शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

गोव्यात ‘झिंगलेल्या’ दिवस-रात्रींच्या चाव्या कुणाच्या हातात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 02:12 IST

गोवा पोलीस म्हणतात, पाच-दहा ग्रॅम हशिश असेल जवळ, तर चालेल हो! राज्याला अमली पदार्थांची राजधानी बनवू या, असा काही निर्णयच झाला आहे की काय?

राजू नायक

दरवर्षी गोव्यात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ‘सनबर्न’ या इलेक्ट्रॉनिक नृत्य व संगीत महोत्सवाचे (ईडीएम) आयोजन होत  असे. लाखो देशी-विदेशी तरुण-तरुणींचे थवे यायचे. तीन-चार दिवसांच्या आयोजनादरम्यान एखाद-दुसऱ्या तरुण वा तरुणीचा अमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे मृत्यू व्हायचा. सरकार - पोलिसांवर संगनमताचे आरोप व्हायचे. संबंधितांचे मृत्यू आणि आयोजनाचा काहीच संबंध नसल्याचे प्रशस्तिपत्र सरकारही त्वरेने द्यायचे. कायदा, नैतिकता यांच्या नाकावर टिच्चून चार दिवस हणजूण- वागातोर भागात हा धिंगाणा चालायचा. आयोजनावर वरदहस्त धरणाऱ्या प्रशासनातील आणि सरकारातील सर्वांचे खिसे अर्थातच भारी नोटांनी भरून जायचे. लाखो रुपयांची वरकमाई व्हायची. यंदा मात्र कोविडने या सगळ्यालाच मोडता घातला. पण, याचा अर्थ यंदा ‘सनबर्न’ झाला नाही, असा मात्र नव्हे. सनबर्न ह्या ब्रँडची उचलेगिरी करून एका बीच क्लबने कोणत्याही परवानगीविना चार दिवस आणि चार रात्री नृत्यमहोत्सवाचे दणक्यात आयोजन केले. त्यातही दखल घेण्याजोगी बाब म्हणजे संबंधित क्लबवर नियमभंगाचा आरोप ठेवून त्याला किनारपट्टी नियमन विभागाकडून टाळे ठोकण्यात आले असतानाही हे आयोजन करण्यात आले. त्यासाठी आयोजकांनी नामी शक्कल लढवली. क्लबमध्ये काही नाशवंत जिन्नस ठेवले असून वेळेतच त्यांची विल्हेवाट न लावल्यास ते खराब होतील अशी सबब पुढे करीत टाळे अल्पमुदतीसाठी उघडण्याची विनंती संबंधित अधिकारिणीस करण्यात आली. ती अर्थातच तत्परतेने मान्य झाली. टाळे खोलल्यानंतर तेथे नेमके काय चालले आहे, याची खातरजमा करण्याची गरजही (अर्थातच) संबंधित यंत्रणेला भासली नाही. परिणामी, चार दिवस आणि चार रात्री हजारोंच्या उपस्थितीत कोणत्याही सुरक्षाविषयक काळजीविना नृत्य महोत्सव पार पडला. या बेकायदा आयोजनाबद्दल काहींनी पोलिसांत तक्रारी केल्या, पण त्यांची दखल घेतली गेली नाही. प्रश्न बेकायदा आयोजनापुरताच मर्यादित नाही, तर गोवा सरकारची मानसिकता अमली पदार्थांच्या व्यापाराला राजमान्यता देण्याकडे जाऊ लागली आहे, ही खरी समस्या आहे. 

वर्ष २०२० सरत असताना गांजा लागवडीला मान्यता देण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आला आणि कायदा खात्याने त्याला हिरवा कंदीलही दाखवला.  हलकल्लोळ माजल्यावर संस्कृतीरक्षणाचे ओझे अवजड झालेल्या राज्य सरकारला ‘तसे काहीच नाही हो…’ म्हणत प्रस्ताव (तात्पुरता) बासनात ठेवावा लागला. याच दरम्यान गोवा पोलिसांकडून करण्यात आलेल्या एका वक्तव्याचे गांभीर्य मात्र अनेकांना कळलेले नाही. गोव्यात अमली पदार्थ सोबत बाळगल्याची प्रकरणे अनेक असली तरी बहुतेक जण वैयक्तिक वापरासाठी हे पदार्थ बाळगतात, अशा आशयाचे हे विधान. फुटकळ प्रमाणात वैयक्तिक वापरासाठी अमली पदार्थ बाळगल्यास दुर्लक्ष करण्याचे सरकारी धोरण आहे. आता, एखादी व्यक्ती तिच्या खिशात असलेला अमली पदार्थ वैयक्तिक वापरासाठी नेतेय की विक्रीसाठी हे कसे बरे ठरवायचे? तर सापडलेल्या अमली पदार्थाच्या प्रमाणावरून. म्हणजे पाच-दहा ग्रॅम हशिश कुणाकडे सापडला तर तो वैयक्तिक वापरासाठी असे ठरवायचे आणि त्या व्यक्तीला जाऊ द्यायचे! या तरतुदीचा लाभ गुन्हेगार मंडळी मोकळी! जवळपास कुठे तरी (बव्हंशी दुचाकीत) माल ठेवून द्यायचा आणि पाच ग्रॅमची पुडी खिशात ठेवून गिऱ्हाईक शोधायचे. पायपीट होईलही, पण विक्रीदेखील कायद्याच्या चौकटीत फिट्ट बसेल! कसे सुचते हे सगळे एरवी बथ्थड असलेल्या प्रशासकीय यंत्रणेला? प्रकरण फाईलबंद करण्याचे मार्ग सुचवणारी भन्नाट डोकी राज्यात आहेत. बेकायदा आणि कायदेशीर व्यवहारांच्या दरम्यानची सूक्ष्म रेषा वाकवण्याची क्षमता असलेल्या प्रशासन आणि सरकारातील महाभागांसमोर हीच डोकी उलगडतात. कायद्याला वाकुल्या दाखवत सगळे काही नियमात कसे बसवता येते हे सांगतात. गोवा आज आडवाटेला राजमार्ग बनवण्याच्या प्रयत्नात आहे तो असा! अमली पदार्थांची राजधानी होण्यास आता कितीसा काळ लागणार?

(लेखक लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या