शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

दंगल कुणाला हवी होती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 04:10 IST

भीष्म सहानींच्या ‘तमस’ या प्रसिद्ध कादंबरीत एक वाक्य आहे. ‘हर दंगे की वजह होती है’ विभाजनाच्या पार्श्वभूमीवर असलेली ही कादंबरी दंगलीची आणि ती आठवण्याचे कारण औरंगाबाद येथे अचानक उसळलेली दंगल.

भीष्म सहानींच्या ‘तमस’ या प्रसिद्ध कादंबरीत एक वाक्य आहे. ‘हर दंगे की वजह होती है’ विभाजनाच्या पार्श्वभूमीवर असलेली ही कादंबरी दंगलीची आणि ती आठवण्याचे कारण औरंगाबाद येथे अचानक उसळलेली दंगल. रात्री उशिरा अचानक दंगल उसळते, दोन जणांचा बळी जातो. जाळपोळीत स्थावर मालमत्तांचे प्रचंड नुकसान होते आणि हे सर्व घडते शहराच्या मध्यवर्ती भागात. विशेष म्हणजे चार-पाच गल्ल्या सोडल्या, तर दंगलीचे पडसाद शहरात कुठेही उमटले नाहीत. दंगल औरंगाबादसाठी नवीन नाही. किंबहुना दंगलीच्या इतिहासामुळेच हे शहर संवेदनशील आहे. शहराला दंगलीचा मोठा इतिहास आहे. तसा मोसमही ठरलेला. जसा पावसाळ्यात पाऊस पडतो, तशा निवडणुकांच्या वर्षभर अगोदर येथे तणावाच्या छुटपूट घटना घडत असतात. वातावरण तापत मतांचे ध्रुवीकरण होते आणि पुढे सारे आलबेल असते, अशी पार्श्वभूमी असताना या दंगलीचे कवित्व तपासताना एक गोष्ट प्रामुख्याने पुढे आली ती अशी की, पोलिसांचा नाकर्तेपणा. त्यांना दंगल हाताळता आली नाही हे खुद्द अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपीन बिहारी यांनीच कबूल केले. शुक्रवारी रात्री १२ ते ३ या काळात जाळपोळ, दगडफेक चालू होती. तरुणांची टोळकी मुक्तपणे फिरत असताना पोलिसांनी अटकाव केला नाही. दंगलीचे स्वरूप पाहता ती पूर्वनियोजित होती, असेच दिसते. म्हणजे शहरातील वातावरण बिघडत आहे, याकडे गुप्तचर यंत्रणेचे लक्ष नसावे किंवा त्याकडे डोळेझाक केली असावी. कारण आठवडाभर अगोदर घडलेल्या घटनाही पोलिसांनी गांभीर्याने घेतल्या नव्हत्या. संवेदनशील शहर असतानाही गेल्या दोन महिन्यांपासून येथील पोलीस आयुक्तपद रिक्त आहे. शिवसेना यासाठी भाजपला जबाबदार ठरवते; पण हे दोन्ही सत्ताधारी पक्ष आहेत आणि सेनेनेसुद्धा पोलीस आयुक्त तातडीने द्या, अशी मागणी केली नव्हती. भाडेकरूंची घरे, दुकाने या दंगलीत लक्ष्य झालेली दिसतात. याचाच अर्थ भूखंडाचेही अर्थकारण असल्याचे दिसते. हे काही असले तरी सरकारने या शहराचा गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. पावणेतीन महिन्यांपासून कचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे; परंतु दोन महिन्यांपासून महापालिकेला आयुक्त नाही. पोलीस आयुक्त नाही. जिल्हाधिकारी नवे आहेत. विशेष म्हणजे दंगलीनंतर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप नाट्य सुरू झाले. त्यापैकी एकानेही वरील पदांवर अधिकारी नेमण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, की कचरा, पाण्याचा प्रश्न सोडविण्याची तसदी घेतली नाही. शहराचे वातावरण दूषित झाले. हे कोरेगाव-भीमा किंवा कचºयाच्या प्रश्नावर. मिटमिटा येथे झालेल्या उद्रेकावरूनच लक्षात आले होते. तरीही या घटनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच छोट्या घटना नजरेआड केल्या. वास्तविक अशा घटना भविष्यात काय घडणार याचे संकेत मिळत असतात. या घडामोडी किंवा त्या दिवशी रात्री जाळपोळ चालू असताना घेतलेली बघ्याची भूमिकासुद्धा तेवढीच जबाबदार आहे. याला नागरी प्रश्नही कारणीभूत आहेत. कचºयाचा गंभीर प्रश्न अजून सुटला नाही. तोच पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. हे दोन प्रश्न सोडविण्याऐवजी शहरातील हातगाड्यांचा प्रश्न पुढे करण्यात आला. आपल्यासमोर दोन गंभीर प्रश्न आहेत, ते सुटत नाहीत, असे असताना हातगाड्यांचा प्रश्न उकरून काढणे यामागे निश्चित कारण दिसते. कारण यावरून तणाव निर्माण होणे निश्चित होते. या घटनांची साखळी जोडण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच यामागचा हेतू स्पष्ट होईल. दंगलीच्या मागे कोणतेही राजकारण असो; पण त्यामुळे या शहराची प्रतिमा मलीन झाली आहे आणि त्याचा परिणाम विकासावर होईल. व्यापार उद्योगांना फटका बसणार हे निश्चित आहे. दंगल पूर्वनियोजित होती, असे आरोप दोन्ही गट करतात; परंतु दंगलीचे कारण काय होते हे नेमके कुणी सांगत नाही. तेच शोधण्याचे आव्हान आहे. ही दंगल तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांना नकोच होती, मग ती कुणाला हवी होती?

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस