शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँकांचा शत्रू कोण? रिझर्व्ह बँकेची कारवाई अन् संपूर्ण क्षेत्राला दिलेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 04:40 IST

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील सहकारी बॅंका आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि नियामक जबाबदाऱ्या या तिन्ही बाबतींत सातत्याने अडखळताना दिसत आहेत.

खासगीकरणाच्या रेट्यात आधीच सार्वजनिक आणि सहकार क्षेत्र उद्ध्वस्त होत असताना, एक नवी बातमी आली आहे! रिझर्व्ह बँकेने साताऱ्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द करत, आणखी तीन सहकारी बँकांवर निर्बंध लादणारी कारवाई केली. रिझर्व्ह बँकेच्या या कारवाईचा बडगा समर्थ सहकारी बँक लिमिटेड सोलापूर आणि धाराशिव येथील समर्थ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्यावर चालला आहे. दोन्ही बँकांवर निर्बंध लागू झाले आहेत. शिवाय आधीच निर्बंध लागू असलेल्या ‘द शिरपूर मर्चंट्स सहकारी बँक लिमिटेड शिरपूर’ या बँकेवरील निर्बंध ८ जानेवारी २०२६ पर्यंत आणखी तीन महिन्यांसाठी वाढवले गेले आहेत. या बँकांना रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय कर्ज देण्यास, नवीन ठेवी स्वीकारण्यास किंवा दायित्व घेण्यास मनाई करण्यात आली आहे. ही कारवाई केवळ तात्पुरती दंडात्मक पावले नाहीत; ती संपूर्ण सहकारी बॅंकिंग क्षेत्रासाठी दिलेला कठोर इशारा आहे. 

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील सहकारी बॅंका आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि नियामक जबाबदाऱ्या या तिन्ही बाबतींत सातत्याने अडखळताना दिसत आहेत. त्यामुळे ही कारवाई आवश्यकच, मात्र त्याचा फटका बसतो तो ग्राहकांना. या बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेने केलेली दंडात्मक कारवाई आणि निर्बंध म्हणजे बॅंकिंग व्यवस्थेतील बिघाडावर उपचार करण्याचे प्रयत्न आहेत. या बॅंकांवर रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या कारवाया विविध प्रकारच्या आहेत. काहींवर आर्थिक दंड लावण्यात आला आहे, काहींच्या संचालक मंडळावर निर्बंध घालण्यात आले, तर काहींच्या कर्जवाटप, ठेवी स्वीकारण्याच्या अधिकारांवर स्थगिती आली आहे. ही कारवाई नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे केली गेली आहे. नियमांचे पालन न केल्याने केवळ बॅंकेची प्रतिष्ठा धोक्यात येत नाही, तर ठेवीदारांच्या पैशांची सुरक्षितताही धोक्यात येते. महाराष्ट्रातील सहकारी  बॅंका शेतकरी, लघुउद्योग, व्यापारी आणि सामान्य ग्राहकांच्या आर्थिक गरजा भागवणाऱ्या विश्वासार्ह संस्था म्हणून ओळखल्या जात होत्या. 

गेल्या दशकभरात राजकीय हस्तक्षेप, खासगीकरणाचा अतिरेक, अपारदर्शक व्यवहार, वसुलीतील अकार्यक्षमता आणि नातेसंबंधांवर आधारित कर्जवाटप यांनी या बॅंकांची प्रतिमा मलिन केली. अनेक बॅंकांनी ‘सहकारी’ ही संकल्पना विसरून ‘कर्ज वितरण केंद्र’ या स्वरूपात काम करणे सुरू केले. परिणामी, ठेवीदारांचा विश्वास डळमळीत झाला. रिझर्व्ह बॅंकेच्या कारवाईचा परिणाम दोन स्तरांवर दिसेल. पहिला, व्यवस्थापनावर थेट दडपण येईल. ते अधिक महत्त्वाचे. बॅंकेचे संचालक मंडळ आणि वरिष्ठ अधिकारी आता नियमांचे पालन करण्याबाबत अधिक जागरूक होतील. दुसरा, ग्राहकांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास हळूहळू कमी होईल. 

मात्र, या प्रक्रियेत काही अल्पकालीन अडचणी येतीलच. काही बॅंकांमध्ये व्यवहार मर्यादित होतील, कर्ज वितरणात विलंब होईल, तर आर्थिक प्रवाहात मंदी जाणवेल. रिझर्व्ह बॅंकेने केवळ काही बॅंकांना शिक्षा केली नाही, तर संपूर्ण सहकारी बॅंकिंग प्रणालीला ‘जागे व्हा’ असा संदेश दिला आहे. नियम पाळणे ही औपचारिकता नाही, तर ती ठेवीदारांच्या विश्वासाची हमी आहे. बॅंकिंग क्षेत्राचा पाया म्हणजे पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि वित्तीय शिस्त. ही तीन तत्त्वे कोणी पाळली नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई होणारच. सहकारी बॅंकांना आता राजकीय प्रभावापेक्षा व्यावसायिक कौशल्यावर भर द्यावा लागेल. स्थानिक पातळीवरील बॅंकिंग सेवा टिकवायच्या असतील, तर त्या पारदर्शक आणि जबाबदार असल्या पाहिजेत. 

अनेक वर्षे ‘मृदू’ नियमनाचा आरोप झेलणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेने आता कठोर पवित्रा घेतल्याने सहकारी क्षेत्रात सुधारणा होण्याची शक्यता आहे. भविष्यात या बॅंकांना तंत्रज्ञान, व्यवस्थापन यामध्ये अधिक गुंतवणूक करावी लागेल. ग्राहक सेवा आणि नियमन दोन्ही हातात हात घालून चालले, तरच सहकारी बॅंकिंगचा आत्मा वाचेल.  ही कारवाई संपूर्ण वित्तीय शिस्तीची नवी परिभाषा रचण्यासाठी आहे. शिस्त, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या तीन मूल्यांवर सहकार क्षेत्र पुन्हा उभे राहिले, तर ठेवीदारांचा विश्वास पुन्हा मिळवता येईल. तो विश्वास ही बॅंकिंग व्यवस्थेची खरी शक्ती आहे. मात्र, सहकार क्षेत्राचीच विश्वासार्हता संपणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. खासगी म्हणजे पवित्र आणि सहकारी म्हणजे भ्रष्ट, हे ‘नॅरेटिव्ह’ बदलावे लागेल. कारण, ‘सहकार’ हीच सर्वसामान्य माणसाच्या अभ्युदयाची आशा आहे!

 

English
हिंदी सारांश
Web Title : Who is the Enemy of Cooperative Banks? RBI's Action Explained

Web Summary : RBI's crackdown on Maharashtra's cooperative banks highlights financial indiscipline and regulatory failures. Actions, including license cancellations and restrictions, aim to restore depositor trust. Banks must prioritize transparency and professional management over political influence to survive and thrive.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र