शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अभियान कशाला?

By admin | Updated: January 25, 2016 02:15 IST

भारतमातेच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला तोडून फेकण्यासाठी ज्या देशभक्तांनी जिवाचे रान केले, प्रसंगी बलिदान पत्करले त्यात ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर

भारतमातेच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला तोडून फेकण्यासाठी ज्या देशभक्तांनी जिवाचे रान केले, प्रसंगी बलिदान पत्करले त्यात ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अग्रभागी होते. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ ही नुसती एकच काव्यपंक्ती उच्चारली तरी त्यातून सावरकरांची मातृभूमीविषयीची ओढ आणि प्रेम किती अगाध होते याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. सावरकर म्हणजे देश आणि मातृभूमीवर जिवापाड प्रेम करणारे देशाचे अस्सल रत्न होते, हे कोण नाकारू शकेल? त्यांचे देशप्रेम, त्यांची देशसेवा, त्यांची देशभक्ती, त्यांची हिंदुत्वावरील निष्ठा आणि त्यांचे ज्वलंत विचार व अनन्यसाधारण कार्य हे कोणत्याही मान-सन्मानापलीकडचे होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न किताब मिळावा यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी नाशिकमध्ये शिवसेनेने एक लाख पत्र पंतप्रधानांना पाठविण्याच्या अभियानाचा शुभारंभ शनिवारी केला. हे अभियान सावरकरांच्या पुढील महिन्यातील पुण्यतिथीपर्यंत राबविण्याचा संकल्पही करण्यात आला. मुळात स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन शब्दातच त्यांचा उचित असा गौरव दडलेला आहे. जे भारताचेच रत्न आहे, हे अवघ्या विश्वाला ठाऊक आहे. त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित केले तरच ते या देशाचे रत्न ठरतील असा याचा अर्थ होत नाही. ‘हे मातृभूमी तुजसाठी मरण ते जनन, तुजविन जनन ते मरण’ इतक्या अस्सल शब्दात आपल्या मातृभूमीबद्दलची भक्ती अभिव्यक्त करणाऱ्या सावरकरांना भारतरत्न किताब देण्यासाठी कोणावर मागणी करण्याची वा अभियान राबविण्याची वेळ यावी, हेच देशाचे दुर्दैव मानायला हवे. खरे तर सावरकरांच्या प्रखर देशभक्तीला ‘भारतरत्न’ने अलंकृत करण्याची संधी शासनाने कधीच घ्यायला हवी होती. त्या किताबाने सावरकर या तेज:पुंज व्यक्तिमत्त्वात तसूभरही फरक पडणार नाही, याउलट त्या किताबाची खऱ्या अर्थाने उंचीच वाढणार आहे.