शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएससीत बिहारी टक्का का वाढतो आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 09:05 IST

UPSC : आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ‘बिमारू’ राज्य म्हणून ओळख असलेल्या बिहारमधील ‘टॅलेंट’ सध्या सगळ्यांनाच चकीत करत आहे !

- नंदकिशोर पाटील(संपादक, लोकमत, औरंगाबाद)

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंदाही बिहारी विद्यार्थ्यांनी बाजी मारली. देशात दुसरी आलेली अंकिता अग्रवाल सध्या कोलकात्यात राहात असली, तरी ती मूळची बिहारी आहे. मधेपुरा जिल्ह्यातील बिहारगंज हे तिचे गाव. गतवर्षीचा ‘टॉपर’ शुभम कुमार हाही बिहारचा होता. अखिल भारतीय पातळीवर २२ वा आलेला अमन अग्रवाल तसेच अंशू प्रिया, शुभंकर पाठक, आशिष कुमार हे टॉप - १००मध्ये आलेले चौघेही बिहारी! यावर्षी यूपीएससीची परीक्षा उतीर्ण झालेल्या देशभरातील एकूण ६८५ विद्यार्थ्यांमध्ये पन्नास बिहारचे आहेत. त्यातही भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) दाखल होत असलेल्या १८० अधिकाऱ्यांमध्ये सोळा आणि आयपीएस झालेल्या दोनशे जणांमध्येही अकरा बिहारचेच ! हिंदी सिनेमा, ओटीटीवरील मालिका आणि वर्तमानपत्रातील बातम्यांमधून बिहारकडे बघणाऱ्यांसाठी हे आकडे चकीत करणारे आहेत.

केवळ यूपीएससीच नव्हे, तर आयआयटी, एआयआयएम, एनआयटी, बीट्स यासारख्या नामांकित शिक्षण संस्थांमध्ये बिहारी विद्यार्थ्यांचा टक्का वाढतो आहे. भारतीय प्रशासन सेवा असो की पोलीस प्रशासन, प्रत्येक दहा अधिकाऱ्यांमध्ये एकजण तरी बिहारी असतो. सीबीआय, ईडी, एनआयएसारख्या राष्ट्रीय तपास यंत्रणांमध्येही बिहारी अधिकारी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावताना दिसतात. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ‘बिमारू’ राज्य म्हणून ओळख असलेल्या बिहारमधील हे ‘टॅलेंट’ आहे !

बिहारमधली सुमारे ५२ टक्के जनता निरक्षर आहे. चाळीस टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. वीस जिल्हे अत्यंत मागासलेले, तर तेरा जिल्हे पूरग्रस्त. ताज्या आकडेवारीनुसार, सुमारे ४५ लाख सुशिक्षित बिहारी युवक बेरोजगार. रस्ते, वीज, पाणी, दवाखाने आणि शाळांच्या बाबतीत तर सगळा अंधारच. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्था बोटावर मोजण्याएवढ्या ! औद्योगिक मागासलेपण, सेवा उद्योेगांचा अभाव आणि त्यातून आलेली प्रचंड बेकारी हे आजच्या बिहारचे प्राक्तन आहे. रोजगाराच्या शोधात दरवर्षी सुमारे पाच लाख लोक बिहार सोडून दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरात जातात.

बिहारमध्ये एकही मोठा उद्योग नाही. मुंबई, बंगळुरु, पुण्यात आयटी हब तयार झाल्याने महाराष्ट्र, कर्नाटकातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी आहेत. तामिळनाडू, केरळ, दिल्ली आणि राजस्थानचे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिका, कॅनडा, रशियात जातात. यूपी, बिहारच्या विद्यार्थ्यांपुढे स्पर्धा परीक्षांखेरीज दुसरा पर्याय नाही. या राज्यातील युवकांना तसेही सरकारी नोकरीचे प्रचंड आकर्षण असते. राजकारणातील बाहुबली नेत्यांच्या मागे लागून आपल्या आयुष्याचे मातेरे करण्यात काही अर्थ नाही, हे आता इथल्या सुशिक्षित युवकांना कळून चुकले आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा देऊन ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागतात. पाटण्यात जागोजागी कोचिंग क्लासेस उघडले गेले आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सरकारी अकादमी उघडली आहे.

या अकादमीचा रिझल्ट चांगला असतो. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ते सरळ दिल्ली गाठतात. दरवर्षी सुमारे दोन लाख विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दिल्लीत येतात. कमला मार्केट, मुखर्जी नगर, विश्वविद्यालय मेट्रो परिसरात कधी गेलात तर तिथे तुम्हाला ‘मिनी बिहार’ दिसून येईल. या भागाला ‘यूपीएससीची फॅक्टरी’ही म्हणतात ! ‘बिहारी’ हा शब्द उच्चारताच आपल्यासमोर जे चित्र उभे राहते, त्या कल्पनेला छेद देणारे हे वास्तव आहे. बिहारची नवी पिढी बदलत आहे. प्रतिकूलतेवर मात करून त्यांनी नवी वाट शोधली आहे. बिहारी युवकांची ही ‘सक्सेस स्टोरी’ अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग