शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएससीत बिहारी टक्का का वाढतो आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 09:05 IST

UPSC : आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ‘बिमारू’ राज्य म्हणून ओळख असलेल्या बिहारमधील ‘टॅलेंट’ सध्या सगळ्यांनाच चकीत करत आहे !

- नंदकिशोर पाटील(संपादक, लोकमत, औरंगाबाद)

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंदाही बिहारी विद्यार्थ्यांनी बाजी मारली. देशात दुसरी आलेली अंकिता अग्रवाल सध्या कोलकात्यात राहात असली, तरी ती मूळची बिहारी आहे. मधेपुरा जिल्ह्यातील बिहारगंज हे तिचे गाव. गतवर्षीचा ‘टॉपर’ शुभम कुमार हाही बिहारचा होता. अखिल भारतीय पातळीवर २२ वा आलेला अमन अग्रवाल तसेच अंशू प्रिया, शुभंकर पाठक, आशिष कुमार हे टॉप - १००मध्ये आलेले चौघेही बिहारी! यावर्षी यूपीएससीची परीक्षा उतीर्ण झालेल्या देशभरातील एकूण ६८५ विद्यार्थ्यांमध्ये पन्नास बिहारचे आहेत. त्यातही भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) दाखल होत असलेल्या १८० अधिकाऱ्यांमध्ये सोळा आणि आयपीएस झालेल्या दोनशे जणांमध्येही अकरा बिहारचेच ! हिंदी सिनेमा, ओटीटीवरील मालिका आणि वर्तमानपत्रातील बातम्यांमधून बिहारकडे बघणाऱ्यांसाठी हे आकडे चकीत करणारे आहेत.

केवळ यूपीएससीच नव्हे, तर आयआयटी, एआयआयएम, एनआयटी, बीट्स यासारख्या नामांकित शिक्षण संस्थांमध्ये बिहारी विद्यार्थ्यांचा टक्का वाढतो आहे. भारतीय प्रशासन सेवा असो की पोलीस प्रशासन, प्रत्येक दहा अधिकाऱ्यांमध्ये एकजण तरी बिहारी असतो. सीबीआय, ईडी, एनआयएसारख्या राष्ट्रीय तपास यंत्रणांमध्येही बिहारी अधिकारी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावताना दिसतात. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ‘बिमारू’ राज्य म्हणून ओळख असलेल्या बिहारमधील हे ‘टॅलेंट’ आहे !

बिहारमधली सुमारे ५२ टक्के जनता निरक्षर आहे. चाळीस टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. वीस जिल्हे अत्यंत मागासलेले, तर तेरा जिल्हे पूरग्रस्त. ताज्या आकडेवारीनुसार, सुमारे ४५ लाख सुशिक्षित बिहारी युवक बेरोजगार. रस्ते, वीज, पाणी, दवाखाने आणि शाळांच्या बाबतीत तर सगळा अंधारच. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्था बोटावर मोजण्याएवढ्या ! औद्योगिक मागासलेपण, सेवा उद्योेगांचा अभाव आणि त्यातून आलेली प्रचंड बेकारी हे आजच्या बिहारचे प्राक्तन आहे. रोजगाराच्या शोधात दरवर्षी सुमारे पाच लाख लोक बिहार सोडून दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरात जातात.

बिहारमध्ये एकही मोठा उद्योग नाही. मुंबई, बंगळुरु, पुण्यात आयटी हब तयार झाल्याने महाराष्ट्र, कर्नाटकातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी आहेत. तामिळनाडू, केरळ, दिल्ली आणि राजस्थानचे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिका, कॅनडा, रशियात जातात. यूपी, बिहारच्या विद्यार्थ्यांपुढे स्पर्धा परीक्षांखेरीज दुसरा पर्याय नाही. या राज्यातील युवकांना तसेही सरकारी नोकरीचे प्रचंड आकर्षण असते. राजकारणातील बाहुबली नेत्यांच्या मागे लागून आपल्या आयुष्याचे मातेरे करण्यात काही अर्थ नाही, हे आता इथल्या सुशिक्षित युवकांना कळून चुकले आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा देऊन ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागतात. पाटण्यात जागोजागी कोचिंग क्लासेस उघडले गेले आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सरकारी अकादमी उघडली आहे.

या अकादमीचा रिझल्ट चांगला असतो. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ते सरळ दिल्ली गाठतात. दरवर्षी सुमारे दोन लाख विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दिल्लीत येतात. कमला मार्केट, मुखर्जी नगर, विश्वविद्यालय मेट्रो परिसरात कधी गेलात तर तिथे तुम्हाला ‘मिनी बिहार’ दिसून येईल. या भागाला ‘यूपीएससीची फॅक्टरी’ही म्हणतात ! ‘बिहारी’ हा शब्द उच्चारताच आपल्यासमोर जे चित्र उभे राहते, त्या कल्पनेला छेद देणारे हे वास्तव आहे. बिहारची नवी पिढी बदलत आहे. प्रतिकूलतेवर मात करून त्यांनी नवी वाट शोधली आहे. बिहारी युवकांची ही ‘सक्सेस स्टोरी’ अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग