शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारत 'गुलाम' का बनला?

By विजय दर्डा | Updated: August 14, 2023 07:30 IST

स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना या प्रश्नाचा विचार केला तरच भारताची कळ काढण्याची हिंमत पुन्हा कुणी करणार नाही!

डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी एक किस्सा नेहमी सांगत असत. परराष्ट्रमंत्री असताना अटलजी अफगाणिस्तानात गेले होते. तेथील परराष्ट्रमंत्र्यांकडे त्यांनी गझनीला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, "गझनीला कशासाठी जायचे? ते काही पर्यटनस्थळ नाही. बरे म्हणावे असे हॉटेलही तेथे नाही!" अटलजींनी कारण दिले नाही; पण जिथल्या एका लुटारूने, मोहम्मद गझनीने १७ वेळा भारतावर हल्ला केला आणि मोजदाद करता येणार नाही इतकी संपत्ती लुटून नेली, ती गझनीची भूमी त्यांना पाहायची होती.

त्यांच्या त्या गझनी प्रवासाबद्दल बोलताना अटलजी फार गंभीर होत, मोहम्मद गझनीनंतर तैमूरलंग, नादिर शाह आणि त्याच्यानंतरही येथे आलेल्या लुटारूंचा सामना हा देश करू शकला नाही; कारण आपण विखुरलेले होतो. समाज इतका विभागलेला होता की लढाई लढण्याची जबाबदारी केवळ क्षत्रियांची मानली जात असे. अवघा देश हिमतीने उभा राहिला असता, तर सोन्याचा धूर निघणाऱ्या देशात लक्षावधींची कत्तल करून रक्ताचे पाट वाहवण्याची हिंमत हे लुटारू करू शकले असते? त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीला आपल्यावर कब्जा करता आला असता? आपण ब्रिटिशांचे गुलाम झालो असतो?

आज अटलजी आपल्यात नाहीत. स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी १६ ऑगस्टला त्यांची पुण्यतिथी येते. युक्रेनमधल्या घडामोडी पाहताना मला अटलजींची आठवण येते. रशियाच्या तुलनेत युक्रेन अतिशय छोटा देश ! रशियाइतकी मोठी साधनसंपत्ती त्या देशाकडे नाही. रशियाच्या तुलनेत त्याची युद्धाची क्षमताही नगण्या तरीही तो देश खमक्या एकजुटीने रशियाविरुद्ध ठामपणाने उभा आहे. घर सांभाळणाऱ्या स्त्रियासुद्धा हातात शस्त्रे घेऊन लढाईला उतरल्या आहेत.

व्हिएतनाम नावाच्या छोट्याशा देशाने आपली एकजूट दाखवून महाबलाढ्य अमेरिकेला गुडघे टेकायला भाग पाडले होते. अमेरिकेला लढाईचे मैदान सोडून पळून जावे लागले होते. भारताचा ब्रिटिशकालीन इतिहास पाहा आपल्यामध्ये फूट होती म्हणून हा देश गुलामीकडे ढकलला गेला. ईस्ट इंडिया कंपनी हातात शस्त्रे घेऊन हिंदुस्तानमध्ये आली नव्हती. भले कंपनीचे उद्दिष्ट हिंदुस्तानला गुलाम करण्याचे असेल; परंतु, त्यांची सुरुवातीची पावले तर व्यापार करण्याचीच होती. या देशातली छोटी मोठी असंख्य साम्राज्ये, त्यांचे राजे, जाती धर्म भाषा यात विभागला गेलेला, आपापसात न पटणारा समाज हे चित्र पाहून आपण या देशावर राज्य करू शकतो, हे ब्रिटीशांनी हेरले! त्यांनी राजे लोकांमध्ये वैमनस्य वाढवले. राजेमंडळी त्या सापळ्यात अडकली आणि ईस्ट इंडिया कंपनीने हळूहळू आपले सैन्य उभे केले.

१७५७ साली प्लासीच्या लढाईत बंगालचा नबाब सिराज उद्दौला याच्या सेनेला हार खावी लागली. बंगालवर ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य प्रस्थापित झाले. त्यानंतर भारताचा उरलेला भागही गुलाम होत गेला. केवळ गोवा आणि पाँडिचेरीमध्ये पोर्तुगालचे राज्य होते. याचा अर्थ तेही प्रदेश गुलामच होते. असे समजा आपल्या देशातल्या विभिन्न प्रदेशातील राजे ब्रिटिशांविरुद्ध एकजुटीने उभे ठाकले असते तर? ईस्ट इंडिया कंपनी बंगालवर कब्जा मिळवू शकली असती?

प्लासीच्या लढाईनंतर १०० वर्षांनी १८५७ साली झालेली क्रांती असफल झाली; याचेही कारण भारतातील संस्थानांचा आपापसातील वैरभाव ! ही संस्थाने इंग्रजांची मांडलिक झाली होती. भारताचा इतिहास योद्ध्यांच्या वीरश्रीयुक्त कहाण्यांनी भरलेला आहे; परंतु धोकेबाज मंडळींची संख्याही इथे कमी नाही. आपला देश कधीकाळी अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत पसरलेला होता; परंतु आपसातील फाटाफुटीने त्याचे विघटन झाले. 

बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी दक्षिण आफ्रिकेतून परतले तेव्हा त्यांनी स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले. त्यावेळी विखुरलेल्या भारतीय समाजाचे करूण दृश्य त्यांच्यासमोर होते. समाज खूप तुकड्यांत वाटला गेलेला होता. एक मोठा वर्ग अस्पृश्य ठरवून सामाजिक गुलामीच्या साखळदंडातून जखडून ठेवला गेला होता. सर्वात पहिला प्रहार जातीवादावर करताना गांधीजी म्हणाले, "माणूस तर माणूस आहे. मग तो अस्पृश्य कसा असू शकेल?" सामाजिक षड्यंत्रे नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी स्वतः मैल्याची पाटी उचलली. जाती, धर्म आणि भाषा ओलांडून सगळा देश त्यांच्याबरोबर चालू लागला. सामाजिक एकतेमध्ये लपलेली ताकद सामान्य माणसाच्या गळी उतरवणारे गांधीजी हे पहिले राष्ट्रनायक! शस्त्रास्त्रांच्या बळावर ब्रिटिश राज्यकर्त्यांशी लढता येणार नाही हे त्यांना ठाऊक होते. म्हणून त्यांनी शतकानुशतकांच्या मानसिक गुलामीत अडकलेल्या देशाला जागवण्याचे काम सुरू केले. जन्मभर त्यांनी 'रघुपती राघव राजाराम' हे भजन म्हटले आणि रामराज्याची कल्पना केली; पण प्रत्येक धर्माचा सन्मान बाळगला. सर्वावर प्रेम केले, म्हणून ते बॅरिस्टरचे महात्मा गांधी झाले. पूज्य बापू झाले. संपूर्ण जगात सत्य, अहिंसा आणि शांतीचे दूत झाले.

समाजामध्ये कोणत्याही कारणाने फूट पडू लागली तर सगळ्या देशाला त्याची झळ पोहोचते, हे आपण विसरता कामा नये. दुर्दैवाने जाती आणि धर्माचे राजकारण आजही आपल्याकडे चालते, ध्रुवीकरणाची भयंकर षडयंत्र रचली जातात! ते मणिपूर असेल, वा हरयाणा अशा घटना चिंता उत्पन्न करतात. या मातीतला प्रत्येक बाळगोपाळ हिंदुस्तानी आहे... मग हिंसा कशासाठी? वैमनस्य कशासाठी? हा देश राम-रहीम संस्कृतीचा देश आहे. धर्माच्या नावावर फाळणी हा अत्यंत घृणास्पद आणि महागात पडेल, असा खेळ आहे. सगळे विष आणि वैमनस्य बाजूला सारून, स्वातंत्र्याच्या उत्सवात एकजुटीने सहभागी होताना 'हिंदुस्तान जिंदाबाद' हाच आपला नारा असला पाहिजे!

vijaydarda@lokmat.com 

टॅग्स :IndiaभारतIndependence Dayस्वातंत्र्य दिन