शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

अभियान कशाला?

By admin | Updated: January 25, 2016 02:15 IST

भारतमातेच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला तोडून फेकण्यासाठी ज्या देशभक्तांनी जिवाचे रान केले, प्रसंगी बलिदान पत्करले त्यात ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर

भारतमातेच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला तोडून फेकण्यासाठी ज्या देशभक्तांनी जिवाचे रान केले, प्रसंगी बलिदान पत्करले त्यात ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अग्रभागी होते. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ ही नुसती एकच काव्यपंक्ती उच्चारली तरी त्यातून सावरकरांची मातृभूमीविषयीची ओढ आणि प्रेम किती अगाध होते याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. सावरकर म्हणजे देश आणि मातृभूमीवर जिवापाड प्रेम करणारे देशाचे अस्सल रत्न होते, हे कोण नाकारू शकेल? त्यांचे देशप्रेम, त्यांची देशसेवा, त्यांची देशभक्ती, त्यांची हिंदुत्वावरील निष्ठा आणि त्यांचे ज्वलंत विचार व अनन्यसाधारण कार्य हे कोणत्याही मान-सन्मानापलीकडचे होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न किताब मिळावा यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी नाशिकमध्ये शिवसेनेने एक लाख पत्र पंतप्रधानांना पाठविण्याच्या अभियानाचा शुभारंभ शनिवारी केला. हे अभियान सावरकरांच्या पुढील महिन्यातील पुण्यतिथीपर्यंत राबविण्याचा संकल्पही करण्यात आला. मुळात स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन शब्दातच त्यांचा उचित असा गौरव दडलेला आहे. जे भारताचेच रत्न आहे, हे अवघ्या विश्वाला ठाऊक आहे. त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित केले तरच ते या देशाचे रत्न ठरतील असा याचा अर्थ होत नाही. ‘हे मातृभूमी तुजसाठी मरण ते जनन, तुजविन जनन ते मरण’ इतक्या अस्सल शब्दात आपल्या मातृभूमीबद्दलची भक्ती अभिव्यक्त करणाऱ्या सावरकरांना भारतरत्न किताब देण्यासाठी कोणावर मागणी करण्याची वा अभियान राबविण्याची वेळ यावी, हेच देशाचे दुर्दैव मानायला हवे. खरे तर सावरकरांच्या प्रखर देशभक्तीला ‘भारतरत्न’ने अलंकृत करण्याची संधी शासनाने कधीच घ्यायला हवी होती. त्या किताबाने सावरकर या तेज:पुंज व्यक्तिमत्त्वात तसूभरही फरक पडणार नाही, याउलट त्या किताबाची खऱ्या अर्थाने उंचीच वाढणार आहे.