शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

...शख्स परेशान सा क्यों है?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 2:33 AM

मुंबईत ३१ टक्के रुग्ण मनोविकारांशी, मानसिक ताणांशी झगडत असल्याचा मुंबई महापालिकेने जाहीर केलेला आकडा पाहिला, तर या महानगरीचे मन आतून कसे पोखरले जातेय आणि मुंबापुरीच्या आनंदाचा निर्देशांक किती फसवा आहे, याची प्रचिती येते.

मुंबईत ३१ टक्के रुग्ण मनोविकारांशी, मानसिक ताणांशी झगडत असल्याचा मुंबई महापालिकेने जाहीर केलेला आकडा पाहिला, तर या महानगरीचे मन आतून कसे पोखरले जातेय आणि मुंबापुरीच्या आनंदाचा निर्देशांक किती फसवा आहे, याची प्रचिती येते. या ताणाच्या जगण्यावर होणाऱ्या परिणामातून समोर आलेले मधुमेहाचे २३.२ टक्के, अतिताणाचे २२.८ टक्के व हृदयविकाराचे साडेसात टक्के रुग्ण जर यासोबत जोडले तर सुमारे ८४ टक्के मुंबईकर हे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तणावाखाली जगत असल्याचे वास्तवही यातून समोर आले. ही स्थिती एकट्या मुंबईची नाही; तर मुंबईच्या कुशीतील उपनगरे, ठाणे-पालघर-रायगड जिल्हा आणि नवी मुंबईचीही आहे. सध्याची आकडेवारी पालिका रुग्णालयांतील आहे. त्यात खासगी रुग्णालयांचा समावेश केला, तर चित्र आणखी विषण्ण करणारे असेल. जीवनशैलीत बदल होत ती दिवसेंदिवस गतिमान, प्रचंड स्पर्धेची व उद्याची फारशी शाश्वती नसलेली होणे हे या तणावाचे मूळ आहे. ज्यांच्या हाती नोकरी आहे त्यांना ती टिकवण्याचा; तर शिक्षण असून किंवा नसूनही बेरोजगार राहावे लागत असल्याचा ताण, वाढत्या महागाईमुळे खर्चाची तोंडमिळवणी करण्यातील ओढग्रस्तता, वेगवेगळ्या कारणांमुळे रोजचा अस्वस्थ करणारा प्रवास, त्यातून येणारे नैराश्य- उदासीनता- चिडचिड, पुरेशी झोप न होणे व आनंदाचे-समाधानाचे क्षण कमी होत गेल्याचा हा परिपाक असल्याचा निष्कर्ष यातून समोर येतो. सोशल मीडियातून माणसे सतत संपर्कात आली, पण त्यांच्यातला संवाद हरपला. त्यामुळे मन मोकळे करावे, असे भोवती कुणी सापडत नाही, यामुळेही ताणाखाली वावरणारी मने कुरतडली जात आहेत. एक चांगले झाले, यानिमित्ताने मुंबईचा आरोग्य निर्देशांक समोर आला. मनावर ताण आहे, हे मान्य करून त्याबाबत बोलण्याइतका मोकळेपणाही समाजात येऊ लागला. यामुळे पुढच्या काळात आरोग्य सुविधांना कशी दिशा द्यायची, याचे चित्र ठरवता येऊ शकते. जगण्याची भ्रांत असलेले किंवा आर्थिक सुबत्ता असलेले या दोन्ही टोकांपर्यंत धावणाºया जगण्याच्या लंबकात चित्ती पुरेसे समाधान नसल्याची बाब एकसमान असल्याचे सांगत या आकडेवारीने जीवनशैलीचे आजार ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही, हेही समोर आणले. यातून आरोग्याच्या सुविधांत बदल होतीलही, पण त्याही पलीकडे जाऊन जगण्याचा आनंद कसा वाढवता येईल, यावर लक्ष देण्याची; त्यासाठी जागृती करण्याची गरज आहे. मन प्रसन्न करण्याची गुरूकिल्ली प्रत्येकालाच सापडेल असे नव्हे! पण किमान ताणतणावांचा निचरा कसा होईल, कोंडलेली, घुसमटलेली मने मोकळी कशी होतील यावर काम करता आले; तरी ताणांचा निचरा होण्यास व आयुष्याचा खळाळता झरा वाहण्यास मदत होईल. सध्या तेवढेही पुरेसे आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई