शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

भारत 'गुलाम' का बनला?

By विजय दर्डा | Updated: August 14, 2023 07:30 IST

स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना या प्रश्नाचा विचार केला तरच भारताची कळ काढण्याची हिंमत पुन्हा कुणी करणार नाही!

डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी एक किस्सा नेहमी सांगत असत. परराष्ट्रमंत्री असताना अटलजी अफगाणिस्तानात गेले होते. तेथील परराष्ट्रमंत्र्यांकडे त्यांनी गझनीला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, "गझनीला कशासाठी जायचे? ते काही पर्यटनस्थळ नाही. बरे म्हणावे असे हॉटेलही तेथे नाही!" अटलजींनी कारण दिले नाही; पण जिथल्या एका लुटारूने, मोहम्मद गझनीने १७ वेळा भारतावर हल्ला केला आणि मोजदाद करता येणार नाही इतकी संपत्ती लुटून नेली, ती गझनीची भूमी त्यांना पाहायची होती.

त्यांच्या त्या गझनी प्रवासाबद्दल बोलताना अटलजी फार गंभीर होत, मोहम्मद गझनीनंतर तैमूरलंग, नादिर शाह आणि त्याच्यानंतरही येथे आलेल्या लुटारूंचा सामना हा देश करू शकला नाही; कारण आपण विखुरलेले होतो. समाज इतका विभागलेला होता की लढाई लढण्याची जबाबदारी केवळ क्षत्रियांची मानली जात असे. अवघा देश हिमतीने उभा राहिला असता, तर सोन्याचा धूर निघणाऱ्या देशात लक्षावधींची कत्तल करून रक्ताचे पाट वाहवण्याची हिंमत हे लुटारू करू शकले असते? त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीला आपल्यावर कब्जा करता आला असता? आपण ब्रिटिशांचे गुलाम झालो असतो?

आज अटलजी आपल्यात नाहीत. स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी १६ ऑगस्टला त्यांची पुण्यतिथी येते. युक्रेनमधल्या घडामोडी पाहताना मला अटलजींची आठवण येते. रशियाच्या तुलनेत युक्रेन अतिशय छोटा देश ! रशियाइतकी मोठी साधनसंपत्ती त्या देशाकडे नाही. रशियाच्या तुलनेत त्याची युद्धाची क्षमताही नगण्या तरीही तो देश खमक्या एकजुटीने रशियाविरुद्ध ठामपणाने उभा आहे. घर सांभाळणाऱ्या स्त्रियासुद्धा हातात शस्त्रे घेऊन लढाईला उतरल्या आहेत.

व्हिएतनाम नावाच्या छोट्याशा देशाने आपली एकजूट दाखवून महाबलाढ्य अमेरिकेला गुडघे टेकायला भाग पाडले होते. अमेरिकेला लढाईचे मैदान सोडून पळून जावे लागले होते. भारताचा ब्रिटिशकालीन इतिहास पाहा आपल्यामध्ये फूट होती म्हणून हा देश गुलामीकडे ढकलला गेला. ईस्ट इंडिया कंपनी हातात शस्त्रे घेऊन हिंदुस्तानमध्ये आली नव्हती. भले कंपनीचे उद्दिष्ट हिंदुस्तानला गुलाम करण्याचे असेल; परंतु, त्यांची सुरुवातीची पावले तर व्यापार करण्याचीच होती. या देशातली छोटी मोठी असंख्य साम्राज्ये, त्यांचे राजे, जाती धर्म भाषा यात विभागला गेलेला, आपापसात न पटणारा समाज हे चित्र पाहून आपण या देशावर राज्य करू शकतो, हे ब्रिटीशांनी हेरले! त्यांनी राजे लोकांमध्ये वैमनस्य वाढवले. राजेमंडळी त्या सापळ्यात अडकली आणि ईस्ट इंडिया कंपनीने हळूहळू आपले सैन्य उभे केले.

१७५७ साली प्लासीच्या लढाईत बंगालचा नबाब सिराज उद्दौला याच्या सेनेला हार खावी लागली. बंगालवर ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य प्रस्थापित झाले. त्यानंतर भारताचा उरलेला भागही गुलाम होत गेला. केवळ गोवा आणि पाँडिचेरीमध्ये पोर्तुगालचे राज्य होते. याचा अर्थ तेही प्रदेश गुलामच होते. असे समजा आपल्या देशातल्या विभिन्न प्रदेशातील राजे ब्रिटिशांविरुद्ध एकजुटीने उभे ठाकले असते तर? ईस्ट इंडिया कंपनी बंगालवर कब्जा मिळवू शकली असती?

प्लासीच्या लढाईनंतर १०० वर्षांनी १८५७ साली झालेली क्रांती असफल झाली; याचेही कारण भारतातील संस्थानांचा आपापसातील वैरभाव ! ही संस्थाने इंग्रजांची मांडलिक झाली होती. भारताचा इतिहास योद्ध्यांच्या वीरश्रीयुक्त कहाण्यांनी भरलेला आहे; परंतु धोकेबाज मंडळींची संख्याही इथे कमी नाही. आपला देश कधीकाळी अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत पसरलेला होता; परंतु आपसातील फाटाफुटीने त्याचे विघटन झाले. 

बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी दक्षिण आफ्रिकेतून परतले तेव्हा त्यांनी स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले. त्यावेळी विखुरलेल्या भारतीय समाजाचे करूण दृश्य त्यांच्यासमोर होते. समाज खूप तुकड्यांत वाटला गेलेला होता. एक मोठा वर्ग अस्पृश्य ठरवून सामाजिक गुलामीच्या साखळदंडातून जखडून ठेवला गेला होता. सर्वात पहिला प्रहार जातीवादावर करताना गांधीजी म्हणाले, "माणूस तर माणूस आहे. मग तो अस्पृश्य कसा असू शकेल?" सामाजिक षड्यंत्रे नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी स्वतः मैल्याची पाटी उचलली. जाती, धर्म आणि भाषा ओलांडून सगळा देश त्यांच्याबरोबर चालू लागला. सामाजिक एकतेमध्ये लपलेली ताकद सामान्य माणसाच्या गळी उतरवणारे गांधीजी हे पहिले राष्ट्रनायक! शस्त्रास्त्रांच्या बळावर ब्रिटिश राज्यकर्त्यांशी लढता येणार नाही हे त्यांना ठाऊक होते. म्हणून त्यांनी शतकानुशतकांच्या मानसिक गुलामीत अडकलेल्या देशाला जागवण्याचे काम सुरू केले. जन्मभर त्यांनी 'रघुपती राघव राजाराम' हे भजन म्हटले आणि रामराज्याची कल्पना केली; पण प्रत्येक धर्माचा सन्मान बाळगला. सर्वावर प्रेम केले, म्हणून ते बॅरिस्टरचे महात्मा गांधी झाले. पूज्य बापू झाले. संपूर्ण जगात सत्य, अहिंसा आणि शांतीचे दूत झाले.

समाजामध्ये कोणत्याही कारणाने फूट पडू लागली तर सगळ्या देशाला त्याची झळ पोहोचते, हे आपण विसरता कामा नये. दुर्दैवाने जाती आणि धर्माचे राजकारण आजही आपल्याकडे चालते, ध्रुवीकरणाची भयंकर षडयंत्र रचली जातात! ते मणिपूर असेल, वा हरयाणा अशा घटना चिंता उत्पन्न करतात. या मातीतला प्रत्येक बाळगोपाळ हिंदुस्तानी आहे... मग हिंसा कशासाठी? वैमनस्य कशासाठी? हा देश राम-रहीम संस्कृतीचा देश आहे. धर्माच्या नावावर फाळणी हा अत्यंत घृणास्पद आणि महागात पडेल, असा खेळ आहे. सगळे विष आणि वैमनस्य बाजूला सारून, स्वातंत्र्याच्या उत्सवात एकजुटीने सहभागी होताना 'हिंदुस्तान जिंदाबाद' हाच आपला नारा असला पाहिजे!

vijaydarda@lokmat.com 

टॅग्स :IndiaभारतIndependence Dayस्वातंत्र्य दिन