शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

लेखक का बोलतो? - त्याचे आतडे पिळवटते म्हणून!

By नम्रता फडणीस | Updated: July 12, 2022 07:50 IST

कुणाला काही वाटत नाही, हे खरे नव्हे! परिस्थितीला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही, असे वाटल्याने लेखक मंडळी कदाचित स्वस्थ बसत असतील.

वसंत आबाजी डहाके,ज्येष्ठ साहित्यिकआज हे इतके स्वस्थ राहणे आपल्याला परवडणार आहे का? आपल्याला स्वस्थता लाभली आहे ते आपले स्वास्थ अजून किती काळ टिकून राहणार; की तो एक भ्रमच आहे? मनुष्य चालताना त्याला अनेकदा विस्मरण होते की आपण कुठून आलो, कुठे चाललो आहोत आणि आपल्याला कोणत्या दिशेला जायचं आहे; त्याला काही कळत नाही. तो असाच उगाचच भटकत राहतो.

जेव्हा दुसरा माणूस त्याला स्पर्श करतो, तेव्हा हे बदलते. माणसाचा स्पर्श झाला की त्याला भान येते की आपण आहोत. आपल्या अस्तित्वाची त्याला जाणीव होते. आता हा प्रश्न आहे की, माणसाचा हा स्पर्श हरवला आहे की काय?  जवळच्या पिढीत तो चेहरा शोधण्याची किमान धडपड तरी आहे. आसाराम लोमटे, कृष्णा खोत, किरण गुरव अशी पुष्कळ नावे सध्याच्या पिढीमध्ये दिसतात, जे त्या माणसांचा शोध घेत आहेत. त्या सामान्य माणसाची सध्याची स्थिती काय आहे, ते आपल्याला समजावून सांगत आहेत. 

प्रत्यक्ष आणि वास्तव यातून लेखक सामान्य माणसाचा शोध घेत आहे. सध्याच्या काळातले अनेक कवी या स्थितीचा वेध घेत आहेत, ते खिन्न आणि उद्विग्नही होत आहेत. आता अस्वस्थ शतकाची कविता लिहिण्याचे दिवस संपले; आता स्वस्थ शतकातील कविता लिहिली जाते आहे, असे म्हणण्यात मला फार काही तथ्य वाटत नाही. कारण आत्तादेखील अस्वस्थ काळातलीच कविता लिहिली जात आहे. 

लेखक का बोलतो? - सभोवतालचे वास्तव पाहून त्याचे आतडे पिळवटते, तो अस्वस्थ होतो, म्हणून बोलतो. सामान्य माणसे कोणत्या प्रकारचे जीवन जगत आहेत, त्यांच्या आयुष्यात काय घडते आहे, कोरोनाच्या काळात भर उन्हात ती कशी चालत होती, ती कशी आपल्या घरापर्यंत पोहोचली नाहीत, पोहोचल्यानंतरही गावाची दारे त्यांच्यासाठी कशी बंद होती, त्यांना किती हालअपेष्टा आणि समस्यांना तोंड द्यावे लागले हे सगळे लेखक पाहात असतो. म्हणून त्याला बोलावेसे वाटते. सुन्न करणारी शांतता त्याला ऐकू येते म्हणून तो बोलतो. 

त्याच्या मनातल्या भयाला कारण ठरणाऱ्या अनेक गोष्टी असतात. भय स्वत:चे काय होईल याचे नाही तर आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांचे काय होईल, याची भीती त्यांच्या मनात असते. म्हणून बोलावेसे वाटले, तरी अनेकदा लेखक गप्प राहणे पत्करतात. सध्याच्या वातावरणात सगळे उत्तम चालले आहे, असे कुणाला वाटत असेल असे मला वाटत नाही. चुकीचे घडताना दिसत असूनही परिस्थितीला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही, असे वाटल्याने लेखक मंडळी कदाचित स्वस्थ बसत असतील.  

भारत सासणे यांनी त्यांच्या साहित्य संमेलनाच्या  अध्यक्षीय भाषणात मार्मिक आणि सूचकपणे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी  भ्रमयुगाचा मुद्दा मांडला आहे. एक अबोध दहशत, भीती आणि आतंक असे शब्द वापरले आहेत. हे भय आपण अनुभवत आहोत, पण ते आपण मान्य करत नाही. 

आतून भय वाटत असले तरी आपण बाहेरुन असा आव आणतो की, आपल्याला कसलेच भय नाही. कोणतीही भीती आपल्याला वाटत नाही, पण  हे भय माणसे आपल्या आत जगत असतात. जगण्याला हे भय वेढून आहे. लेखक टोकदार अस्वस्थतेच्या शिंगाशी झुंज देत असतो. ही काळरात्रीची सुरुवात आहे, असे ते म्हणतात. सासणे यांचे हे शब्द कदाचित टीकाकारांना झोंबले असतील, अत्यंत प्रक्षोभकही असतील, पण हेच जर वास्तव असेल तर? - या सुन्न करणाऱ्या शांततेत एक शब्द तरी उच्चारायला हवा!

(‘दक्षिणायन’ या संस्थेतर्फे पुण्यात ‘लेखक का बोलतो?’ या विषयावर झालेल्या परिसंवादात केलेल्या विस्तृत मांडणीचा संपादित सारांश) शब्दांकन : नम्रता फडणीस