शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

वाचनीय लेख - बचत खात्यातील रकमेवर व्याज देताना बँकांची कंजुषी का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 06:10 IST

बचतीवर व्याज जेमतेम २-३ टक्के आणि कर्ज देताना मात्र १० ते १५ टक्के; बँका फक्त स्वत:चे खिसे भरत असताना ठेवीदारांच्या हिताचे काय?

ॲड. कांतीलाल तातेड

रिझर्व्ह बँकेने मे २०२२ पासून रेपो दरात २.५० टक्क्यांची वाढ केली. त्याला अनुषंगून बँकांनी मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मुदत ठेवींवरील व्याजदरात सरासरी २.२२ टक्के वाढ केली. परंतु बँकांनी बचत खात्यांच्या व्याजदरात मात्र कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे बँकाच्या निधीसंकलनाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला व व्याजाच्या उत्पन्नात वाढ झाली, असे रिझर्व्ह बँकेच्या ताज्या ‘नाणेविषयक धोरण अहवाला’त नमूद केलेले आहे. बचत खात्यामध्ये जमा असलेली रक्कम ही बँकातील एकूण ठेवींच्या ३२.६० टक्के म्हणजेच म्हणजेच ५६ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. तरीही बचत खात्यावरील व्याजदरात वाढ न करता ते मोठ्या प्रमाणात कमी करणे योग्य आहे का?

जास्तीत जास्त लोकांनी बचत करावी, त्याचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठी व्हावा यासाठी बचत खात्यावर आकर्षक व्याजदर देऊन कोट्यवधी गरीब व मध्यमवर्गीय लोकांना त्यात सहभागी करावे, हा बचत खाते सुरू करण्यामागे सरकारचा हेतू होता. २० ऑगस्ट १९९३ पूर्वी बचत खात्यावर सहा टक्के दराने व्याज दिले जात होते. सध्या ते दर २.७० ते ३ टक्के आहेत.

बचत खात्यावरील व्याजदर नियंत्रणमुक्त करावे, असा उद्योगपतींचा सरकारवर व सरकारचा रिझर्व्ह बँकेवर दबाव होता. परंतु  गरीब व गरजू खातेदारांच्या हिताचा विचार करता तसे करणे योग्य होणार नाही, असे रिझर्व्ह बँकेचे मत होते.  १९९७ मध्ये रिझर्व्ह बँकेने बचत खात्याव्यतिरिक्त इतर सर्व व्याजदर मुक्त केले. कालांतराने रिझर्व्ह बँकेने भूमिका बदलली आणि २५ ऑक्टोबर, २०११ रोजी बचत खात्यावरील व्याजदर नियंत्रणमुक्त केल्याचा निर्णय जाहीर केला. बचत खात्यावर किती टक्के दराने व्याज द्यावयाचे हे निश्चित करण्याचे स्वातंत्र्य बँकांना मिळाले. व्याजदर नियंत्रणमुक्त केल्यामुळे स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल, खातेदारांना जास्त व्याजदर व दर्जेदार सेवा मिळेल, असे समर्थनही रिझर्व्ह बँकेने केले. परंतु प्रत्यक्षात मात्र व्याजदरात मनमानी पद्धतीने मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आलेली आहे. उदा. स्टेट बँकेने कोविड परिस्थितीचा फायदा घेऊन ३१ मे २०२० पासून बचत खात्यावरील व्याजदर २.७० टक्के केले. प्राप्तिकराचा विचार करता २० टक्क्यांच्या टप्प्यातील (स्लॅब) प्राप्तिकरादात्याला तो व्याजदर २.१४ टक्के तर ३० टक्क्याच्या टप्प्यातील प्राप्तिकरदात्याला तो केवळ १.८६ टक्केच मिळतो. आयसीआयसीआय तसेच एचडीएफसी बँकेने जून २०२० पासून ५० लाखांपेक्षा कमी शिल्लक असणाऱ्या बचत खात्यांवरील व्याजदर ३ टक्के केले. याच बँका कर्ज देताना मात्र  ९.१५ ते १५.६५ टक्के दराने व्याज आकारतात. व्याजदर कपातीमुळे बँकांच्या नफ्यात मोठी वाढ झालेली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात सरकारी मालकीच्या बँकांना एक लाख कोटी तर स्टेट बँकेला ४० हजार कोटी रुपयांचा नफा होण्याची शक्यता आहे. बचत खात्यात शिल्लक ठेवावयाच्या किमान शिल्लक रकमेमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून किमान शिल्लक रकमेपेक्षा कमी शिल्लक झाल्यास बहुतांश बँका दंड वसूल करतात. काही बँका तर किमान ६०० रुपये प्रतिमाह इतका दंड लावतात. ही वसुली अन्यायकारक असून ती रद्द करणे आवश्यक आहे. २०१६-१७ ते २०१८-१९ या आर्थिक वर्षात दंडापोटी वसूल झालेली रक्कम १० हजार कोटी रुपये होती. 

वास्तविक बचत खात्यावरील किमान शिल्लक रक्कम ही सदरचे बचत खाते जोपर्यंत चालू ठेवले जाते, तोपर्यंत खात्यात शिल्लक ठेवणे खातेधारकावर बंधनकारक असते. त्यामुळे ही किमान शिल्लक बँकांकडे दीर्घकाळासाठी राहणार असते. म्हणून बँकांनी त्यावर मुदत ठेवींचे व्याज देणे आवश्यक आहे. एकुणातच बँकांनी आर्थिक निकषांच्या आधारावर बचत खात्यावरील व्याजदरात पुरेशी वाढ करण्याची तसेच किमान शिल्लक रकमेवर दीर्घ मुदतीच्या ठेवींचे व्याजदर लागू करण्याची आवश्यकता आहे.    

(लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत)

kantilaltated@gmail.com

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रHomeसुंदर गृहनियोजनbankबँक