शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

यूपीएससीत बिहारी टक्का का वाढतो आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 09:05 IST

UPSC : आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ‘बिमारू’ राज्य म्हणून ओळख असलेल्या बिहारमधील ‘टॅलेंट’ सध्या सगळ्यांनाच चकीत करत आहे !

- नंदकिशोर पाटील(संपादक, लोकमत, औरंगाबाद)

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंदाही बिहारी विद्यार्थ्यांनी बाजी मारली. देशात दुसरी आलेली अंकिता अग्रवाल सध्या कोलकात्यात राहात असली, तरी ती मूळची बिहारी आहे. मधेपुरा जिल्ह्यातील बिहारगंज हे तिचे गाव. गतवर्षीचा ‘टॉपर’ शुभम कुमार हाही बिहारचा होता. अखिल भारतीय पातळीवर २२ वा आलेला अमन अग्रवाल तसेच अंशू प्रिया, शुभंकर पाठक, आशिष कुमार हे टॉप - १००मध्ये आलेले चौघेही बिहारी! यावर्षी यूपीएससीची परीक्षा उतीर्ण झालेल्या देशभरातील एकूण ६८५ विद्यार्थ्यांमध्ये पन्नास बिहारचे आहेत. त्यातही भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) दाखल होत असलेल्या १८० अधिकाऱ्यांमध्ये सोळा आणि आयपीएस झालेल्या दोनशे जणांमध्येही अकरा बिहारचेच ! हिंदी सिनेमा, ओटीटीवरील मालिका आणि वर्तमानपत्रातील बातम्यांमधून बिहारकडे बघणाऱ्यांसाठी हे आकडे चकीत करणारे आहेत.

केवळ यूपीएससीच नव्हे, तर आयआयटी, एआयआयएम, एनआयटी, बीट्स यासारख्या नामांकित शिक्षण संस्थांमध्ये बिहारी विद्यार्थ्यांचा टक्का वाढतो आहे. भारतीय प्रशासन सेवा असो की पोलीस प्रशासन, प्रत्येक दहा अधिकाऱ्यांमध्ये एकजण तरी बिहारी असतो. सीबीआय, ईडी, एनआयएसारख्या राष्ट्रीय तपास यंत्रणांमध्येही बिहारी अधिकारी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावताना दिसतात. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ‘बिमारू’ राज्य म्हणून ओळख असलेल्या बिहारमधील हे ‘टॅलेंट’ आहे !

बिहारमधली सुमारे ५२ टक्के जनता निरक्षर आहे. चाळीस टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. वीस जिल्हे अत्यंत मागासलेले, तर तेरा जिल्हे पूरग्रस्त. ताज्या आकडेवारीनुसार, सुमारे ४५ लाख सुशिक्षित बिहारी युवक बेरोजगार. रस्ते, वीज, पाणी, दवाखाने आणि शाळांच्या बाबतीत तर सगळा अंधारच. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्था बोटावर मोजण्याएवढ्या ! औद्योगिक मागासलेपण, सेवा उद्योेगांचा अभाव आणि त्यातून आलेली प्रचंड बेकारी हे आजच्या बिहारचे प्राक्तन आहे. रोजगाराच्या शोधात दरवर्षी सुमारे पाच लाख लोक बिहार सोडून दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरात जातात.

बिहारमध्ये एकही मोठा उद्योग नाही. मुंबई, बंगळुरु, पुण्यात आयटी हब तयार झाल्याने महाराष्ट्र, कर्नाटकातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी आहेत. तामिळनाडू, केरळ, दिल्ली आणि राजस्थानचे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिका, कॅनडा, रशियात जातात. यूपी, बिहारच्या विद्यार्थ्यांपुढे स्पर्धा परीक्षांखेरीज दुसरा पर्याय नाही. या राज्यातील युवकांना तसेही सरकारी नोकरीचे प्रचंड आकर्षण असते. राजकारणातील बाहुबली नेत्यांच्या मागे लागून आपल्या आयुष्याचे मातेरे करण्यात काही अर्थ नाही, हे आता इथल्या सुशिक्षित युवकांना कळून चुकले आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा देऊन ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागतात. पाटण्यात जागोजागी कोचिंग क्लासेस उघडले गेले आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सरकारी अकादमी उघडली आहे.

या अकादमीचा रिझल्ट चांगला असतो. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ते सरळ दिल्ली गाठतात. दरवर्षी सुमारे दोन लाख विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दिल्लीत येतात. कमला मार्केट, मुखर्जी नगर, विश्वविद्यालय मेट्रो परिसरात कधी गेलात तर तिथे तुम्हाला ‘मिनी बिहार’ दिसून येईल. या भागाला ‘यूपीएससीची फॅक्टरी’ही म्हणतात ! ‘बिहारी’ हा शब्द उच्चारताच आपल्यासमोर जे चित्र उभे राहते, त्या कल्पनेला छेद देणारे हे वास्तव आहे. बिहारची नवी पिढी बदलत आहे. प्रतिकूलतेवर मात करून त्यांनी नवी वाट शोधली आहे. बिहारी युवकांची ही ‘सक्सेस स्टोरी’ अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग