शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
3
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
4
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
5
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
6
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
7
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
8
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
9
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
10
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
11
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
12
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
13
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
14
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
15
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
16
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
17
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
18
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
19
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
20
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?

संपूर्ण जग हा एकच जीव आहे

By admin | Updated: August 2, 2015 04:25 IST

संपूर्ण जग हा एकच जीव आहे ही संकल्पना अनेक संस्कृतींमध्ये आहे. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’. मायक्रोकॉजम हे मॅक्रोकॉजमचेच प्रतिबिंब आहे. आपल्या शरीरात जशा स्वत:चे अस्तित्व असलेल्या करोडो पेशी

- श्री श्री रविशंकरसंपूर्ण जग हा एकच जीव आहे ही संकल्पना अनेक संस्कृतींमध्ये आहे. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’. मायक्रोकॉजम हे मॅक्रोकॉजमचेच प्रतिबिंब आहे. आपल्या शरीरात जशा स्वत:चे अस्तित्व असलेल्या करोडो पेशी आहेत आणि त्या सर्व मिळून आपले अस्तित्व तयार होते तसेच करोडो माणसे आणि इतर प्राणीमात्र मिळून हे जग बनते. आपले अस्तित्व हे बाकीच्या जगापासून अलग नाहिये. ही संकल्पना आध्यात्मिक वाटत असली तरी आपल्याला नेहमी दिसणाऱ्या सामाजिक आणि वैश्विक परिस्थितीशी ती अगदी मिळतीजुळती अशी आहे. शेजारच्या घराला आग लागलेली असेल आणि आपण काहीच न करता बसून राहिलो तर थोड्याच वेळात ती आग आपल्या घरापर्यंत पोहोचेल.आज जगातील अनेक भागांत ज्वलंत समस्या आहेत. सिरीया आणि इजिप्तसारख्या अनेक देशांतील सरकार आणि अधिकारी यांना आज संघर्षग्रस्त भागात बळाचा वापर करावा लागत आहे. कधीकधी अगदी टोकाच्या परिस्थितीत गरजेचा असला तरी असा दृष्टिकोन म्हणजे एक प्रतिक्षिप्त क्रिया असते आणि कालांतराने प्रश्न आणखीनच गुंतागुंतीचा होतो. रोग पसरल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी घेऊन रोगाचा प्रबंध करणे जास्त चांगले. जसे आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी स्वयंप्रेरित असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे जगात शांतता आणि सलोखा टिकण्यासाठी स्वयंप्रेरित होणे गरजेचे आहे.मुलांना जर विविध संस्कृतींची चांगली अशी ओळख करून दिली तर धर्मांधता दूर होईल. मुलांमध्ये सेवावृत्ती जोपासणे हा भ्रष्टाचाराला प्रबंध करण्याचा चांगला मार्ग ठरू शकेल. त्यामुळे जगात शांतता आणण्यासाठी, मानवी मूल्ये असलेले, विविधतेचा सन्मान करणारे असे योग्य शिक्षण गरजेचे आहे. जगातील अगदी थोडेच भीती पसरवण्यास कारणीभूत असतात, सगळे लोक नाही. या जगातील सात अब्ज लोकांपैकी काही हजार लोक गुन्हे करतात आणि संपूर्ण जगावर त्याचा परिणाम होतो. याच नियमानुसार उलटेही काम होऊ शकत नाही का? आपण काही हजार लोक, जे खरोखरच शांत, प्रेमळ आणि संपूर्ण जगाची काळजी घेणारे आहोत, आपण परिवर्तन घडवू शकत नाही का? ‘मी काय करू शकतो’ किंवा ‘एकाने काय होणार’ असा विचार करू नका. जगात खळबळ माजलेली असताना प्रत्येकाची काहीतरी जबाबदारी असते. एका होमिओपॅथिक गोळीत ८० किलोचे शरीर बरे करण्याची शक्ती असते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा परिणाम या अंतरीक्षावर, या विश्वावर होत असतो. आपल्यातून जेव्हा शांती आणि चांगल्या लहरी उत्सर्जित होतात तेव्हा त्याचा नक्कीच परिणाम होतो. आपल्यापैकी ज्या भाग्यवंतांना आपल्यात काहीशी शांती अनुभवाला आली आहे त्यांनी आता, अशांत असलेल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचे तसेच जगातील ज्या देशात आणि जगातील ज्या भागात संघर्ष चालू आहे अशा भागात पोहोचण्याचे आव्हान स्वीकारायचे आहे.आपण सर्व एक असल्याचे ज्ञान आपण जगात पसरवले तर लोक संकुचित वृत्तीतून बाहेर येतील. जीवनाबद्दलचा एक व्यापक दृष्टिकोन ठेवला तर मानवी मूल्ये चेतवली जातील; आणि त्यामुळे विविधतेत एकता आणि एकतेत विविधता दिसून येईल.