शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

मध्य पूर्वेतील भडक्याने संपूर्ण जग होरपळेल

By विजय दर्डा | Updated: January 6, 2020 06:42 IST

अमेरिकेच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी सुमारे ५०० अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तीचा काटा काढला आहे.

- विजय दर्डाअमेरिकेच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी सुमारे ५०० अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तीचा काटा काढला आहे. इराणच्या दृष्टीने ज्याच्या नावाने शत्रू थरथर कापत असे असा एक बहाद्दर जनरल त्यांनी गमावला आहे... आणि जगाच्या दृष्टीने पाहिले तर ज्यात बरेच काही जळून खाक होऊ शकते अशी आग लावणारी ही घटना आहे. इराण ही घटना सहजपणे पचवू शकणार नाही, हे नक्कीच. म्हणूनच इराणने अमेरिकेचा सूड उगविण्याची धमकी दिली आहे!इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्स या सैन्यदलांमध्ये प्रतिष्ठित ‘कुद््स फोर्स’ या प्रतिष्ठित विशेष विभागाचे प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनाई यांच्या थेट आदेशावरून काम करायचे आणि इराणमध्ये ते खमेनाई यांच्यानंतरचे सर्वात शक्तिशाली मानले जायचे. म्हणून सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर इराणने त्यांना ‘अमर शहिदा’चा दर्जा देऊन तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. त्याचबरोबर अमेरिकेने सुलेमानी यांच्या हत्येची किंमत मोजायला तयार राहावे, असा इशाराही इराणने दिला. जगात इराणचे प्रभुत्व वाढविण्यात सुलेमानी यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती. सीरिया, येमेन व इराकमध्ये त्यांचा मोठा दबदबा होता. ‘इस्लामिक स्टेट’ला नामोहरम करण्यासाठी सुलेमानी यांनी इराक आणि सीरियामध्ये कुर्द सशस्त्र दले व शिया बंडखोरांची एकजूट केली आणि त्यांना प्रशिक्षणही दिले.

देशभर उठाव होऊनही सीरियाच्या बशर अल असद सरकारला पाय घट्ट रोवून खुर्चीवर कायम राहण्यातही त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. हिजबुल्लाह व हमास यासारख्या शिया बंडखोरांच्या सशस्त्र संघटनांनाही त्यांनीच बळकटी दिली होती. अमेरिकेसारख्या महासत्तेपुढे इराण पूर्ण ताकदीनिशी ताठपणे उभे राहू शकले तेही बव्हंशी सुलेमानी यांच्यामुळेच. अमेरिकेचे नुकसान करण्याच्या प्रत्येक रणनीतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. म्हणूनच सुलेमानी अमेरिकेचे कट्टर शत्रू बनले व त्यांचा काटा काढण्याचे प्रयत्न अमेरिका निरंतर करत राहिली. सुलेमानी यांच्या नेतृत्वाखालील ‘कुद््स फोर्स’ला अमेरिकेने २५ आॅक्टोबर २००७ रोजीच दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. त्यानंतर अमेरिकेने इराणवर कठोर निर्बंध लागू केले. मात्र हे निर्बंध निष्प्रभ करण्यातही सुलेमानी यांनी हरतºहेचे उपाय केले, असे मानले जाते. यामुळे अमेरिकेची तळपायाची आग मस्तकात गेली होती. दुसरीकडे काहीही करून सुलेमानी यांचा बंदोबस्त करण्यासाठी इस्रायल व सौदी अरबस्तानकडून अमेरिकेवर वाढता दबाव येत होता. सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा राष्ट्रध्वज टिष्ट्वट केला यावरूनच सुलेमानींचे या जगात न राहणे अमेरिकेसाठी किती बहुमोल होते याची कल्पना यावी.आता पुढे काय होईल, हा मोठा प्रश्न आहे. काहीही करून इराण सुलेमानी यांच्या हत्येचा सूड उगवणार हे नक्की. त्यासाठी इराणकडून अमेरिका, सौदी अरबस्तान व इस्रायलच्या आस्थापनांवर हल्ले होणार हेही स्पष्ट आहे. अजूनही इराकमध्ये अमेरिकेचे पाच हजारांचे सैन्य तैनात आहे. प्रतिहल्ल्याची पूर्ण कल्पना असल्याने आपल्या सैनिकी तळांची सुरक्षा आधीच मजबूत केली आहे. इराणकडून काही आक्रमक आगळीक होताना दिसली तर अमेरिका आणखी सैन्य आणू शकेल. शिवाय संभाव्य धोके टाळण्यासाठी अमेरिका हवाई हल्लेही करू शकेल. तसे झाले तर इराण उघडपणे युद्धात उतरेल, कारण त्यात रशिया पाठीशी उभी राहील, याची इराणला खात्री आहे. सुलेमानी यांच्या मृत्यूला ‘हत्या’ म्हणून रशियाने तिची निंदा केली आहे. चीनही इराणच्या बाजूने असल्याचे दिसत असले तरी चीन कदाचित रशियाप्रमाणे या रणांगणात उघडपणे उतरणार नाही.
खरोखर युद्ध किवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा खनिज तेलाच्या किमतींवर थेट परिणाम होईल हे निश्चित. तसे संकेत मिळालेही आहेत. सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती चार टक्क्यांनी वाढल्या आहेत. आपल्या अखत्यारीतील सागरी मार्गांनी जाणाऱ्या तेलवाहू जहाजांवर इराणने हल्ले केले तर तेलाच्या बाजारपेठेत आगडोंब उसळणे स्वाभाविक आहे. तसे झाले तर संपूर्ण जगाला त्याची झळ लागेल. खासकरून भारतावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. आधीच नाजूक परिस्थिती असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर तेलाच्या चढ्या किमतींचा नवा बोजा पडला तर विकासदराला आणखी घसरण लागेल. आपल्या परिसरातील देशांची अवस्थाही याहून वेगळी नसेल. जगातील अनेक देश या भडक्याने होरपळून निघतील. म्हणून मध्य पूर्वेच्या या देशांमध्ये शांतता नांदणे गरजेचे आहे. पण तसे होण्याची लक्षणे दिसत नाहीत. मध्य पूर्व आशिया हा जगाचा असा शापित भाग आहे की जेथे तेलाच्या रूपाने अमाप संपत्ती आहे, पण नशिबी रक्तपात लिहिलेला आहे. त्या देशांच्या नशिबी शांतता नाही. तेथे शांतता कशी प्रस्थापित करता येईल यावर जगातील सर्वच देशांनी एकत्र बसून विचार करायला हवा.(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)