शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

छोटे देश जास्त ‘आनंदी’ का असतात?..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 05:55 IST

युद्धाचे सावट आहे खरे; पण इथे नेदरलँडमध्ये लोक आनंदी दिसतात. आपल्याकडे आपण अस्थायी, अवाजवी कामात आपली ऊर्जा खर्च करतो का?

डॉ. विजय पांढरीपांडे

यापूर्वीही नेदरलँडला तीन-चार वेळा गेलो; पण यावेळची ट्रीप जरा वेगळी. त्यामागे एकीकडे कोरोनाच्या भूतकाळाची पार्श्वभूमी अन् दुसरीकडे रशिया - युक्रेन युद्धाच्या ढगांची सावली! त्यातल्या त्यात एका ताज्या बातमीने मानसिक समाधान मिळाले. ते म्हणजे आपण एका दुःखी देशातून सर्वाधिक आनंदी देशात आलोय! 

संयुक्त राष्ट्रांनी नुकतीच जागतिक सुख-मापनाची क्रमवारी प्रसिद्ध केली. त्यात युरोपीय छोटे देश अव्वल क्रमांकावर आहेत. अवघी पंचावन्न लाख लोकसंख्या असलेला फिनलंड देश पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अनुक्रमे डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झर्लंड अन् पाचव्या क्रमांकावर नेदरलँड! १४६ देशांच्या यादीत भारत १३६ व्या क्रमांकावर आहे. मोठे देश दिवसेंदिवस आनंदाला पारखे होत चालले आहेत, असे या यादीवरून दिसते. आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक स्वातंत्र्याचे निकष लावून, भ्रष्टाचाराची पातळी, भावनांचे विश्लेषण, स्वास्थ्य सुविधा, शिक्षणाचा दर्जा अन् या सर्वांचा नागरिकांवर होणारा परिणाम यावर हे आनंदाचे मोजमाप ठरते. एकमेकांप्रति सहिष्णुतेची भावना, सौहार्दाची भावना, सरकारी, राजकीय पातळीवरचा स्वच्छ कारभार असे बरेच निकष असतात ही आनंदी देशांची यादी करण्यामागे. आपण स्वतःला विकासाचे अग्रदूत, महासत्ता वगैरे होण्याची स्वप्ने पाहणारा देश समजत असलो, तरी माणसाचे समाधान, आंतरिक आनंद यामागची मानसशास्त्रीय कारणे वेगळी असतात. सामान्य माणसाकडे माणुसकीच्या भावनेतून बघितले जाते की, नागरिकाच्या भावनांचा अनादर करून त्यांना क्षुल्लक समजले जाते, हेही सर्वंकष आनंदाचे मोजमाप ठरवितानाचे महत्त्वाचे परिमाण असते.गेल्या दोन-अडीच वर्षांत कोरोनाच्या सावटातून, लॉकडाऊनच्या कटू, बंदिस्त अनुभवातून मोकळा श्वास घ्यायची संधी मिळताच अनेकांनी वेगवेगळे बेत आखले. आमच्या पुढे नेदरलँडमधील फिलिप्स सिटी म्हणून प्रसिद्ध असलेला इंधोवन हाच प्राथमिक पर्याय होता. मुला-सुनेचे नवे स्वतःचे घर बघायचे, नातीना भेटायचे, ही आमच्यासाठी प्राथमिक गरज होती. सुदैवाने व्हिसा, हवाई प्रवासाचे बुकिंग यात फारशा अडचणी आल्या नाहीत आणि आम्ही या देशात पोहोचलो!

चाळीस डिग्रीच्या उन्हातून पाच- सात डिग्रीच्या थंड वातावरणातले स्थलांतर वयोमानानुसार जाणवतेच. सात-आठ वर्षांनंतर या देशात आल्यावरही फारसा फरक जाणवला नाही. तीच शिस्त, तीच स्वच्छता, तेच निरोगी वातावरण... रशियाने सुरू केलेल्या युद्धाचे परिणाम तेवढे जाणवले. गेल्या वीस दिवसातच पेट्रोलचे भाव कधी नव्हे ते दीडपट वाढले आहेत. (१८० रु. लीटर. आपल्याकडे पेट्रोलने शंभरी पार केली तर ती ब्रेकिंग न्यूज होते. मोर्चे  निघतात.) गेल्या दोन-तीन दिवसात कुकिंग ऑईल गायब झाले आहे मार्केटमधून... पण मोर्चे, आंदोलने दिसत नाहीत. मागे लॉकडाऊनला कंटाळलेले लोक मात्र रस्त्यावर आले होते म्हणे! एव्हढे सारे असूनही लोक आनंदी आहेत. गोंधळ नाही की राजकीय उलथापालथ नाही. आपल्याकडे बहुतेक ऊर्जा, शक्ती ही आपण अस्थायी, अवाजवी कार्यात खर्च करतो का? आपण स्वतःची बुद्धी न वापरता, कुणाच्या नादी लागून कसल्या तरी प्रवाहात वाहवत जातो का? आपणच आपल्या दुःखाचा इंडेक्स वाढवतो का? पैसा, संस्कृतीचे पाठबळ असूनही आपण आनंदी का नाही, याचा विचार केला पाहिजे.

(लेखक माजी कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहेत)vijaympande@yahoo.com

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ