शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारतातून विद्यार्थी शिकायला परदेशात का जातात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 10:43 IST

काल सकाळी नवी मुंबईत फिरायला गेलो होतो. रस्त्यावर विजेच्या खांबांवर ओळीने तरुणांचे फोटो लावले होते.  भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जायला मदत करणाऱ्या एका सल्लागार कंपनीची ही जाहिरात होती.

नीरज हातेकर प्राध्यापक, अझीम प्रेमजी विद्यापीठ, बंगळूरु

काल सकाळी नवी मुंबईत फिरायला गेलो होतो. रस्त्यावर विजेच्या खांबांवर ओळीने तरुणांचे फोटो लावले होते.  भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जायला मदत करणाऱ्या एका सल्लागार कंपनीची ही जाहिरात होती. साधारणत: डझनभर विद्यार्थ्यांना त्यांनी अमेरिका, यूके, कॅनडा वगैरे देशात पाठवल्याचे ही जाहिरात सांगत होती. का जातात भारतातून विद्यार्थी परदेशात शिकायला? मी ही प्रक्रिया एक शिक्षक म्हणून ३० वर्षे पाहतो आहे. परदेशातल्या विद्यापीठांत प्रवेशासाठी आवश्यक असलेले संदर्भपत्र मी आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना दिले आहे. किंबहुना, दरवर्षी न टाळता येण्यासारखे ते कर्तव्यच झाले आहे.

भारतीय विद्यार्थी परदेशात शिकायला जायचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे उच्च शिक्षणाच्या दर्जात असलेली तफावत. आजसुद्धा एकही भारतीय विद्यापीठ जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभर विद्यापीठात नाही. २०१० च्या आसपास मुंबई विद्यापीठ पहिल्या पाचशे विद्यापीठांत आले होते, पण आता त्यात बरीच घसरण झाली आहे. अमेरिकेत फालतू विद्यापीठे नाहीत असे नाही. पण आपले विद्यार्थी ज्या विद्यापीठांत शिकायला जातात त्यांचा सरासरी दर्जा काढला तर तो भारतातील अगदी पहिल्या फळीच्या विद्यापीठांच्या दर्जापेक्षा चांगला असतो. अभ्यासक्रम चांगला असतो, बहुतेक प्राध्यापक उत्तम असतात. आपल्याकडे विद्यापीठातून अजूनही जुनाट अभ्यासक्रम, बहुतेक कंत्राटी स्वरूपाचे किंवा तासिका तत्त्वावर शिकविणारे प्राध्यापक आणि बहुतांशी पाठांतरावर भर देणारी परीक्षा पद्धती हेच साधारण वास्तव आहे. याला अपवाद फार थोडे.

परदेशी विद्यापीठात शिकायला जाण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे तिथे मिळणारे आंतरराष्ट्रीय एक्सपोझर. अनेक देशांचे विद्यार्थी तिथे शिकायला येतात. प्राध्यापकही जगभरातून आलेले असतात. विविध सांस्कृतिक प्रवाहांची ओळख होते. एकूण दृष्टिकोन अधिक व्यापक आणि जागतिक स्वरूपाचा होतो. याउलट भारतीय विद्यापीठात साधारण स्थानिक किंवा जास्तीत जास्त इतर राज्यांतील विद्यार्थी भेटतात. त्यामुळे परदेशी विद्यापीठांच्या तुलनेत दृष्टिकोन मर्यादित राहतो.

परदेशी विद्यापीठात जगभरातील विद्यार्थ्यांशी थेट मैत्री करता येते, गप्पा मारता येतात, एकत्र जेवता येते, राहता येते. इंटरनेटमधून फक्त माहिती मिळते, इथे प्रत्यक्ष माणसे भेटतात.

गेल्या काही वर्षात भारतातील वरच्या आर्थिक स्थरातील कुटुंबांची संख्या बरीच वाढलेली आहे. त्यांची मुले अगदी लहानपणापासून आयबी शाळेत असतात. तिथे आपोआपच त्यांना आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे शिक्षण मिळते. घराची आर्थिक परिस्थितीसुद्धा उत्तम  असते.

महागडे शिक्षण हे एक स्टेटस सिम्बॉलसुद्धा झाले आहे. या मुलांना शालेय शिक्षण संपले की आपोआपच प्रसिद्ध परदेशी विद्यापीठातून प्रवेश मिळतो. त्यात मेरिटचा भाग नसतोच असे नाही, पण कुटुंबाची आर्थिक संपन्नता हा मोठा भाग असतो. त्यांच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक संबंधामध्येही प्रसिद्ध परदेशी विद्यापीठात शिकणे हा स्टेटसचा भाग असतो.

सर्वसाधारण   भारतीय विद्यापीठापेक्षा  प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांचा दर्जा चांगला असतो याचा अर्थ असा नाही की भारतीय विद्यापीठातून शिकलेले विद्यार्थी निरुपयोगी असतात. माझ्या परिचयात भारतीय विद्यापीठांत शिकेलेले आणि परदेशी विद्यापीठांत शिकविणारे बरेच शिक्षक आहेत. अर्थात, या यशात त्यांनी स्वतः घेतलेल्या मेहनतीचा वाटा मोठा आहे.