शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

अर्धे अवकाश झाकोळलेले का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 23:12 IST

मिलिंद कुलकर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्लयावरुन केलेल्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमातील भाषणात महिलांच्या सॅनिटरी नॅपकिनचा विषय घेतला, याबद्दल ...

मिलिंद कुलकर्णीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्लयावरुन केलेल्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमातील भाषणात महिलांच्या सॅनिटरी नॅपकिनचा विषय घेतला, याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. पक्षभेद विसरुन शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मासिक पाळी स्वच्छतेवरील चर्चेला मुख्य प्रवाहात आणल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या विषयावरील चित्रपटात भूमिका करणाऱ्या अक्षयकुमारने पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. देशातील ६ हजार जनऔषधी केंद्राद्वारे ५ कोटींपेक्षा जास्त सॅनिटरी नॅपकिन महिलांना देण्यात आल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला होता.महात्मा गांधी, संत गाडगेबाबा या महापुरुषांनी ग्रामस्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. स्व.आर.आर.पाटील यांच्यासारख्या संवेदनशील मंत्र्याने ग्रामस्वच्छता अभियान शासकीय पातळीवर राबविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ संपूर्ण देशभर नेले. शासकीय अभियानाच्या यशापयशाविषयी शंका असल्या तरी हा विषय गावपातळीवर पोहोचला. वैयक्तिक शौचालयांचे महत्त्व पटू लागले. पुन्हा अक्षयकुमार याने ‘टॉयलेट’सारख्या चित्रपटात भूमिका साकारुन त्याला व्यापक अर्थ प्राप्त करुन दिला. वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करीत सॅनिटरी नॅपकिनचा विषय मुख्य प्रवाहात आणून त्याविषयी जनजागृतीची नितांत आवश्यकता आहे. देशभरात काही संस्था, काही व्यक्ती प्रयत्नशील आहेत, त्याला यश मिळत आहे. पण व्यापक स्वरुपात अभियान राबविल्याशिवाय जनजागृती शक्य नाही.महिलांविषयीच्या प्रश्नांविषयी संवेदनशीलतेने कार्य करण्याची आवश्यकता आहे. भारतीय संस्कृतीत महिलांना सन्मानाचे स्थान आहे, मात्र त्यांच्या शारीरिक समस्या, अडचणी याविषयी जाहीरपणे बोलणे त्याज्य मानले जाते. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचे तर महिलांवर लाख उपकार आहेत, ज्यांनी स्वत: शेणमारा सहन करीत स्त्रीशिक्षणाचा कृतीशील पाया रचला. अवांछित अपत्यप्राप्ती टाळण्यासाठी संतती प्रतिबंधक उपायांच्या प्रचारासाठी र.धो.कर्वे या द्रष्टया व्यक्तीत्वाने केलेले प्रयत्न विलक्षण आहेत. फुले दाम्पत्य असो की, कर्वे असो त्यांच्या कार्याचे मोठेपण यासाठी आपण आहे की, स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी हे कार्य केले. समाज कर्मठ आणि रुढी-परंपराशी बांधील असताना त्यांनी हे दूरदृष्टीचे व व्यापक जनहिताचे कार्य केले. आता तर आम्ही एकविसाव्या शतकात आहोत. विज्ञान -तंत्रज्ञानाने जीवनात आमुलाग्र बदल केला आहे. पण तरीही महिलांविषयीचे मुलभूत प्रश्न अद्याप आम्ही सोडवू शकलेलो नाही. महानगरांमध्ये सुविधा असतील, पण ग्रामीण भागात अद्यापही समस्या बिकट आहे. सॅनिटरी नॅपकिन आणि महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृह हे दोन विषय अद्यापही गंभीर आहेत. त्यातून निर्माण होणाºया प्रश्नांविषयी काही पाहणी अहवाल आले आहेत, त्याचे निष्कर्षदेखील धक्कादायक आहेत. पण अजूनही म्हणावे तसे लक्ष या विषयांकडे दिले जात नाही. याला सामाजिक उदासिनता जशी कारणीभूत आहे, तसाच समाजातील स्त्री -पुरुष भेद हा कळीचा मुद्दा आहे. आम्ही स्वत:ला पुढारलेले म्हणत असल्याने हे सहजी मान्य करणार नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत महिलांनी गाजविलेले कर्तुत्व पटकन उदाहरणादाखल सांगितले जाईल. हे खरे असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के समान वाटा मिळाला असला तरी ही सत्ता राबविण्याचे स्वातंत्र्य पुरुषी मानसिकतेने त्यांना दिले आहे काय? स्वयंभू, स्वतंत्र विचाराच्या महिलांना या आरक्षणाचा लाभ किती झाला आणि राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांना किती झाला, हे जगजाहीर आहे. वॉर्ड, गट वा गण आरक्षित झाला म्हणून घरातील आई, पत्नी, बहिण, मुलगी यापैकी कुणाला तरी निवडून आणायचे आणि सत्ता आपल्याच हाती ठेवायची, असेच प्रकार आहेत. काही सन्माननीय अपवाद असतील. पण बहुसंख्य ठिकाणी हीच स्थिती आहे. ‘झेरॉक्स नगराध्यक्ष’ असा शब्द ग्रामीण महाराष्टÑात रुढ झाला आहे. किमान महिला पदाधिकारी असलेल्या ग्रामपंचायती, पालिकांमध्ये तरी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, सॅनिटरी नॅपकीन सहजपणे उपलब्ध होणारी यंत्रणा हे विषय मार्गी लागले आहेत काय? त्याचे उत्तर नकारात्मक येईल. बाजारपेठ, बसस्थानक, रेल्वे स्थानक, प्रवासादरम्यान असलेली हॉटेल, पेट्रोल पंप याठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असली तरी त्याची अवस्था अतीशय वाईट असते. स्वत:च्या आरोग्याविषयी निर्णय घेण्याचे अधिकारदेखील महिलांना नाही, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हा मुद्दा स्वातंत्र्यदिनी मांडणे महत्त्वपूर्ण आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव