्यांची दुरुस्ती करणे आणि एवढ्या सगळ्यातून सिंचनाचा अनुशेष दूर करणे हे मराठवाड्याच्या भवितव्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. दुर्दैवाने या प्रदेशातील राजकीय नेतृत्व याबाबतीत खूपच कोरडे आहे. नगर-नाशिक जिल्ह्यातील राजकीय नेते अडवणुकीची भूमिका घेतात म्हणून जायकवाडीच्या हक्काच्या पाण्यासाठी आपणास दरवर्षी कोर्टाची पायरी चढावी लागते. तिथेही सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील मंडळींचाच पुढाकार असतो.

कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळविण्यासाठी कितीतरी वर्ष संघर्ष करावा लागला. दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पाबाबत पुन्हा तेच घडते आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला ५० टीएमसी पाणी देण्याची घोषणा दि. १७ सप्टेंबर २०१७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र या योजनेच्या डीपीआरमध्ये मराठवाड्याचा उल्लेखच नसल्याची बाब समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून ज्या दोन नदीजोड प्रकल्पांचा डीपीआर केंद्र सरकारला सादर केला आहे, त्यात दमणगंगा-पिंजाळ आणि तापी-नर्मदा या प्रकल्पांचा समावेश आहे. पैकी दमणगंगा प्रकल्पातून मुंबईतील नागरिकांना पाणी देण्यात येणार आहे, तर तापी-नर्मदामधून गुजरातला ! या नदीजोड प्रकल्पावर गुजरातमध्ये एक खासगी वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती समोर आली आहे.

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आंतरराज्यीय जलवाटपाबाबत राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाने घेतलेली भूमिकाच मुळात वादग्रस्त आणि तितकीच महाराष्ट्रावर अन्याय करणारी आहे. गोदावरी, तापी खोऱ्यातील ८१३ दलघमी पाण्यापैकी ६०० दलघमी पाणी गुजरातला द्यावे, यासाठी हे प्राधिकरण प्रयत्नशील आहे. यावर महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतलाय खरा; परंतु या प्रकल्पाचे डीपीआर तयार करताना महाराष्ट्राच्या भूमिकेकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. वास्तविक, या प्रकल्पाच्या माध्यमातून किमान ३०० दलघमी पाणी महाराष्ट्राला आणि त्यातील किमान ५० टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळायला हवे. गुजरातेतील कच्छ, सौराष्ट्र सुजलाम करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पाणी तिकडे नेण्याचा घाट घातला जातोय. त्यासाठी २०१० साली झालेल्या एका सामंजस्य कराराचा दाखला पुढे केला जातोय.

पाण्याबाबत दक्षिणेकडील राज्य जेवढे सजग आणि सतर्क आहे, तेवढी सजगता दुर्दैवाने आपल्याकडे नाही. पश्चिम वाहिन्या नद्यातून कोकणात समुद्राला जाणारे पाणी असो की कोयना-कृष्णा नद्यातून कर्नाटकात वाहून जाणारे पाणी असो. ते आपल्याकडील दुष्काळग्रस्त भागात वळविण्यासाठी आजवर प्रयत्नच झाले नाहीत. कारण राज्य सरकारकडे समग्र असा जल आराखडाच नाही ! वास्तविक, कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त ५१ टीएमसी, कोकणात वाहून जाणारे १५५ टीएमसी आणि नर्मदा-तापी खोऱ्यातील ३४ टीएमसी पाण्याचे योग्य नियोजन करुन ते पाणी मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात वळविले तर हा प्रदेशदेखील सुजलाम होऊ शकतो. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि जनरेट्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रgodavariगोदावरीGujaratगुजरातMarathwadaमराठवाडा