शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

संपूर्ण जग हा एकच जीव आहे

By admin | Updated: August 2, 2015 04:25 IST

संपूर्ण जग हा एकच जीव आहे ही संकल्पना अनेक संस्कृतींमध्ये आहे. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’. मायक्रोकॉजम हे मॅक्रोकॉजमचेच प्रतिबिंब आहे. आपल्या शरीरात जशा स्वत:चे अस्तित्व असलेल्या करोडो पेशी

- श्री श्री रविशंकरसंपूर्ण जग हा एकच जीव आहे ही संकल्पना अनेक संस्कृतींमध्ये आहे. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’. मायक्रोकॉजम हे मॅक्रोकॉजमचेच प्रतिबिंब आहे. आपल्या शरीरात जशा स्वत:चे अस्तित्व असलेल्या करोडो पेशी आहेत आणि त्या सर्व मिळून आपले अस्तित्व तयार होते तसेच करोडो माणसे आणि इतर प्राणीमात्र मिळून हे जग बनते. आपले अस्तित्व हे बाकीच्या जगापासून अलग नाहिये. ही संकल्पना आध्यात्मिक वाटत असली तरी आपल्याला नेहमी दिसणाऱ्या सामाजिक आणि वैश्विक परिस्थितीशी ती अगदी मिळतीजुळती अशी आहे. शेजारच्या घराला आग लागलेली असेल आणि आपण काहीच न करता बसून राहिलो तर थोड्याच वेळात ती आग आपल्या घरापर्यंत पोहोचेल.आज जगातील अनेक भागांत ज्वलंत समस्या आहेत. सिरीया आणि इजिप्तसारख्या अनेक देशांतील सरकार आणि अधिकारी यांना आज संघर्षग्रस्त भागात बळाचा वापर करावा लागत आहे. कधीकधी अगदी टोकाच्या परिस्थितीत गरजेचा असला तरी असा दृष्टिकोन म्हणजे एक प्रतिक्षिप्त क्रिया असते आणि कालांतराने प्रश्न आणखीनच गुंतागुंतीचा होतो. रोग पसरल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी घेऊन रोगाचा प्रबंध करणे जास्त चांगले. जसे आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी स्वयंप्रेरित असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे जगात शांतता आणि सलोखा टिकण्यासाठी स्वयंप्रेरित होणे गरजेचे आहे.मुलांना जर विविध संस्कृतींची चांगली अशी ओळख करून दिली तर धर्मांधता दूर होईल. मुलांमध्ये सेवावृत्ती जोपासणे हा भ्रष्टाचाराला प्रबंध करण्याचा चांगला मार्ग ठरू शकेल. त्यामुळे जगात शांतता आणण्यासाठी, मानवी मूल्ये असलेले, विविधतेचा सन्मान करणारे असे योग्य शिक्षण गरजेचे आहे. जगातील अगदी थोडेच भीती पसरवण्यास कारणीभूत असतात, सगळे लोक नाही. या जगातील सात अब्ज लोकांपैकी काही हजार लोक गुन्हे करतात आणि संपूर्ण जगावर त्याचा परिणाम होतो. याच नियमानुसार उलटेही काम होऊ शकत नाही का? आपण काही हजार लोक, जे खरोखरच शांत, प्रेमळ आणि संपूर्ण जगाची काळजी घेणारे आहोत, आपण परिवर्तन घडवू शकत नाही का? ‘मी काय करू शकतो’ किंवा ‘एकाने काय होणार’ असा विचार करू नका. जगात खळबळ माजलेली असताना प्रत्येकाची काहीतरी जबाबदारी असते. एका होमिओपॅथिक गोळीत ८० किलोचे शरीर बरे करण्याची शक्ती असते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा परिणाम या अंतरीक्षावर, या विश्वावर होत असतो. आपल्यातून जेव्हा शांती आणि चांगल्या लहरी उत्सर्जित होतात तेव्हा त्याचा नक्कीच परिणाम होतो. आपल्यापैकी ज्या भाग्यवंतांना आपल्यात काहीशी शांती अनुभवाला आली आहे त्यांनी आता, अशांत असलेल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचे तसेच जगातील ज्या देशात आणि जगातील ज्या भागात संघर्ष चालू आहे अशा भागात पोहोचण्याचे आव्हान स्वीकारायचे आहे.आपण सर्व एक असल्याचे ज्ञान आपण जगात पसरवले तर लोक संकुचित वृत्तीतून बाहेर येतील. जीवनाबद्दलचा एक व्यापक दृष्टिकोन ठेवला तर मानवी मूल्ये चेतवली जातील; आणि त्यामुळे विविधतेत एकता आणि एकतेत विविधता दिसून येईल.