शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

वाचनीय लेख - बचत खात्यातील रकमेवर व्याज देताना बँकांची कंजुषी का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 06:10 IST

बचतीवर व्याज जेमतेम २-३ टक्के आणि कर्ज देताना मात्र १० ते १५ टक्के; बँका फक्त स्वत:चे खिसे भरत असताना ठेवीदारांच्या हिताचे काय?

ॲड. कांतीलाल तातेड

रिझर्व्ह बँकेने मे २०२२ पासून रेपो दरात २.५० टक्क्यांची वाढ केली. त्याला अनुषंगून बँकांनी मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मुदत ठेवींवरील व्याजदरात सरासरी २.२२ टक्के वाढ केली. परंतु बँकांनी बचत खात्यांच्या व्याजदरात मात्र कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे बँकाच्या निधीसंकलनाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला व व्याजाच्या उत्पन्नात वाढ झाली, असे रिझर्व्ह बँकेच्या ताज्या ‘नाणेविषयक धोरण अहवाला’त नमूद केलेले आहे. बचत खात्यामध्ये जमा असलेली रक्कम ही बँकातील एकूण ठेवींच्या ३२.६० टक्के म्हणजेच म्हणजेच ५६ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. तरीही बचत खात्यावरील व्याजदरात वाढ न करता ते मोठ्या प्रमाणात कमी करणे योग्य आहे का?

जास्तीत जास्त लोकांनी बचत करावी, त्याचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठी व्हावा यासाठी बचत खात्यावर आकर्षक व्याजदर देऊन कोट्यवधी गरीब व मध्यमवर्गीय लोकांना त्यात सहभागी करावे, हा बचत खाते सुरू करण्यामागे सरकारचा हेतू होता. २० ऑगस्ट १९९३ पूर्वी बचत खात्यावर सहा टक्के दराने व्याज दिले जात होते. सध्या ते दर २.७० ते ३ टक्के आहेत.

बचत खात्यावरील व्याजदर नियंत्रणमुक्त करावे, असा उद्योगपतींचा सरकारवर व सरकारचा रिझर्व्ह बँकेवर दबाव होता. परंतु  गरीब व गरजू खातेदारांच्या हिताचा विचार करता तसे करणे योग्य होणार नाही, असे रिझर्व्ह बँकेचे मत होते.  १९९७ मध्ये रिझर्व्ह बँकेने बचत खात्याव्यतिरिक्त इतर सर्व व्याजदर मुक्त केले. कालांतराने रिझर्व्ह बँकेने भूमिका बदलली आणि २५ ऑक्टोबर, २०११ रोजी बचत खात्यावरील व्याजदर नियंत्रणमुक्त केल्याचा निर्णय जाहीर केला. बचत खात्यावर किती टक्के दराने व्याज द्यावयाचे हे निश्चित करण्याचे स्वातंत्र्य बँकांना मिळाले. व्याजदर नियंत्रणमुक्त केल्यामुळे स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल, खातेदारांना जास्त व्याजदर व दर्जेदार सेवा मिळेल, असे समर्थनही रिझर्व्ह बँकेने केले. परंतु प्रत्यक्षात मात्र व्याजदरात मनमानी पद्धतीने मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आलेली आहे. उदा. स्टेट बँकेने कोविड परिस्थितीचा फायदा घेऊन ३१ मे २०२० पासून बचत खात्यावरील व्याजदर २.७० टक्के केले. प्राप्तिकराचा विचार करता २० टक्क्यांच्या टप्प्यातील (स्लॅब) प्राप्तिकरादात्याला तो व्याजदर २.१४ टक्के तर ३० टक्क्याच्या टप्प्यातील प्राप्तिकरदात्याला तो केवळ १.८६ टक्केच मिळतो. आयसीआयसीआय तसेच एचडीएफसी बँकेने जून २०२० पासून ५० लाखांपेक्षा कमी शिल्लक असणाऱ्या बचत खात्यांवरील व्याजदर ३ टक्के केले. याच बँका कर्ज देताना मात्र  ९.१५ ते १५.६५ टक्के दराने व्याज आकारतात. व्याजदर कपातीमुळे बँकांच्या नफ्यात मोठी वाढ झालेली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात सरकारी मालकीच्या बँकांना एक लाख कोटी तर स्टेट बँकेला ४० हजार कोटी रुपयांचा नफा होण्याची शक्यता आहे. बचत खात्यात शिल्लक ठेवावयाच्या किमान शिल्लक रकमेमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून किमान शिल्लक रकमेपेक्षा कमी शिल्लक झाल्यास बहुतांश बँका दंड वसूल करतात. काही बँका तर किमान ६०० रुपये प्रतिमाह इतका दंड लावतात. ही वसुली अन्यायकारक असून ती रद्द करणे आवश्यक आहे. २०१६-१७ ते २०१८-१९ या आर्थिक वर्षात दंडापोटी वसूल झालेली रक्कम १० हजार कोटी रुपये होती. 

वास्तविक बचत खात्यावरील किमान शिल्लक रक्कम ही सदरचे बचत खाते जोपर्यंत चालू ठेवले जाते, तोपर्यंत खात्यात शिल्लक ठेवणे खातेधारकावर बंधनकारक असते. त्यामुळे ही किमान शिल्लक बँकांकडे दीर्घकाळासाठी राहणार असते. म्हणून बँकांनी त्यावर मुदत ठेवींचे व्याज देणे आवश्यक आहे. एकुणातच बँकांनी आर्थिक निकषांच्या आधारावर बचत खात्यावरील व्याजदरात पुरेशी वाढ करण्याची तसेच किमान शिल्लक रकमेवर दीर्घ मुदतीच्या ठेवींचे व्याजदर लागू करण्याची आवश्यकता आहे.    

(लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत)

kantilaltated@gmail.com

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रHomeसुंदर गृहनियोजनbankबँक