शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

शहरांच्या दयनीय अवस्थेस जबाबदार कोण?

By विजय दर्डा | Updated: July 9, 2018 05:00 IST

‘पावसाने मुंबई ठप्प’, ‘नागपूरची पावसाने दैना’, ‘पावसाने दिल्लीचे कंबरडे मोडले’ असे वृत्तपत्रांमधील मथळे आता नित्याचे झाले आहेत. जोरदार पाऊस झाला की शहरांमधील जनजीवन पार विस्कटून जाणे आता नवीन राहिलेले नाही.

‘पावसाने मुंबई ठप्प’, ‘नागपूरची पावसाने दैना’, ‘पावसाने दिल्लीचे कंबरडे मोडले’ असे वृत्तपत्रांमधील मथळे आता नित्याचे झाले आहेत. जोरदार पाऊस झाला की शहरांमधील जनजीवन पार विस्कटून जाणे आता नवीन राहिलेले नाही. गेल्या वर्षी मुंबईत रेल्वेच्या एका पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत १६ निष्पापांचे बळी गेले होते. ते कमी म्हणून की काय यंदा एक पादचारी पूलच रेल्वेवर कोसळला! काही महिन्यांपूर्वी वाराणसीत बांधकाम सुरू असलेल्या एका पुलाचा भाग कोसळला होता तर त्याआधी कोलकात्यात एक संपूर्ण पूल कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. आपल्या शहरांची अशी दयनीय अवस्था का बरं झाली आहे? सर्व ठिकाणचे नागरी प्रशासन पार निकम्मे झाले आहे की या गोष्टींकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही?या प्रश्नांची उत्तरे शोधण्याआधी जरा सर पॅट्रिक गिडिज यांची आठवण करू या. हल्ली त्यांचे नाव माहीत असलेले विरळाच सापडतील. जगभरातील अनेक शहरांचे ‘मास्टर प्लॅन’ तयार करणारे म्हणून सर पॅट्रिक विख्यात होते. स्कॉटलँडची राजधानी असलेल्या एडिन्बर्ग शहरातील बकाल वस्त्यांचा कायापालट करणारी योजना त्यांनी हिकमतीने यशस्वी करून दाखविली. ही गोष्ट आहे भारत पारतंत्र्यात होता तेव्हाची. सर पॅट्रिक यांची ख्याती ऐकून मद्रास प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर लॉर्ड पेंटलँड यांनी त्यांना भारतात येऊन भारतातील शहरांची अवस्था सुधारण्याचे उपाय सुचविण्यासाठी पाचारण केले. सर पॅट्रिक त्यानुसार भारतात आले. त्यांनी केवळ मद्रासच नव्हे तर मुंबई व कोलकाता इलाख्यातील शहरांचेही दौरे केले. त्यांनी मुंबईसह भारतातील १८ शहरांचे नागरी नियोजन आराखडे तयार केले. नागरिकांना सुखा-समाधानाने जगता येईल अशी शहरांची रचना हवी, हे सर पॅट्रिक यांचे मुख्य सूत्र होते. केवळ नयनरम्य सुंदरतेशिवाय लोकांचे दैनंदिन जीवन सुलभ व प्रसन्न व्हायला हवे, असा त्यांचा आग्रह असे. सार्वजनिक स्वच्छता व सांडपाण्याच्या निचऱ्याची चोख व्यवस्था यावरही त्यांचा भर असे. भारतीय शहराचा विकास युरोपचे अनुकरण करून नव्हे तर स्थानिक संस्कृतीनुसार व्हायला हवा, असा त्यांचा आग्रह असे.सर पॅट्रिक गिडिज यांनी दिलेल्या सूचना व दीर्घकालीन गरजा लक्षात घेऊन त्यावेळच्या इंग्रज शासकांनी भारतीय शहरांचे ‘मास्टर प्लॅन’ तयार केले. स्वातंत्र्यानंतर खेड्यांकडून लोकांचे मोठे लोंढे शहरांकडे येऊ लागले. नागरीकरणास वेग आला. त्यामुळे आपल्या स्वतंत्र देशामधील सरकारेही शहरांकडे तसेच लक्ष देतील, अशी अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. शहरांमध्ये इंग्रजांनी सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी जी ‘ड्रेनेज यंत्रणा’ उभारली त्यावरच आपण पुढील कित्येक दशके विसंबून राहिलो. शहरांच्या वाढत्या लोकसंख्येनुसार त्यात वाढ व विस्तार करण्याचे भान आपण ठेवले नाही. नव्याने येणाºया लोकांना सामावून घेण्यासाठी शहरांनी हातपाय पसरले. उपनगरे व विस्तारित उपनगरे वसली. पाण्याचा नैसर्गिकपणे निचरा होण्याच्या ज्या जागा होत्या तेथे मोठमोठ्या इमारती उभ्या राहू लागल्या. पण पाण्याला वाहून जायला जागा व वाट ठेवली नाही तर शहरांमध्ये पूर येतील याचा विचारही केला गेला नाही. याचे भयावह परिणाम सन २०१५ मध्ये चेन्नईत पाहायला मिळाले. तेथे २४ तासांत १९ इंच पाऊस झाला व निम्मे चेन्नई शहर पाण्याखाली गेले.पावसाळ््यात मुंबईची होणारी दैना तर आपण दरवर्षी पाहतोच. पावसाने जोर धरला की मुंबईची तुंबापुरी होते. सखल भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरते. दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. पाऊस काही नवा नाही व यापुढेही तो पडणारच आहे. बाकी एवढी प्रगती केली पण पावसातही शहरे सुरळीत व सुरक्षित राहतील अशी ‘ड्रेनेज व्यवस्था’ उभारणे अशक्य का व्हावे? हे अशक्य नाही. पण त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती व भरपूर पैशांची गरज आहे. आता तर केंद्र सरकारही शहरांना ‘स्मार्ट’ करण्यासाठी मोठा पैसा खर्च करत आहे. दावे मोठमोठे केले जातात, सुंदर स्वप्ने दाखविली जातात. पण शहरे स्मार्ट करण्याच्या नादात सर पॅट्रिक यांनी दाखविलेली दूरदृष्टी व शहाणपण यांचा नेमका विसर पडताना दिसतो. आपली शहरे ‘ड्रेनेज’मध्येच मार खात आहेत. त्याचे परिणाम आजची पिढी भोगते आहेच. भावी पिढ्यांनाही ते भोगावे लागणार आहेत.नाही म्हणायला दर २० वर्षांनी शहरांचे विकास आराखडे मंजूर करण्याची औपचारिकता पूर्ण केली जाते. पण नंतरच्या २० वर्षांत राजकारणी, बिल्डर व अधिकारी त्या आराखड्याची कशी वाट लावतात, हे आपण पाहतोच आहोत. शहरांची अधिक लोकसंख्या अनियोजित भागांमध्ये राहात आहे. शहरांची संपूर्ण जबाबदारी नगर प्रशासनावर टाकण्यासाठी सुमारे २० वर्षांपूर्वी ७४ वी घटनादुरुस्ती केली गेली. बहुतांश शहरांचे सुंदर विकास आराखडे कागदावर तयार आहेत. पण ते जमिनीवर राबवायला पैसा नाही. मुंबई किंवा दिल्ली यासारख्या महानगरांना विशेष अनुदान मिळते. परंतु नागपूर, औरंगाबाद यासारख्या शहरांमध्ये रस्त्यांची दरवर्षी देखभाल व दुरुस्ती करण्यासाठीही पैशाची वानवा आहे. मग नव्या ड्रेनेज लाईन टाकणे व पिण्याच्या पाण्याची अधिक चांगली व्यवस्था करणे तर दूरच राहिले. बरं, जो काही निधी आहे त्याचाही इमानदारीने वापर केला जात नाही. यातील बराचसा पैसा वाया जातो. अधिकारी व कंत्राटदारांची मिलीभगत मोडणे कुणालाही शक्य झालेले नाही. केंद्र सरकार ‘अमृत’ आणि ‘स्मार्ट सिटी मिशन’ या दोन योजनांवर सन २०२० पर्यंत सुमारे ९८ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यात मूलभूत सोईसुविधा ‘हायटेक’ केल्या जायच्या आहेत. हा पैसा केवळ भपकेबाजपणा व दिखाव्यावर खर्च होणार नाही, ही अपेक्षा. सुलभ, सुखद वाहतूक व्यवस्था आणि पिण्याचे शुद्ध, पुरेसे पाणी यावरही लक्ष द्यावे लागेल.हे लिखाण संपविण्यापूर्वी...एखाद्या अधिकाºयाची कामाची तडफ आणि तत्परता कितीतरी लोकांना प्रेरणा देते आणि साहस व उत्साहाचा संचार करते. दोन दिवसांपूर्वी नागपुरात अतिवृष्टीदरम्यान एका शाळेत ६०० पेक्षा जास्त विद्यार्थी पुरात अडकले. नागपूर झोन ४ चे डीसीपी निलेश भरणे आणि त्यांच्या पथकाने सहा तासपर्यंत रेस्क्यू आॅपरेशन चालविले आणि सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. या दरम्यान डीसीपीने एका बंद पडलेल्या बसला बाहेर काढण्यासाठी धक्काही मारला. मी त्यांच्या या कार्यतत्परतेचा मनापासून आदर करतो.

टॅग्स :floodपूरMumbaiमुंबईnagpurनागपूर