शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

याचा अंमल कोण करील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:37 IST

१८ वर्षांहून कमी वयाच्या पत्नीशी शरीरसंबंध हा बलात्कारच, हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मुलींना न्याय देणारा असला तरी तो केवळ तांत्रिक व शाब्दिक आहे. प्रत्यक्षात तो संबंधित मुलींपर्यंत वा त्यांच्या पालकांपर्यंत पोहचण्याची व त्या अपराधाचे निराकरण होण्याची शक्यता अजिबात नाही.

१८ वर्षांहून कमी वयाच्या पत्नीशी शरीरसंबंध हा बलात्कारच, हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मुलींना न्याय देणारा असला तरी तो केवळ तांत्रिक व शाब्दिक आहे. प्रत्यक्षात तो संबंधित मुलींपर्यंत वा त्यांच्या पालकांपर्यंत पोहचण्याची व त्या अपराधाचे निराकरण होण्याची शक्यता अजिबात नाही. कोणताही अपराध जोवर कायद्याच्या कक्षेत येत नाही आणि पोलिसांत नोंदविला जात नाही तोवर त्याविरुद्ध कोणती कारवाई करता येत नाही. मुलींचा छळ, त्यांची होणारी फसवणूक आणि त्यांना घरात आणि बाहेरही दिला जाणारा त्रास, बदनामीच्या भीतीने जोवर चार भिंतींच्या आतच दडविण्याचा प्रयत्न सभ्यता व संस्कृतपणाच्या फसव्या कारणांखातर केला जातो तेथे पतीपत्नीमधला शरीरसंबंध व त्यातली बळजोरी पोलिसांपर्यंत जाणे दूर, ती घराबाहेरही बोलली वा सांगितली जात नाही. खरेतर १८ चे वय ओलांडलेल्याच नव्हे तर चांगल्या वयात आलेल्या व प्रौढ झालेल्या स्त्रीवरही तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध लादला जाणे (मग तो तिच्या नवºयाकडूनच का असेना) हे सभ्यता व संस्कृतीला मान्य नाही. कायद्यालाही ते अमान्य आहे. पण असा बलात्कार नाईलाजाने सहन करणाºया किती स्त्रिया त्याची तक्रार घेऊन पोलिसात जातात? त्यांचा संकोच व समाजाकडून दिले जाणारे दूषण त्यांना या अन्यायासह गप्पच बसविते की नाही? या स्थितीत १८ वर्षाखालील मुलींनी हे धाडस दाखवावे आणि पोलिसांनी तिच्या बाजूने कायदा उभा करावा ही गोष्टच दुरापास्त ठरते. घर, कुटुंब आणि त्याची एकात्मता ही बाब त्यातल्या काहींवर अन्याय करणारी असली तरी ती संस्कृती व परंपरेचा भाग मानली जाते. त्यामुळे घरात नव्याने आलेली सून तिच्यावर लादला गेलेला शरीरसंबंध उघड्यावर येऊन पोलिसात सांगेल ही बाबच अशक्य कोटीतील ठरावी अशी आहे. मुळात बालविवाह हाच अपराध आहे. तरीही तो राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार व तेलंगण यासह आदिवासींच्या अनेक समूहांत लाखोंच्या संख्येने होतो. त्याविषयी कधी खटले दाखल होत नाहीत आणि त्यांची अपराध म्हणून नोंदही होत नाही. अशा लग्नांना मंत्री व पुढारीही हजर राहून त्यांना उत्तेजन देताना दिसले आहेत. मुलांमुलींचे जन्म होण्याआधीच त्यांची अशी नाती पक्की करून ठेवणारी व त्याचा आग्रह धरणारी कुटुंबे देशात आहेत. शिवाय त्यांचे परंपराप्रिय म्हणून कौतुक करणारे बावळट लोकही आपल्यात आहेत. संमतीवयाचा कायदा टिळकांच्या हयातीत झाला. त्याला १०० वर्षे झाली. पण त्याविषयीचे लोकशिक्षण आणि त्यामागे कायद्याचा बडगा उभा करण्याचे काम एवढ्या काळात सरकारांनी केले नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आताच्या निर्णयाची अंमलबजावणी करायची तर त्यासाठी पोलिसांव्यतिरिक्त स्त्रियांच्या अन्य संघटना स्थापन केल्या जाणे व त्यांना कायद्याचा दर्जा देणे गरजेचे आहे. या संघटनेत पीडित मुलींना व तिच्या नातेवाईकांना जाता येणे व आपली कुचंबणा सांगता येणे शक्य होणार आहे. पोलिसांत त्यासाठी लागणारी क्षमता नाही. महिला पोलिसांचे ताफेही त्यात कुचकामी ठरले आहेत. शिवाय आपल्या समाजात धर्मांधता आणि जात्यंधता आहे. आपल्या जातीच्या अशा गोष्टी अन्यत्र जाऊ न देण्याची त्यात धडपड आहे. त्यामुळे या पीडित मुलींना त्यांची गाºहाणी सांगायला योग्य त्या जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. महिला डॉक्टर्स, त्यांच्या दवाखान्यातील महिला सल्लागार आणि समाजसेवी संघटनांमधील स्त्रियांच्या आघाड्यांनी यात पुढाकार घेतला तरच हा निर्णय अंमलात येईल. अन्यथा निकाल दिल्याचे न्यायालयाला समाधान आणि तो झाल्याचा समाजाला आनंद एवढीच त्याची उपलब्धी असेल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयsexual harassmentलैंगिक छळGovernmentसरकार