शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त जमाव कायदा का हातात घेतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 07:48 IST

अण्णा वैद्य या गुन्हेगाराला जमावाने नुकतेच ठार केले. वीस वर्षांपूर्वीची अक्कू यादवची घटना तर आजही लोक विसरलेले नाहीत. वारंवार का होते असे?

रवींद्र राऊळ, ज्येष्ठ पत्रकार

सोळा वर्षापूर्वी चार महिलांची हत्या करुन त्यांचे मृतदेह आपल्या शेतात पुरल्याचा आरोप असणाऱ्या अण्णा वैद्य याचा संतप्त गावकऱ्यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यातील सुगाव येथील या घटनेने राज्यभरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे उ‌द्भवलेल्या सामाजिक अस्वस्थतेकडे लक्ष वेधले आहे.

संतप्त नागरिकांच्या जमावाने थेट कायदाच हातात घेत गुन्हेगाराला ठार करण्याची राज्यातील ही पहिली घटना नाही. कधी कुठला मनुष्य चोर असल्याचा संशय जमावाला येतो आणि त्याला अमानुष मारहाण होते. त्यात त्याचा मृत्यू ओढवतो. कुठे मुले पळविणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याच्या समजातून मारहाण होते. आयुष्यभर कायद्याची भीडभाड बाळगणारा सर्वसामान्य नागरिक जेव्हा कायदा बाजूला ठेवत हत्येसारखा गुन्हा करण्यास प्रवृत्त होतो, तेव्हा समाजासमोर अनेक प्रश्न उभे ठाकतात. त्यांची उत्तरे शोथेपर्यंत दुसन्या भागात तशीच आणखी घटना घडते. ही उत्तरे शोधण्याच्या उदासीनतेपोटीच अशा घटनांची पुनरावृत्ती होत असते.

वीस वर्षांपूर्वी नागपुरात दोनशे महिलांनी एकत्र येत न्यायालयाच्या आवारातच भारत कालीचरण ऊर्फ अक्कू यादव या गुंडाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या घटनेची दखल घेतली गेली. अक्कू यादवने दहशतीच्या जोरावर असंख्य महिलांवर केलेल्या अत्याचारांच्या सत्य कहाण्या अंगावर शहारे आणतात. त्या घटनेच्या चौकशी अहवालात त्या सविस्तर नमूद आहेत. अक्कू यादव महिलांवर अत्याचार करत होता, तेव्हा पोलिस निष्क्रिय राहिले होते आणि महिलांनी त्याच्यावर हल्ला केला तेव्हा तर पोलिसांनी ड्यूटी सोडून पळ काढल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे दोन दशके उलटून गेल्यानंतरही राज्यात बहुतेक ठिकाणी अशी स्थिती आणि त्याचे दुष्परिणाम कायम असल्याचे दिसून येते. गुंड रस्त्यात मुडदे पाडेपर्यंत तपास यंत्रणा स्तब्ध राहत असल्यानेही नागरिक कायदा हातात घेतात, हे कायदा आणि सुव्यवस्थेत अराजक माजण्याचे द्योतक आहे. पुणे-नाशिक परिसरात अधूनमधून कोयता गंगची दहशत नागरिकांना भयभीत करून सोडते. दुकाने, वाहनांवर कोयत्याने हल्ले करून या टोळ्या त्याचे व्हिडीओ काढत ते स्वतःच व्हायरल करतात आणि आपली खंडणी वाढवतात. सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरे करण्यामागेही हीच मानसिकता असते. 

एखाद्दुसऱ्या गुंडाची धिंड काढून ही गुंडगिरी थांबत नसते, याचाही अनुभव नागरिक घेत आहेत. अहमदनगरमधील अण्णा वैद्य याला ठोठावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली होती. तेरा वर्षे तुरुंगात राहून बाहेर पडल्यावर अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा त्याच्यावर आरोप आहे. असे अनेक गुन्हेगार तुरुंगवारीनंतर गुन्हेगारीत आणखीच तरबेज झालेले दिसतात. याचाच अर्थ शिक्षापात्र अथवा शिक्षाधीन कैद्यांचे परिवर्तन आणि सुधारणा करण्यात व्यवस्था अपयशीच ठरलेली असते.

 गुन्हेशास्त्राचा आधार घेत कैद्यांमध्ये सुधारणा करण्याचे कोणतेही प्रयत्न तुरुंगात होत नाहीत. आरोपींची मानसिक प्रकृती अथवा विकृती, त्यामुळे उ‌द्भवलेल्या समस्या, आरोपी व समाज यांचे परस्परसंबंध या आणि यासारख्या सर्व बाबींचा विचार गुन्हेशास्त्रात केला जातो. त्याचप्रमाणे आरोपीचे मानसशास्त्र, व्यक्तिमत्त्व व नीतिमत्ता या सर्वांचा अभ्यास केला जातो. गुन्हा का, कसा व कोणत्या परिस्थितीत गुन्हा केला, गुन्हा करण्यामागील हेतू कोणता होता, त्यामुळे एकूण समाजावर कोणते विपरीत परिणाम झाले, इत्यादी प्रश्नांचा ऊहापोह गुन्हेशास्त्रात केला जातो. गुन्हेगारीमुळे सामाजिक जीवनात अस्थिरता व असुरक्षितता येते. जेथे शासनामध्ये शिथिलता आणि भौगळपणा येतो, तेथे गुन्ह्याची दखल वेळीच व कार्यक्षमतेने घेतली जात नाही. गुन्हेगारांना जेथे सुरक्षितता वाटते, तेथे सामान्यांना भय वाटू लागते.

गुन्हा करणाऱ्याच्या हातून समाजावर अन्याय झालेला असतो. अन्यायाचे परिमार्जन शिक्षेमार्फत व्हावे, अशी समाजाची व गुन्हेगाराच्या दुष्कृत्याला नाहक बळी पडलेल्यांची अपेक्षा असते. शिक्षा म्हणजे पापक्षालन, शिक्षा म्हणजे गुन्ह्याच्या दुष्कृत्याचा बदला, शिक्षा म्हणजे निरपराध्यांना दहशत, शिक्षा म्हणजे चुकलेल्याला सुधारणे, शिक्षा म्हणजे गुन्हेगाराला सामाजिक रोगी समजून उपचार करणे, इत्यादी विविध दृष्टिकोनांतून शिक्षापद्धतींचा अवलंब झाला. गुन्हेगाराने शिक्षा भोगल्याने समाजावर काय परिणाम झाला आणि शिक्षेनंतर गुन्हेगाराचे समाजात काय होते, याचीही दखल दंडशास्त्रात घेतली पाहिजे, असा आधुनिक विचार पुढे येत आहे. त्या अनुषंगाने या दोन्ही शास्त्रांच्या अभ्यासाला वर्तमान समाजात महत्त्वाचे स्थान प्राप्त होत आहे. मात्र भारतात आरोपीला तुरुंगात कॉडून सोडून देण्यापलीकडे काही केले जात नाही.

अनेक आरोपींना शिक्षेची खरोखर भीती नसते. शिक्षेमुळे गुन्हेगारास आपण एकाकी पडल्याची भावना होते. तो समाजाचा शत्रू बनतो. यामुळेही तो इतर गुन्हेगारांत सहानुभूती शोधतो अथवा मनोविकृतीला बळी पडतो. गुन्हेगाराचे समाजात पुनर्वसन होणे इष्ट असेल, तर त्याला एकाकी पडल्याची भावना होणे घातक आहे. शिक्षेमुळे गुन्हेगारात झालेले काही बदल धोकादायक असतात. गुन्हेगारावर व्यक्ती म्हणून वैयक्तिक उपचार केले पाहिजेत; त्याचप्रमाणे तो गुन्हेगारी समुदायाचा घटक आहे हे समजूनही उपचार केले पाहिजेत. त्याचा गुन्हेगारांशी संपर्क तुटेल व कायदा व नीतीची कदर करण्यास तो प्रवृत्त होईल, अशी योजना अपेक्षित असते. एकंदरीत आढावा घेता, शिक्षेच्या दहशतीने अथवा सुधारणेच्या उपचाराने गुन्हेगारी कमी होत नाही, असे दिसून आले आहे. त्यासाठी गुन्हेगार ही एकाकी व्यक्ती म्हणून लक्षात न घेता ज्या समूहात तो वावरतो, त्या समूहाचीही सुधारणा व्हायला हवी.