शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

भारतातून विद्यार्थी शिकायला परदेशात का जातात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 10:43 IST

काल सकाळी नवी मुंबईत फिरायला गेलो होतो. रस्त्यावर विजेच्या खांबांवर ओळीने तरुणांचे फोटो लावले होते.  भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जायला मदत करणाऱ्या एका सल्लागार कंपनीची ही जाहिरात होती.

नीरज हातेकर प्राध्यापक, अझीम प्रेमजी विद्यापीठ, बंगळूरु

काल सकाळी नवी मुंबईत फिरायला गेलो होतो. रस्त्यावर विजेच्या खांबांवर ओळीने तरुणांचे फोटो लावले होते.  भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जायला मदत करणाऱ्या एका सल्लागार कंपनीची ही जाहिरात होती. साधारणत: डझनभर विद्यार्थ्यांना त्यांनी अमेरिका, यूके, कॅनडा वगैरे देशात पाठवल्याचे ही जाहिरात सांगत होती. का जातात भारतातून विद्यार्थी परदेशात शिकायला? मी ही प्रक्रिया एक शिक्षक म्हणून ३० वर्षे पाहतो आहे. परदेशातल्या विद्यापीठांत प्रवेशासाठी आवश्यक असलेले संदर्भपत्र मी आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना दिले आहे. किंबहुना, दरवर्षी न टाळता येण्यासारखे ते कर्तव्यच झाले आहे.

भारतीय विद्यार्थी परदेशात शिकायला जायचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे उच्च शिक्षणाच्या दर्जात असलेली तफावत. आजसुद्धा एकही भारतीय विद्यापीठ जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभर विद्यापीठात नाही. २०१० च्या आसपास मुंबई विद्यापीठ पहिल्या पाचशे विद्यापीठांत आले होते, पण आता त्यात बरीच घसरण झाली आहे. अमेरिकेत फालतू विद्यापीठे नाहीत असे नाही. पण आपले विद्यार्थी ज्या विद्यापीठांत शिकायला जातात त्यांचा सरासरी दर्जा काढला तर तो भारतातील अगदी पहिल्या फळीच्या विद्यापीठांच्या दर्जापेक्षा चांगला असतो. अभ्यासक्रम चांगला असतो, बहुतेक प्राध्यापक उत्तम असतात. आपल्याकडे विद्यापीठातून अजूनही जुनाट अभ्यासक्रम, बहुतेक कंत्राटी स्वरूपाचे किंवा तासिका तत्त्वावर शिकविणारे प्राध्यापक आणि बहुतांशी पाठांतरावर भर देणारी परीक्षा पद्धती हेच साधारण वास्तव आहे. याला अपवाद फार थोडे.

परदेशी विद्यापीठात शिकायला जाण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे तिथे मिळणारे आंतरराष्ट्रीय एक्सपोझर. अनेक देशांचे विद्यार्थी तिथे शिकायला येतात. प्राध्यापकही जगभरातून आलेले असतात. विविध सांस्कृतिक प्रवाहांची ओळख होते. एकूण दृष्टिकोन अधिक व्यापक आणि जागतिक स्वरूपाचा होतो. याउलट भारतीय विद्यापीठात साधारण स्थानिक किंवा जास्तीत जास्त इतर राज्यांतील विद्यार्थी भेटतात. त्यामुळे परदेशी विद्यापीठांच्या तुलनेत दृष्टिकोन मर्यादित राहतो.

परदेशी विद्यापीठात जगभरातील विद्यार्थ्यांशी थेट मैत्री करता येते, गप्पा मारता येतात, एकत्र जेवता येते, राहता येते. इंटरनेटमधून फक्त माहिती मिळते, इथे प्रत्यक्ष माणसे भेटतात.

गेल्या काही वर्षात भारतातील वरच्या आर्थिक स्थरातील कुटुंबांची संख्या बरीच वाढलेली आहे. त्यांची मुले अगदी लहानपणापासून आयबी शाळेत असतात. तिथे आपोआपच त्यांना आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे शिक्षण मिळते. घराची आर्थिक परिस्थितीसुद्धा उत्तम  असते.

महागडे शिक्षण हे एक स्टेटस सिम्बॉलसुद्धा झाले आहे. या मुलांना शालेय शिक्षण संपले की आपोआपच प्रसिद्ध परदेशी विद्यापीठातून प्रवेश मिळतो. त्यात मेरिटचा भाग नसतोच असे नाही, पण कुटुंबाची आर्थिक संपन्नता हा मोठा भाग असतो. त्यांच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक संबंधामध्येही प्रसिद्ध परदेशी विद्यापीठात शिकणे हा स्टेटसचा भाग असतो.

सर्वसाधारण   भारतीय विद्यापीठापेक्षा  प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांचा दर्जा चांगला असतो याचा अर्थ असा नाही की भारतीय विद्यापीठातून शिकलेले विद्यार्थी निरुपयोगी असतात. माझ्या परिचयात भारतीय विद्यापीठांत शिकेलेले आणि परदेशी विद्यापीठांत शिकविणारे बरेच शिक्षक आहेत. अर्थात, या यशात त्यांनी स्वतः घेतलेल्या मेहनतीचा वाटा मोठा आहे.