शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

मुस्लीम मुली हिजाबसाठी का आग्रही असतात? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 08:35 IST

मुस्लीम मुलींच्या शिक्षणाची स्थिती फार बिकट आहे. ‘हिजाब’ घालून का होईना, त्या शिक्षणाची संधी मिळवत असतील, तर त्यांना मदत करायला हवी.

हिनाकौसर खान, मुक्त पत्रकार

कर्नाटकातल्या हिजाब प्रकरणावरून देशभर चर्चेला उधाण आलं आहे. कुणी काय घालावं अगर घालू नये हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. सामाजिक संकेतांना जोवर धक्का लागत नाही तोवर तरी कुणाच्याही खाण्यापिण्यावर, पेहरावावर आक्षेप घेण्याचं काहीही कारण नसतं, मात्र असा आक्षेप घेऊ नये हा सामाजिक संकेतच जणू विस्मरणात जात आहे.

सुरुवातीला सुल्ली डिल्स, त्यानंतर सहाच महिन्यात बुल्ली बाईसारख्या ॲपच्या माध्यमातून उच्चशिक्षित, सजग मुस्लीम महिलांना टारगेट करण्यात आलं. ऑनलाईन लिलाव करून मुस्लीम महिलांचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्नही त्यातून करण्यात आला आणि आता अचानक हिजाबचा (स्कार्फ) मुद्दा करून शिक्षण घेत असलेल्या मुस्लीम मुलींना लक्ष्य करण्यात आलं आहे. शाळेत प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना आणि शिक्षकांनाही गेटवरच हिजाब काढावा लागल्याचा अमानुष प्रकारही घडला. शिक्षणसंस्थांमध्ये येताना हिजाब घालू नये यासाठी जेवढा आटापिटा केला जात आहे, त्याच्या चार-दोन टक्के विचारही मुस्लीम मुलींच्या शिक्षणाबाबत कुणी करताना दिसत नाहीये. आपल्या चर्चांचा रोख हिजाब आणि तो घालण्याची वैयक्तिक निवड हा नसून सुकर मार्गानं मुस्लीम मुलींना शिक्षण कधी मिळणार, त्यासाठीची जागृती कशी केली पाहिजे असा असायला हवा, मात्र खऱ्या बदलाच्या आणि विकासाच्या दिशेनं पावलं टाकण्याऐवजी कट्ट्यावरच्या गप्पा चघळण्यात जास्त रस दाखवला जातो.

आजमितीला किती मुस्लीम मुली शिक्षण घेत आहेत? त्यांचा ड्रॉपआउट होण्याचा वेग काय आहे? त्यामागची कारणं काय आहेत? किती जणींसाठी उच्चशिक्षणाची दारं उघडली आहेत? शिक्षित असलेल्या किती मुली नोकऱ्या करत आहेत? त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती काय आहे? याबाबत कुणीही चर्चा करण्यास उत्सुक नाही. आपल्या आजूबाजूच्या किती मुस्लीम मुली शाळांमध्ये जाताना दिसतात, मुलांच्या वर्गात किती मुस्लीम मुली आहेत याकडे सजगपणे लक्ष देण्याची कुणाची इच्छा नसते. कुठल्याही जातीधर्माच्या मुली असो लॉकडाऊनमध्ये कित्येकींची लग्नं झाली, शाळा ऑनलाईन झाल्यानंतर स्मार्टफोनच्या अभावामुळं मुलींचं शिक्षण बंद झालं, याबाबत कुणालाही ब्र काढायचा नाही. 

मुस्लीम समाजात अजूनही मुलींच्या शिक्षणाबाबत पुरेशी जागृती नाही. बरेचसे पालक घराजवळ, सोयीच्या ठिकाणी, अल्पखर्चात शिक्षण मिळत असेल तरच मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतात. एकूण समाजावरच धर्माचा पगडा अधिक असल्यानं शिक्षण घेण्यास घराबाहेर पडणाऱ्या मुलींच्या तहजिबची तजवीज करणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं, म्हणून हिजाबसारखे मार्ग स्वीकारले जातात. बुरखा किंवा हिजाब घालून का होईना, मुलींना शाळा-महाविद्यालयांत जाण्यास घरांतून परवानगी मिळते. बहुतांशवेळा शालेय वर्गात तर मुली हिजाब वा बुरखा काढून ठेवतात. कुटुंबीय, समाज आणि धार्मिकता या सगळ्यांशी झगडा करत मुलींना शिक्षणाची वाट धरावी लागते. घरकाम, घराची जबाबदारी पार पाडत मुली शाळा-महाविद्यालयांसाठी घराबाहेर पडतात.  

हिजाब/बुरखा घालून आल्या म्हणून मुलींना शाळा-महाविद्यालयांत शिक्षण देण्याबाबत काही वेगळी ट्रीटमेंट मिळते का? - तर नाही. त्यांना असाईनमेंटस किंवा उपक्रमांमध्ये सवलत मिळते का? - नाही. उलट बुरखा/हिजाबमुळे त्यांना भेदाभेदच जास्त सहन करावा लागतो. अशा स्थितीतून वाट काढत मुली शिक्षण घेत आहेत. काही जणींसाठी हिजाब हा शिक्षणाचा पासपोर्ट असतो, कारण घरात-नातेवाईकांत वा मोहल्ल्यातल्या लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यापेक्षा आपण शिक्षण घेऊन कथितरीत्या ‘बिघडलो’ नाहीये हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांना पूर्ण करायची असते. प्रश्नांना उत्तरं देण्यात नाहक वेळ घालवण्यापेक्षा सरळ आपल्या साध्यावर लक्ष्य केंद्रित करणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटत असतं, मात्र हे अंतर्गत प्रवाह अनेकांना समजून घ्यायचे नसतात. 

दोन दिवसांपूर्वीच कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाब वापरावरून सुरू असलेल्या याचिकेत याचिकाकर्त्या विद्यार्थिनींनी गणवेशाच्या रंगाचा हिजाब वापरण्याची परवानगी मागितली आहे. गणवेशाच्या रंगाचा का होईना, हिजाब वापरणारच असं म्हणून आरडाओरडा करणारी माणसं असतील, मात्र शिक्षण घेण्यासाठी मिळेल तो मार्ग शोधण्याचा त्यांचा जज्बा नाकारून चालणार नाही. आज हिजाब घालूनही मुली शिक्षण घेऊन आपापली ध्येय गाठत आहेत. ते आपण डोळे उघडून कधी पाहणार! 

आसपासच्या कुठल्याही जाती-धर्मातल्या मुली शिक्षण घेत आहेत का? त्यातल्या अडचणी काय आहेत आणि त्या कशा दूर केल्या पाहिजेत हे आपले प्रश्न असायला हवेत, मात्र घडतं ते उलटच. आज मुस्लीम समाजातल्या मुलींना आत्मसन्मान आणि आत्मविश्वास मिळणं अधिक महत्त्वाचं आहे. त्यापुढं हिजाब घालणं, न घालणं हा मुद्दा फारच गौण आहे. एखादी प्रथा निश्चितच वाईट असू शकते पण ती प्रथा अवलंबवणाऱ्याला ती कशी वाईट आहे हे आधी आपल्याला पटवून द्यावं लागेल, आपलं मत लादून त्याच्यावर जोरजबरदस्ती करता येणार नाही. एकीकडे उच्चशिक्षण घेणाऱ्या मुस्लीम स्त्रियांवर डिजिटल हल्ले करायचे आणि दुसरीकडं हिजाबच्या सोबतीनं ज्ञानार्जनाचा मार्ग स्वीकारणाऱ्यांना भलत्याच प्रश्नांत गुमराह करायचं, ही जळमटलेली विचारसरणी आहे. त्याऐवजी मुस्लीम मुलींच्या शिक्षणाकडे अधिक कळकळीनं आणि जाणिवेनं पाहण्याची गरज आहे.greenheena@gmail.com

टॅग्स :Muslimमुस्लीम