शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना नापास करणाऱ्या शिक्षण पद्धतीची परीक्षा कोण घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 08:32 IST

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणं हा त्यांचा हक्क आहे. 'अपात्र' विद्यार्थ्यांना नापास करताना त्याचे काय दूरगामी परिणाम होतील हे तपासणंही महत्त्वाचं आहे

शिक्षण हक्क कायद्याने २००९ मध्ये मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले आणि कलम २१ अ अंतर्गत मूलभूत अधिकार म्हणून त्याची अंमलबजावणी केली. प्रत्येक बालकाला दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळण्याचा त्याचा हक्क आहे याची खात्री करण्यासाठी शिक्षणाचा हक्क हा एक महत्त्वाचा घटक आहे. शालेय प्राथमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेश, उपस्थिती आणि अभ्यासक्रम पूर्ण करणे याची जबाबदारी शासनाकडे सोपवणारा, हा जगातला अशा प्रकारचा पहिलाच अधिनियम आहे. मात्र, काहीच कारण नसताना पाचवी व आठवीत 'अपात्र' विद्यार्थ्यांना नापास करण्याचा निर्णय आश्चर्यजनक आहे. राज्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात होती. मात्र, विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले जात नव्हते. पहिली ते आठवीच्या सहामाही व वार्षिक परीक्षा घेऊन, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देऊन प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश दिला जात होता. त्यामुळे सरसकट आठवीपर्यंत विद्यार्थी उत्तीर्ण होत असत. कमी अधिक गुणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ढकलपास केल्याची चर्चा व्हायची. मात्र, सरकारने नवीन दुरुस्ती करून पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्याचा निर्णय घेतला.

आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता उत्तीर्ण होणं आवश्यक केलं आहे. विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे, पण पुन्हा अनुत्तीर्ण झाल्यास परत त्याच वर्गात बसावे लागणार आहे. खरे तर हा निर्णय म्हणजे विद्यार्थी या संकल्पनेला वेगळं करणारा आहे. विद्यार्थ्यांना नवी काळजी लागणार आहे. कारण, अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने बालकांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांवर एक प्रकारचे दडपण राहील. आपला पाल्य अनुत्तीर्ण झाला तर काय, ही भीती पालकांच्याही मनात राहील. या वयातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक भीती आपण नापास झालो तर काय, या प्रश्नाची वाटत असते.

ग्रामीण भागातील किंवा पुरेशा सोयीसुविधा नसलेल्या, ज्यांच्या घरात फारसे कोणी शिकलेले नाही, ज्यांना घरातून मार्गदर्शन मिळू शकत नाही अशा मुलांना किंवा काठावर पास होणाऱ्या मुलांना नापास होण्याचा धसका खूप मोठा असतो, एक वर्ष नापास, म्हणजे पुढील शिक्षण बंद होण्याचा आणि कमी वयातच कामधंद्याला लागण्याचा धोकाही खूप मोठा असतो. यापूर्वीही हे आपण अनुभवलेले आहे. एकेक इयत्ता वर गेल्यावर, वयाप्रमाणे थोडी समज जातात. दहावीची परीक्षा जसजशी जवळ येते तसतसे विद्यार्थी व पालक अधिक सजग होतात, हा नेहमीचाच अनुभव आहे. त्यामुळे अचानक आलेला नवीन नियम विद्यार्थ्यांना लगेच पचनी पडेल का, त्यामुळे शिक्षणबाह्य मुलांचा प्रश्न वाढेल का, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. तसे जर झाले, तर आणखी मोठाच प्रश्न आ वासून आपल्यापुढे उभा राहील.

प्राथमिक शिक्षण पूर्ण करेपर्यंत कोणत्याही बालकाला त्याच वर्गात ठेवणे, शाळेतून काढून टाकणे अथवा मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची सक्ती करणे, यास मनाई असूनही असा नवीन नियम म्हणजे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन आहे. प्रत्येक बालकाला दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळविण्याच्या हक्काला हरताळ आहे. कारण, या नवीन दुरुस्तीमुळे मुलांचे गळतीचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळण्याच्या वयातच त्यांच्यावर दडपण येईल. तसेच दोन वेळा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे काय? कोरोनाकाळात शिक्षणाची ऐशीतैशी झाली. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत घसरण झाली. अनेक विद्यार्थ्यांना काहीच येत नाही. त्यांना कोण शिकवणार आहे? प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काही ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. दिवसेंदिवस खासगी शाळा वाढताहेत. खासगी शाळा वाढण्याचे कारण काय, या प्रश्नाचा धांडोळा घेतला तर अनेक गोष्टी समोर येतात. शिक्षणाचा दर्जा सुधारला तर विद्यार्थ्यांचीही गुणवत्ता वाढेल; परंतु शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करणं कितपत पटणार आहे? विद्यार्थ्यांना नापास करणाऱ्या शिक्षण पद्धतीची परीक्षा कोण घेणार, हा प्रश्नही त्यामुळे उपस्थित होतो..

दहावीत आपल्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागावा यासाठी काही शाळा 'काठावरील विद्यार्थ्यांना नववीतच नापास करून टाकतात. अशा शाळा आता पाचवीतच विद्यार्थ्यांना घरचा रस्ता दाखवण्याची भीतीही मोठी आहे. या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे. - पद्माकर उखळीकर, परभणी

टॅग्स :Studentविद्यार्थी