शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
6
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
7
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
8
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
9
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
10
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
11
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
12
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
13
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
14
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
15
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
16
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
17
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
18
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
19
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
20
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...

एकट्या बाईने लग्न(च) केले पाहिजे, असे कुणी म्हटले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 06:44 IST

कोरोना महामारीत जोडीदार गमावलेल्या विधवा स्त्रियांना रोजगार मिळावा, हेच आमचे मुख्य काम आहे, सहजीवनाचा मुद्दा अनुषंगिक; पण महत्त्वाचा आहे!

- हेरंब कुलकर्णी, निमंत्रक कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती, महाराष्ट्र

‘एकट्या बाईला लग्न(च) सुरक्षितता देते का?’ हा नीरजा पटवर्धन यांचा लेख (लोकमत, ४ जानेवारी) वाचला. ‘कोरोना विधवांना पुनर्विवाहाचा हक्क मिळावा म्हणून’ (लोकमत, ३१ डिसेंबर) या मी लिहिलेल्या  लेखावरची ही प्रतिक्रिया असल्याने त्याबाबत काही स्पष्टीकरणे देणे मला गरजेचे वाटते.

१. कोणत्याही विषयावर चर्चा ही स्वागतार्हच असते; पण नीरजा पटवर्धन यांनी ‘विवाह हे उदरनिर्वाहाचे साधन आहे का, सुरक्षितता आहे का, पुरुषाचे उपकार आहेत का?’ असे मूळ मांडणीत नसलेले मुद्दे लादून टीका केली आहे. २. विवाहापेक्षा स्त्रीने स्वतःच्या पायावर उभे राहणे महत्त्वाचे असा त्यांनी दिलेला सल्ला आमच्या चळवळीलाही मान्यच आहे. आम्ही फक्त कोरोनाच्या महामारीत जोडीदार गमावल्याने विधवा झालेल्या स्त्रियांच्या रोजगार विषयावरच मुख्यत: काम करतो आहोत. उपमुख्यमंत्री, विविध संबंधित खात्यांचे मंत्री, सचिव, अधिकारी यांच्याशी सातत्याने बैठका घेऊन या महिलांच्या रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न करतो आहोत. 

३. या महिलांचे  सहा दिवसांचे रोजगार प्रशिक्षणही आम्ही घेतले. त्यांना मालमत्तेचे हक्क मिळावेत यासाठीही पाठपुरावा करून आदेश काढला व वेगवेगळ्या CSR शी रोजगारनिर्मितीसाठी बोलतो आहोत. ४. मात्र हे सारे करताना आमच्या असे लक्षात आले की,  तरुण वयातील अनेक एकल महिलांना पुन्हा सहजीवनाची सुरुवात करावीशी वाटते; परंतु कुटुंब, जाती व्यवस्था व मानसिकतेमध्ये त्यांना विरोध होतो आहे. अशा इच्छुक महिलांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या विवाहाला प्रोत्साहन देऊ इतकी मर्यादित भूमिका आम्ही घेतली आहे. ५. आमच्या संघटनेचे मुख्य मध्यवर्ती काम हे कोरोना-एकल महिलांसाठी रोजगारनिर्मितीचे आहे. फक्त विधवांचे लग्न लावण्यासाठी आम्ही काम सुरू केले आहे ही  मांडणी  आमच्या कामाविषयी गैरसमज निर्माण करणारी आहे.६.  अजूनही ग्रामीण भागात स्त्रीसाठी लग्न ही सुरक्षितता ठरते, हे  कटू असले तरी वास्तव आहे व पुरुषप्रधान व्यवस्थेची काळी बाजू आहे  इतके स्पष्ट विधान माझ्या लेखात आहे. मजुरीला जाणारी विवाहित स्त्री व विधवा स्त्री या दोघींशी मुकादम, ठेकेदार, काम देणारे मालक कसे वागतात ते अनुभव शहरी सुबुद्ध स्त्रियांनी एकदा समजावून घ्यावेत. विधवा स्त्रीचे परिसरातून सोडाच; कुटुंबातीलही अनेक जण शोषण करतात.  त्यातल्या त्यात विवाहाच्या व्यवस्थेत तिला काही प्रमाणात सुरक्षितता मिळू शकते. ७. अशा एकल महिलांशी लग्न करायला पुढे येणारे, अशा स्त्रियांना त्यांच्या मुलांसह स्वीकारणारे  पुरुष ‘तारणहार’ आहेत, असे मी कुठेही म्हटलेले नाही. महिलेच्या मुलांसह लग्न केले पाहिजे, पुरुष ते करीत नाहीत असाच मुद्दा मीही मांडलेला आहे.८.  विधवा या शब्दाच्या वापरावरूनही टीका केली आहे. आमच्या समितीचे नावच ‘कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती’ असे आहे; पण विधवांचा प्रश्न मांडताना स्त्रीच्या या अवस्थेबाबतचे सर्व पैलू व्यक्त होतील असा जवळचा शब्द दुसरा दिसत नाही. एकल शब्दात ते येत नाही. 

९.  महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांतील १०० तालुक्यांत कोणतीही आर्थिक मदत न मागता, न घेता पदरमोड करून शेकडो कार्यकर्ते या महिलांच्या पुनर्वसनासाठी पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत. या विधवांच्या जगण्यातील सर्व पैलूंना स्पर्श करताना त्यातला एक छोटा मुद्दा पुन्हा नव्याने सहजीवन सुरू करण्याच्या शक्यतेचा आहे. हे समजावून न घेता, आम्हाला स्त्रीविरोधी पुरुषवादी ठरवायचे हे  काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निराश करणारे आहे.