शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कुपोषणाविरोधात एकही मेणबत्ती का पेटत नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 04:39 IST

कुपोषण समस्या कमी न होण्यामागे आपली व्यवस्था कारणीभूत असली, तरी सगळा दोष तिच्या माथी मारणेही योग्य नाही.

- प्रमोद गायकवाडकुपोषण समस्या कमी न होण्यामागे आपली व्यवस्था कारणीभूत असली, तरी सगळा दोष तिच्या माथी मारणेही योग्य नाही. गावोगावच्या भव्य क्रिकेट टुर्नामेंट्स आणि पदयात्रांच्या धुरळ्यात तरु णाई अखंड बुडालेली असताना, त्याच गावांमधील लाखो कळ्या पोषणाअभावी रोज खुरटत आहेत. ऊठसूठ दुखावणाऱ्या अस्मितांच्या बजबजपुरीत पाचशे मुले मेल्यावरही आपल्या संवेदना जाग्या होत नाहीत, हे कशाचे लक्षण आहे?मेळघाटात नऊ महिन्यांत पाचशे बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची बातमी वाचली. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे लोटली, तरी आपण गरीब आदिवासी ग्रामीण जनतेला जगण्यासाठी मूलभूत सुविधा देऊ शकलो नाही, हे खूपच निराशाजनक आहे.कुपोषण आणि बालमृत्यूसारख्या संवेदनशील विषयाच्या अपयशात काही दोष निर्णय प्रक्रि येत सहभागी असलेल्या शासकीय यंत्रणेचा, काही दोष हा अंमलबजावणी करणाºया प्रशासकीय यंत्रणेचा आणि काही दोष अशिक्षित पालकांचा आहे. या तीनही कड्या जोवर सांधल्या जात नाहीत, तोवर कोणीही कितीही वर्षे कितीही अब्ज रुपये खर्च केले, तरी कुपोषणाचे प्रमाण कमी होणार नाही, याची जाणीव झाली. म्हणूनच तुटलेल्या या कड्या जोडून एक नवी साखळी गुंफण्याचा एक प्रयत्न नाशिक जिल्ह्यात केला गेला. दोन वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातही ५६ बालके कुपोषणामुळे दगावली होती. या घटनेने व्यथित होऊन सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थेने बालरोगतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, औषध विक्रेते आणि डॉक्टर्स असोसिएशन यांच्या मदतीने कुपोषण निर्मूलनासाठी एक अभिनव प्रायोगिक उपक्र म राबविला. सुनियोजित पद्धतीने काम केल्यास कुपोषणावर मात करणे शक्य आहे का, हे बघण्यासाठी आदिवासीबहुल त्र्यंबकेश्वर तालुक्यात हा प्रयोग केला.विशेष बाब म्हणजे, या प्रयोगांतर्गत ३५३ कुपोषित मूलांपैकी किमान दोन तपासणी शिबिरांत हजर राहिलेल्या ६५ टक्के मुलांचे वजन केवळ ३ महिन्यांत १ किलोपेक्षा जास्त वाढले. त्यापैकी मृत्यूच्या दारात असलेल्या तीन बालकांना शहरात उपचारासाठी दाखल करून त्यांचा जीव वाचविण्यात आला.कुपोषण निर्मूलनासाठीचे बहुतांश प्रयत्न हे आहार पुरविण्यापर्यंत मर्यादित आहेत. आहारासोबतच निदान आणि उपचार यावरही भर देणे गरजेचे आहे. बालकांमधील कुपोषणाचे कारण तज्ज्ञ डॉक्टर्सकडून व्यक्तिगत स्तरावर निदान करून घेतले जात नाही, तोपर्यंत त्यावर उपचार होणे कठीण आहे. आदिवासी भागातील शिक्षणाच्या कमी प्रमाणामुळे बरेचदा अस्वच्छता, अनियमित आहार आणि औषधांचा अयोग्य वापर हीसुद्धा कुपोषणाची कारणे आहेत.कुपोषणावर काम करणाºया अनेक कार्यकर्त्यांना विचाराल, तर ते शासकीय यंत्रणेकडे बोट दाखवतील. हा सुस्तावलेला अजगर जागा करणे अवघड काम आहे. एखाद्या चित्रपटातील कुठले तरी एक दृश्य आपल्याला चुकीचे वाटते, म्हणून ढिगाने तोडफोड करणारा जमाव, कथा-कवितांमधील मजकूर कुणाला तरी आक्षेपार्ह वाटला, म्हणून पुस्तकांची होळी करणारा आपला समाज हजारो गरीब बालक रोज मृत्युमुखी पडत असताना मात्र निद्रिस्त असतो. खेड्यांपाड्यांतील गोरगरिबांची हजारो मुले रोज अन्नपाण्यावाचून मरून जात असताना, शहरातील अन्यायावर निघणाºया मोर्चातील एकही मेणबत्ती त्यांच्यासाठी पेटत नाही, हे दुर्दैव आहे.( अध्यक्ष, सोशल नेटवर्किंग फोरम)