शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
3
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
4
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
5
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
6
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
7
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
8
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
9
Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
10
Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!
11
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
12
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
13
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
14
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
15
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
16
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
17
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
18
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
19
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
20
Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?

दृष्टिकोन; माहिती अधिकार कायद्यात सरकारला का बदल हवे आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 06:22 IST

२००३ मध्ये महाराष्ट्रात लागू झालेल्या माहिती अधिकार कायद्याचा मसुदा चांगला असल्याने, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारने २००५मध्ये संसदेमध्ये माहिती अधिकार कायदा तयार केला.

अण्णा हजारेस्वातंत्र्यानंतर तब्बल ५८ वर्षांनी म्हणजे २००५मध्ये माहिती अधिकार कायदा जनतेला मिळाला़ त्यात बदल करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी सरकारने सुरू केला आहे़ ही जनतेची फसवणूक आहे़ लोकसभा आणि विधानसभा कायदा बनविणाऱ्या सभा आहेत. आमचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे. संविधानाच्या आधाराने कायदे बनतात व त्या कायद्यांच्या आधारे देश चालतो. कायदे जरी लोकसभा, विधानसभेत बनत असले, तरी कायद्याचा मसुदा बनविताना जनतेचे मत विचारात घेऊन कायदा बनविणे आवश्यक आहे. कारण ही लोकशाही आहे. कायदा व कायद्याचा मसुदा दोन्ही बाबी सरकारनेच बनविणे ही लोकशाही नाही, तर इंग्रजांची हुकूमशाही ठरते.

२००३ मध्ये महाराष्ट्रात लागू झालेल्या माहिती अधिकार कायद्याचा मसुदा चांगला असल्याने, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारने २००५मध्ये संसदेमध्ये माहिती अधिकार कायदा तयार केला. देशातील जनतेला पहिल्यांदाच तिजोरीतील पैशाचा हिशेब घेण्याचा अधिकार मिळाला. लोकांमध्ये जागृती आल्यामुळे या कायद्याच्या आधारे माहिती मागविणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली. त्यामुळे शासन, प्रशासनातील भ्रष्ट व्यक्तींना त्रास व्हायला लागला़ यामुळे मनमोहन सिंग सरकारने या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी २००६ साली कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही सरकारला आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. ९ आॅगस्ट, २००६ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधी स्थळ आळंदी (पुणे) येथे मोठे आंदोलन झाले. पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन पसरल्यामुळे मनमोहन सिंग सरकारने मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कायद्यात बदल न करण्याचे लिखित आश्वासन घेऊन आळंदी येथे पाठविले होते. यामुळे मी माझे उपोषण ११ दिवसांनंतर १९ आॅगस्ट, २००६ रोजी सोडले. या उपोषणामुळे माहिती अधिकार कायद्याची तोडफोड करता आली नाही.

शासन, प्रशासनाकडून माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्यांना आळा बसावा, यासाठी कायद्यातील कलम ४ ज्यामध्ये, सर्व संस्थांनी आपल्या कार्यालयाची सर्व माहिती इंटरनेटवर (ऑनलाइन) टाकावी, अशी तरतूद आहे, परंतु कायदा बनून १४ वर्षे झाले, तरी कलम ४ ची योग्य अंमलबजावणी होत नाही. अंमलबजावणीऐवजी कायद्यात आपल्या फायद्यासाठी बदल करण्याचा सरकारचा विचार आहे. २००६मध्ये मनमोहन सिंग सरकारने जनआंदोलनामुळे कायद्यात दुरुस्त्या केल्या नाहीत, परंतु आता नरेंद्र मोदी सरकार माहिती अधिकार कायद्यात बदल करू इच्छित आहे. यासाठी संसदेत विधेयक मांडले आहे. लोकसभेत ते मंजूरही झाले़ या दुरुस्त्यांमध्ये राज्य व केंद्रीय माहिती आयुक्तांना पदावरून हटविण्याचा अधिकार सरकारने स्वत:कडे घेतला आहे़ माहिती आयुक्तांना पदावरून कसे दूर करता येते, याबाबतची तरतूद कायद्यात आहे़ कायदा कमजोर करून त्यात सरकारला हस्तक्षेप करण्याची संधी मिळावी, असा प्रयत्न असू शकतो़ हा कायदा कमजोर झाला व सरकार तो आपल्या पद्धतीने वापरू लागले, तर प्रशासन व सरकारवर या कायद्याचा जो धाक आहे, तोच संपेल.

जनतेच्या भल्यासाठीचा लोकपाल कायदा १७ व १८ डिसेंबर, २०१३ रोजी तयार झाला. फक्त अंमलबजावणी होणे बाकी होते, परंतु त्यासाठी पाच वर्षांचा कालावधी गेला, तरीही सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेने आंदोलन केले आणि सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यामुळे लोकपालांची नियुक्ती झाली. जनतेला वेळोवेळी आंदोलने करावी लागत असतील, तर ते लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. देश, राज्य आणि जनतेच्या हितासाठी मी माझ्या जीवनात प्राणाची बाजी लावून १९ वेळा उपोषण केले आहे. आता ८२ वर्षे वय झाले आहे. ३० वर्षांपासून समाज, देश, राज्याच्या हितासाठी हजारो किलोमीटर प्रवास केल्यामुळे शरीर थकले आहे. अलीकडेच राळेगणसिद्धी येथे केलेल्या आठ दिवसांच्या उपोषणामुळे मला आलेला थकवा अद्याप गेलेला नाही, परंतु देशातील जनता माहिती अधिकार कायद्याला वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरण्यास तयार असेल, तर मीही समाज आणि देशाच्या हितासाठी तयार असेन. समाज आणि देशाची सेवा करण्याचा जीवनामध्ये निर्धार केला आहे. ज्या दिवशी मरण येईल, ते समाज आणि देशाची सेवा करता-करता येईल. कोणत्याही तुरुंगामध्ये जागा उरणार नाही, असे जनआंदोलन झाले, तर कोणतेही सरकार जनतेचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न करणार नाही. सरकारची तिजोरी ही जनतेची तिजोरी आहे़ आपल्या तिजोरीतला पैसा सरकार कसे खर्च करतो व त्याचा हिशेब मागण्याचा अधिकार जनतेला आहे. म्हणून खरा माहितीचा अधिकार हा क्रांतिकारी कायदा आहे. 

(लेखक ज्येष्ठ समाजसेवक आहेत)

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकारanna hazareअण्णा हजारेNarendra Modiनरेंद्र मोदी