शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

कुपोषणाविरोधात एकही मेणबत्ती का पेटत नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 04:39 IST

कुपोषण समस्या कमी न होण्यामागे आपली व्यवस्था कारणीभूत असली, तरी सगळा दोष तिच्या माथी मारणेही योग्य नाही.

- प्रमोद गायकवाडकुपोषण समस्या कमी न होण्यामागे आपली व्यवस्था कारणीभूत असली, तरी सगळा दोष तिच्या माथी मारणेही योग्य नाही. गावोगावच्या भव्य क्रिकेट टुर्नामेंट्स आणि पदयात्रांच्या धुरळ्यात तरु णाई अखंड बुडालेली असताना, त्याच गावांमधील लाखो कळ्या पोषणाअभावी रोज खुरटत आहेत. ऊठसूठ दुखावणाऱ्या अस्मितांच्या बजबजपुरीत पाचशे मुले मेल्यावरही आपल्या संवेदना जाग्या होत नाहीत, हे कशाचे लक्षण आहे?मेळघाटात नऊ महिन्यांत पाचशे बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची बातमी वाचली. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे लोटली, तरी आपण गरीब आदिवासी ग्रामीण जनतेला जगण्यासाठी मूलभूत सुविधा देऊ शकलो नाही, हे खूपच निराशाजनक आहे.कुपोषण आणि बालमृत्यूसारख्या संवेदनशील विषयाच्या अपयशात काही दोष निर्णय प्रक्रि येत सहभागी असलेल्या शासकीय यंत्रणेचा, काही दोष हा अंमलबजावणी करणाºया प्रशासकीय यंत्रणेचा आणि काही दोष अशिक्षित पालकांचा आहे. या तीनही कड्या जोवर सांधल्या जात नाहीत, तोवर कोणीही कितीही वर्षे कितीही अब्ज रुपये खर्च केले, तरी कुपोषणाचे प्रमाण कमी होणार नाही, याची जाणीव झाली. म्हणूनच तुटलेल्या या कड्या जोडून एक नवी साखळी गुंफण्याचा एक प्रयत्न नाशिक जिल्ह्यात केला गेला. दोन वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातही ५६ बालके कुपोषणामुळे दगावली होती. या घटनेने व्यथित होऊन सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थेने बालरोगतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, औषध विक्रेते आणि डॉक्टर्स असोसिएशन यांच्या मदतीने कुपोषण निर्मूलनासाठी एक अभिनव प्रायोगिक उपक्र म राबविला. सुनियोजित पद्धतीने काम केल्यास कुपोषणावर मात करणे शक्य आहे का, हे बघण्यासाठी आदिवासीबहुल त्र्यंबकेश्वर तालुक्यात हा प्रयोग केला.विशेष बाब म्हणजे, या प्रयोगांतर्गत ३५३ कुपोषित मूलांपैकी किमान दोन तपासणी शिबिरांत हजर राहिलेल्या ६५ टक्के मुलांचे वजन केवळ ३ महिन्यांत १ किलोपेक्षा जास्त वाढले. त्यापैकी मृत्यूच्या दारात असलेल्या तीन बालकांना शहरात उपचारासाठी दाखल करून त्यांचा जीव वाचविण्यात आला.कुपोषण निर्मूलनासाठीचे बहुतांश प्रयत्न हे आहार पुरविण्यापर्यंत मर्यादित आहेत. आहारासोबतच निदान आणि उपचार यावरही भर देणे गरजेचे आहे. बालकांमधील कुपोषणाचे कारण तज्ज्ञ डॉक्टर्सकडून व्यक्तिगत स्तरावर निदान करून घेतले जात नाही, तोपर्यंत त्यावर उपचार होणे कठीण आहे. आदिवासी भागातील शिक्षणाच्या कमी प्रमाणामुळे बरेचदा अस्वच्छता, अनियमित आहार आणि औषधांचा अयोग्य वापर हीसुद्धा कुपोषणाची कारणे आहेत.कुपोषणावर काम करणाºया अनेक कार्यकर्त्यांना विचाराल, तर ते शासकीय यंत्रणेकडे बोट दाखवतील. हा सुस्तावलेला अजगर जागा करणे अवघड काम आहे. एखाद्या चित्रपटातील कुठले तरी एक दृश्य आपल्याला चुकीचे वाटते, म्हणून ढिगाने तोडफोड करणारा जमाव, कथा-कवितांमधील मजकूर कुणाला तरी आक्षेपार्ह वाटला, म्हणून पुस्तकांची होळी करणारा आपला समाज हजारो गरीब बालक रोज मृत्युमुखी पडत असताना मात्र निद्रिस्त असतो. खेड्यांपाड्यांतील गोरगरिबांची हजारो मुले रोज अन्नपाण्यावाचून मरून जात असताना, शहरातील अन्यायावर निघणाºया मोर्चातील एकही मेणबत्ती त्यांच्यासाठी पेटत नाही, हे दुर्दैव आहे.( अध्यक्ष, सोशल नेटवर्किंग फोरम)