शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण जग हा एकच जीव आहे

By admin | Updated: August 2, 2015 04:25 IST

संपूर्ण जग हा एकच जीव आहे ही संकल्पना अनेक संस्कृतींमध्ये आहे. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’. मायक्रोकॉजम हे मॅक्रोकॉजमचेच प्रतिबिंब आहे. आपल्या शरीरात जशा स्वत:चे अस्तित्व असलेल्या करोडो पेशी

- श्री श्री रविशंकरसंपूर्ण जग हा एकच जीव आहे ही संकल्पना अनेक संस्कृतींमध्ये आहे. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’. मायक्रोकॉजम हे मॅक्रोकॉजमचेच प्रतिबिंब आहे. आपल्या शरीरात जशा स्वत:चे अस्तित्व असलेल्या करोडो पेशी आहेत आणि त्या सर्व मिळून आपले अस्तित्व तयार होते तसेच करोडो माणसे आणि इतर प्राणीमात्र मिळून हे जग बनते. आपले अस्तित्व हे बाकीच्या जगापासून अलग नाहिये. ही संकल्पना आध्यात्मिक वाटत असली तरी आपल्याला नेहमी दिसणाऱ्या सामाजिक आणि वैश्विक परिस्थितीशी ती अगदी मिळतीजुळती अशी आहे. शेजारच्या घराला आग लागलेली असेल आणि आपण काहीच न करता बसून राहिलो तर थोड्याच वेळात ती आग आपल्या घरापर्यंत पोहोचेल.आज जगातील अनेक भागांत ज्वलंत समस्या आहेत. सिरीया आणि इजिप्तसारख्या अनेक देशांतील सरकार आणि अधिकारी यांना आज संघर्षग्रस्त भागात बळाचा वापर करावा लागत आहे. कधीकधी अगदी टोकाच्या परिस्थितीत गरजेचा असला तरी असा दृष्टिकोन म्हणजे एक प्रतिक्षिप्त क्रिया असते आणि कालांतराने प्रश्न आणखीनच गुंतागुंतीचा होतो. रोग पसरल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी घेऊन रोगाचा प्रबंध करणे जास्त चांगले. जसे आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी स्वयंप्रेरित असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे जगात शांतता आणि सलोखा टिकण्यासाठी स्वयंप्रेरित होणे गरजेचे आहे.मुलांना जर विविध संस्कृतींची चांगली अशी ओळख करून दिली तर धर्मांधता दूर होईल. मुलांमध्ये सेवावृत्ती जोपासणे हा भ्रष्टाचाराला प्रबंध करण्याचा चांगला मार्ग ठरू शकेल. त्यामुळे जगात शांतता आणण्यासाठी, मानवी मूल्ये असलेले, विविधतेचा सन्मान करणारे असे योग्य शिक्षण गरजेचे आहे. जगातील अगदी थोडेच भीती पसरवण्यास कारणीभूत असतात, सगळे लोक नाही. या जगातील सात अब्ज लोकांपैकी काही हजार लोक गुन्हे करतात आणि संपूर्ण जगावर त्याचा परिणाम होतो. याच नियमानुसार उलटेही काम होऊ शकत नाही का? आपण काही हजार लोक, जे खरोखरच शांत, प्रेमळ आणि संपूर्ण जगाची काळजी घेणारे आहोत, आपण परिवर्तन घडवू शकत नाही का? ‘मी काय करू शकतो’ किंवा ‘एकाने काय होणार’ असा विचार करू नका. जगात खळबळ माजलेली असताना प्रत्येकाची काहीतरी जबाबदारी असते. एका होमिओपॅथिक गोळीत ८० किलोचे शरीर बरे करण्याची शक्ती असते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा परिणाम या अंतरीक्षावर, या विश्वावर होत असतो. आपल्यातून जेव्हा शांती आणि चांगल्या लहरी उत्सर्जित होतात तेव्हा त्याचा नक्कीच परिणाम होतो. आपल्यापैकी ज्या भाग्यवंतांना आपल्यात काहीशी शांती अनुभवाला आली आहे त्यांनी आता, अशांत असलेल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचे तसेच जगातील ज्या देशात आणि जगातील ज्या भागात संघर्ष चालू आहे अशा भागात पोहोचण्याचे आव्हान स्वीकारायचे आहे.आपण सर्व एक असल्याचे ज्ञान आपण जगात पसरवले तर लोक संकुचित वृत्तीतून बाहेर येतील. जीवनाबद्दलचा एक व्यापक दृष्टिकोन ठेवला तर मानवी मूल्ये चेतवली जातील; आणि त्यामुळे विविधतेत एकता आणि एकतेत विविधता दिसून येईल.